शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
3
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
4
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
5
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
6
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
7
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
8
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
9
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
10
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
11
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
12
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
13
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
14
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
15
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
16
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
17
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
18
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
19
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
20
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय

उंडणगाव पाणीपुरवठा योजनेचा बट्ट्याबोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 01:20 IST

चौदाव्या वित्त आयोगाचे दोन लाख आणि शासनाने टंचाईकाळातील उपाययोजनेतून मंजूर केलेले २८ लाख असे ३० लाख रुपये खर्चून तयार केलेली पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायतच्या अंतर्गत वाद, काही लोकांना लागणारी टक्केवारी व नियोजनाअभावी रखडली आहे. यामुळे उंडणगाव येथे पावसाळ्यातही भीषण पाणीटंचाई जाणवत असून, नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. टँकर मागवून व डोंगरदऱ्यात मिळेल तेथून पाणी आणून आपली तहान भागवावी लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसिल्लोड : चौदाव्या वित्त आयोगाचे दोन लाख आणि शासनाने टंचाईकाळातील उपाययोजनेतून मंजूर केलेले २८ लाख असे ३० लाख रुपये खर्चून तयार केलेली पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायतच्या अंतर्गत वाद, काही लोकांना लागणारी टक्केवारी व नियोजनाअभावी रखडली आहे. यामुळे उंडणगाव येथे पावसाळ्यातही भीषण पाणीटंचाई जाणवत असून, नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. टँकर मागवून व डोंगरदऱ्यात मिळेल तेथून पाणी आणून आपली तहान भागवावी लागत आहे.२०१७ मध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत सिल्लोड तालुक्यातील खेळणा मध्यम प्रकल्पात पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतची विहीर खोदण्यात आली होती. त्या विहिरीत आजही मुबलक पाणी आहे. तरीही येथील नागरिक तहानलेले आहेत. या पाणीपुरवठा योजनेचे काम अंदाजपत्रकानुसार झालेले नाही. हे काम ज्या ठेकेदाराच्या नावावर आहे त्याऐवजी दुसºयाच ठेकेदाराने हे काम निकृष्ट केले आहे. त्यात अनेक अनियमितता आहेत. ३३ एच.पी. ऐवजी १५ एच पी.ची मोटार टाकण्यात आली. विहिरीपासून उंडणगावपर्यंत १ हजार ९०६ मीटर पाईपलाईन टाकण्यात आली. ती जागोजागी उखडत आहे.कमी खोल केली आहे. योजनेतील पंप हाऊस, पाण्याचा हौद झालेला नाही. पाईपलाईन उखडून १ महिना झाला तरी त्याची जोडजाड झालेली नाही. ग्रामपंचायतीच्या ताब्यात योजना दिली नाही. आर्थिक देवाण घेवाण, टक्केवारी, अंतर्गत वाद, ढिसाळ नियोजन यामुळे योजना कार्यान्वित होऊनही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, असा आरोप शिवसेनेचे सर्कल प्रमुख पंकज जैस्वाल यांनी केला आहे.उंडणगाव हे बाजारपेठेचे गाव आहे. या गावात भीषण पाणीटंचाई असल्याने विशेष निधीतून लाखो रुपये खर्चून पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. खेळणा मध्यम प्रकल्पातून पाईपलाईन टाकण्याचे काम १९ मे रोजीच पूर्ण झाले होते. पण ग्रामपंचायतीच्या अंतर्गत वाद व नियोजनाअभावी पावसाळा सुरू झाला तरी या योजनेचे पाणी नागरिकांना मिळाले नाही. शासनाने उंडणगावात बालाजी उत्सव, रमजानमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी तात्काळ टेंडर काढून ही योजना मंजूर केली होती. पण त्यात वरील कारणामुळे शासनाचा हेतू साध्य झाला नाही.४पाणीटंचाईबाबत नागरिकांनी यापूर्वी काढलेला हंडा मोर्चा, ३० मेपर्यंत पाणी देण्याची दिलेली हमी, दोन वेळा दिलेल्या निवेदनाला ग्रामपंचायतीने दाखविलेली केराची टोपली, सध्या जाणवत असलेली पाणीटंचाई या सर्व बाबींना कंटाळून सोमवारी (दि.२५) उंडणगाव ग्रामपंचायतीला गावकरी टाळे ठोकणार असल्याचा इशारा शिवसेनेचे उंडणगाव सर्कलप्रमुख पंकज जैस्वाल, माजी सरपंच राजेंद्र पाटील, दिलीप पाटील, शिवाजी शिंगारे, गोपाल जाधव, गजानन शिंगारे, कृष्णा जाधव, विश्वनाथ पाटील, संजय भोरखडे, नाना सनान्से, दिलीप सनान्से आदींसह ग्रामस्थांनी दिला आहे. ग्रामपंचायतीला टाळे ठोकूनही ४ जुलैपर्यंत पाणी मिळाले नाही तर साखळी उपोषण करून सरपंच, उपसरपंचांचे राजीनामे मागणार असल्याचा इशारा जैस्वाल यांनी दिला आहे.आठ दिवसांत नागरिकांना मिळेल पाणीग्रामपंचायतीने ३३ एचपीची मोटार मागविली आहे. ती येताच नागरिकांना नळाद्वारे पाणी मिळेल. यामुळे ग्रामपंचायतीला कुलूप लावू नये. २ ठिकाणी पाईपलाईन लिकेज आहे. त्याबाबत ठेकेदाराला सूचना दिल्या आहेत. ठेकेदाराने अजून ही योजना ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिलेली नाही. -डी. जे. बोराडे,ग्रामविकास अधिकारी

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतwater shortageपाणीकपात