शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

संग्रामनगर रेल्वे उड्डाणपुलाखालील भुयारी मार्ग देशासाठी ठरेल मॉडेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 18:02 IST

संग्रामनगर रेल्वेफाटक बंद झाल्यापासून रहिवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून पुलाखाली भुयारी मार्ग उभारण्याच्या कामाचा रविवारी शुभारंभ झाला.

औरंगाबाद : संग्रामनगर रेल्वेफाटक बंद झाल्यापासून रहिवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून पुलाखाली भुयारी मार्ग उभारण्याच्या कामाचा  रविवारी शुभारंभ झाला. हा भुयारी मार्ग देशासाठी मॉडेल ठरणार असून, यापुढे रेल्वे उड्डाणपूल होईल तेथे भुयारी मार्ग उभारेल, असा निर्णय घेण्यात आल्याचे ‘दमरे’चे वरिष्ठ मंडळ अभियंता डी.डी. नागपुरे यांनी सांगितले. 

संग्रामनगर रेल्वे फाटकाजवळ भुयारी मार्गाचे भूमिपूजन अणि कोनशिला स्थापना समारंभ रविवारी (दि.१२) खा. चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी महापौर नंदकुमार घोडेले, नगरसेविका शोभा बुरांडे, स्मिता घोगरे, मराठवाडा रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा, मेट्रो असोसिएशनचे श्रीमंत गोर्डे पाटील, डॉ. प्रेम खडकीकर, शिवानंद वाडकर, प्रदीप बुरांडे, किशोर शितोळे, भाऊ सुरडकर, ‘दमरे’चे मंडळ अभियंता सुजितकुमार, सहायक अभियंता खोब्रे आदी उपस्थित होते. 

डी.डी. नागपुरे म्हणाले की, संग्रामनगरमुळे ‘संग्राम’ झाला आहे. रेल्वे उड्डाणपूल होईल तेथे भुयारी मार्ग करण्याचे धोरण ठरविण्यात आले. त्याचा देशभरात फायदा होईल. खा. खैरे म्हणाले की, उड्डाणपूल झाल्यानंतर फाटक बंद करण्याचा रेल्वेचा नियम आहे. नागरिकांनी न्यायालयात धाव घेतली; परंतु फाटक बंद करण्याचा आदेश न्यायालयाने दिला. संग्रामनगर येथील नागरिकांमुळे रेल्वेचा नियम बदलला. भुयारी मार्गाचे काम सुरू झाले. त्याचा देशासाठी फायदा झाला. रेल्वेस्टेशन एमआयडीसीतून बायपासला जोडणाऱ्या पुलासाठी ‘एमआयडीसी’ने पैसे दिले पाहिजेत. 

नागरिकांची दिवाळीदोन वर्षांपूर्वी रेल्वे फाटक बंद केले. ये-जा करण्यासाठी होणाऱ्या अडचणींमुळे नागरिकांनी आंदोलन केले. लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांकडे चकरा माराव्या लागल्या. निधीचा प्रश्न होता. या सगळ्या अडचणींनंतर भुयारी मार्गाचे काम सुरू झाले. भुयारी मार्ग झाल्यानंतर नागरिक खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करतील, असे श्रीमंत गोर्डे पाटील म्हणाले.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाTrafficवाहतूक कोंडीAurangabadऔरंगाबाद