शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

‘हमदर्द’ला कंपनी सुरू करण्यापूर्वीच कटू अनुभव; व्यवस्थापनाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 12:40 IST

हमदर्द लॅबोरेटरीज (इंडिया) या गु्रपला औरंगाबादेत कंपनी सुरू करण्यापूर्वीच कटू अनुभव येण्यास सुरुवात झाली आहे.

औरंगाबाद : हमदर्द लॅबोरेटरीज (इंडिया) या गु्रपला औरंगाबादेत कंपनी सुरू करण्यापूर्वीच कटू अनुभव येण्यास सुरुवात झाली आहे. त्या अनुभवाची तक्रार कंपनीचे शमशाद अली यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. कंपनीने १५० कोटींची गुंतवणूक केली असून, पुढील टप्प्यातील ३५० कोटींची गुंतवणूक करायची की नाही याबाबत व्यवस्थापन गांभीर्याने विचार करू लागले आहे. 

औरंगाबाद आणि नागपूर येथे ‘मेक इन महाराष्ट्र’अंतर्गत येथील शेंद्रा एमआयडीसीमध्ये दोन टप्प्यांत ५०० कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने कच्च्या मालासाठी पैठण आणि गंगापूर येथे घेतलेल्या जमिनीपैकी गंगापूर तालुक्यातील महुली येथे स्थानिकांनी त्रास देण्यास सुरुवात केली आहे.

महुली येथे शेतीसाठी दोन वर्षांपूर्वी जमीन घेतली. त्या जमिनीचा पूर्ण खरेदी-विक्री व्यवहार झाल्यानंतर मालकी वादातून प्रकरण कोर्टात पोहोचले. कोर्टाने ‘जैसे थे’चे आदेश दिला.कंपनीने त्या जमिनीवर सुरक्षा भिंत बांधलेली होती, सुरक्षारक्षक नेमले होते. दरम्यानच्या काळात स्थानिकांकडून सुरक्षारक्षकांना हुसकावण्यात आले, शिवाय तेथील सुरक्षा भिंतही पाडण्यात आली. याप्रकरणी कंपनीने स्थानिक पोलिसांत तक्रार केली; परंतु काही प्रतिसाद मिळाला नाही. 

५०० हून अधिक रोजगारनिर्मितीकंपनी सुरू झाल्यानंतर ५०० जणांना थेट, तर १ हजार जणांना अप्रत्यक्ष रोजगार मिळणे शक्य होईल; परंतु येथील कटू अनुभवामुळे ३५० कोटींची दुसऱ्या टप्प्यातील गुंतवणूक करण्याबाबत कंपनी विचार करू लागली आहे. पैठण आणि गंगापूर येथे शेतीसाठी घेतलेल्या जमिनीपैकी गंगापूर येथील जमिनीबाबत वाद सुरू झाल्यामुळे कंपनीने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMIDCएमआयडीसीShendra MIDCशेंद्रा एमआयडीसीAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद