शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

उंडणगाव पाणीपुरवठा योजनेचा बट्ट्याबोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 01:20 IST

चौदाव्या वित्त आयोगाचे दोन लाख आणि शासनाने टंचाईकाळातील उपाययोजनेतून मंजूर केलेले २८ लाख असे ३० लाख रुपये खर्चून तयार केलेली पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायतच्या अंतर्गत वाद, काही लोकांना लागणारी टक्केवारी व नियोजनाअभावी रखडली आहे. यामुळे उंडणगाव येथे पावसाळ्यातही भीषण पाणीटंचाई जाणवत असून, नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. टँकर मागवून व डोंगरदऱ्यात मिळेल तेथून पाणी आणून आपली तहान भागवावी लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसिल्लोड : चौदाव्या वित्त आयोगाचे दोन लाख आणि शासनाने टंचाईकाळातील उपाययोजनेतून मंजूर केलेले २८ लाख असे ३० लाख रुपये खर्चून तयार केलेली पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायतच्या अंतर्गत वाद, काही लोकांना लागणारी टक्केवारी व नियोजनाअभावी रखडली आहे. यामुळे उंडणगाव येथे पावसाळ्यातही भीषण पाणीटंचाई जाणवत असून, नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. टँकर मागवून व डोंगरदऱ्यात मिळेल तेथून पाणी आणून आपली तहान भागवावी लागत आहे.२०१७ मध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत सिल्लोड तालुक्यातील खेळणा मध्यम प्रकल्पात पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतची विहीर खोदण्यात आली होती. त्या विहिरीत आजही मुबलक पाणी आहे. तरीही येथील नागरिक तहानलेले आहेत. या पाणीपुरवठा योजनेचे काम अंदाजपत्रकानुसार झालेले नाही. हे काम ज्या ठेकेदाराच्या नावावर आहे त्याऐवजी दुसºयाच ठेकेदाराने हे काम निकृष्ट केले आहे. त्यात अनेक अनियमितता आहेत. ३३ एच.पी. ऐवजी १५ एच पी.ची मोटार टाकण्यात आली. विहिरीपासून उंडणगावपर्यंत १ हजार ९०६ मीटर पाईपलाईन टाकण्यात आली. ती जागोजागी उखडत आहे.कमी खोल केली आहे. योजनेतील पंप हाऊस, पाण्याचा हौद झालेला नाही. पाईपलाईन उखडून १ महिना झाला तरी त्याची जोडजाड झालेली नाही. ग्रामपंचायतीच्या ताब्यात योजना दिली नाही. आर्थिक देवाण घेवाण, टक्केवारी, अंतर्गत वाद, ढिसाळ नियोजन यामुळे योजना कार्यान्वित होऊनही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, असा आरोप शिवसेनेचे सर्कल प्रमुख पंकज जैस्वाल यांनी केला आहे.उंडणगाव हे बाजारपेठेचे गाव आहे. या गावात भीषण पाणीटंचाई असल्याने विशेष निधीतून लाखो रुपये खर्चून पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. खेळणा मध्यम प्रकल्पातून पाईपलाईन टाकण्याचे काम १९ मे रोजीच पूर्ण झाले होते. पण ग्रामपंचायतीच्या अंतर्गत वाद व नियोजनाअभावी पावसाळा सुरू झाला तरी या योजनेचे पाणी नागरिकांना मिळाले नाही. शासनाने उंडणगावात बालाजी उत्सव, रमजानमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी तात्काळ टेंडर काढून ही योजना मंजूर केली होती. पण त्यात वरील कारणामुळे शासनाचा हेतू साध्य झाला नाही.४पाणीटंचाईबाबत नागरिकांनी यापूर्वी काढलेला हंडा मोर्चा, ३० मेपर्यंत पाणी देण्याची दिलेली हमी, दोन वेळा दिलेल्या निवेदनाला ग्रामपंचायतीने दाखविलेली केराची टोपली, सध्या जाणवत असलेली पाणीटंचाई या सर्व बाबींना कंटाळून सोमवारी (दि.२५) उंडणगाव ग्रामपंचायतीला गावकरी टाळे ठोकणार असल्याचा इशारा शिवसेनेचे उंडणगाव सर्कलप्रमुख पंकज जैस्वाल, माजी सरपंच राजेंद्र पाटील, दिलीप पाटील, शिवाजी शिंगारे, गोपाल जाधव, गजानन शिंगारे, कृष्णा जाधव, विश्वनाथ पाटील, संजय भोरखडे, नाना सनान्से, दिलीप सनान्से आदींसह ग्रामस्थांनी दिला आहे. ग्रामपंचायतीला टाळे ठोकूनही ४ जुलैपर्यंत पाणी मिळाले नाही तर साखळी उपोषण करून सरपंच, उपसरपंचांचे राजीनामे मागणार असल्याचा इशारा जैस्वाल यांनी दिला आहे.आठ दिवसांत नागरिकांना मिळेल पाणीग्रामपंचायतीने ३३ एचपीची मोटार मागविली आहे. ती येताच नागरिकांना नळाद्वारे पाणी मिळेल. यामुळे ग्रामपंचायतीला कुलूप लावू नये. २ ठिकाणी पाईपलाईन लिकेज आहे. त्याबाबत ठेकेदाराला सूचना दिल्या आहेत. ठेकेदाराने अजून ही योजना ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिलेली नाही. -डी. जे. बोराडे,ग्रामविकास अधिकारी

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतwater shortageपाणीकपात