शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्त वाहतुकीमुळे अपघाताचा धोका वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 19:36 IST

जड वाहनांचा ठिय्या : वाहतूक शाखेचे कोंडीकडे दुर्लक्ष वाळूज महानगर: वाळूज औद्योगिकनगरीत बेशिस्त वाहतुकीमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. या ...

जड वाहनांचा ठिय्या : वाहतूक शाखेचे कोंडीकडे दुर्लक्षवाळूज महानगर: वाळूज औद्योगिकनगरीत बेशिस्त वाहतुकीमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. या परिसरात ठिकठिकाणी अवजडवाहने रस्त्यावरच पार्क केली जात असल्याने सतत वाहतुकीची कोंडी होत आहे. वाळूजसाठी स्वतंत्र वाहतूक शाखा असतानाही वाहतुकीला शिस्त लागत नसल्याने कार्यपद्धतीवर साशंकता व्यक्त केली जात आहे.

औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यात देशाच्या विविध भागांतून वाहनाद्वारे कच्चा व पक्क्या मालाची ने-आण सुरु असते. या परिसरात माल घेऊन येणारी मालवाहु वाहने कामगार चौक, महावीर चौक, मोरे चौक, आंबेडकर चौक, रांजणगावरोड, साजापूररोड, टिसीआय गोडावुन, नगररोडवरील पेट्रोल पंप आदी ठिकाणी सर्रासपणे रस्त्याच्याकडेला थांबलेली असतात. या प्रकारामुळे औद्योगिकनगरीत सतत वाहतुकीची कोंडी होते. तसेच छोटे वाहनधारक, दुचाकीस्वार व पादचाऱ्यांना जिव मुठीत घेऊनच ये-जा करावी लागत आहेत.

या परिसरात कामगार चौकात एमआयडीसी प्रशासनाकडून वाहनतळ उभारले आहे. मात्र, तेथे आवश्यक सुविधा नसल्याने तसेच वाहनतळाचे शुल्क वाचविण्यासाठी अनेक वाहनधारक रस्त्यावरच वाहने उभी करतात. बजाज आॅटो कंपनीकडून स्वतंत्र वाहनतळ उभारले आहे. मात्र, अनेक जड वाहने गरवारे गेट ते टीसीआय गोडावून या मार्गावरील रस्त्याच्याकडेला उभी केली जातात. नगर-औरंगाबाद या महामार्गावर दिवस-रात्र वाहनांची वर्दळ असते. याप्रकारामुळे अपघाताची शक्यता व्यक्त केली जात असून, संबंधित विभागातील उच्च पदस्थ अधिकाºयांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.

अपघाताचा धोका वाढलागोलवाडी फाटा पासून पथकर नाक्यापर्यंत ठिकठिकाणी अवजड वाहने रस्त्याच्याकडेला थांबलेली असतात. महामार्गासह औद्योगिक क्षेत्रात अवजड वाहनांनी अतिक्रमण केल्यामुळे यापूर्वी अनेकदा गंभीर अपघात झाले आहेत. काही जणांना प्राण गमवावे लागले आहे. अपघातानंतर काही दिवस या मार्गावर जडवाहनाचे थांबे बदलतात. नंतर पुन्हा जैसे थे वाहने रस्त्यावर उभी केली जात असल्यामुळे कामगार, उद्योजक व प्रवाशांना जिव मुठीत धरुन या मार्गावरुन प्रवास करावा लागत आहे.

वाहतुक शाखेचे दुर्लक्षवाळूज औद्योकिगनगरीतील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी स्वतंत्र वाहतूक शाखा सुरु केली. सुरवातीला वाहतूक शाखेच्या अधिकारी व कर्मचाºयांनी वाहतुकीची कोंडी करणाºया वाहनधारकावर कारवाईचा बडगा उगारला. मात्र, आजघडीला जडवाहनांचे अघोषित थांबे तयार झाल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. तसेच दुचाकी विक्री करणाºया शोरुमच्या मालकांनी मुख्य रस्त्याचा ताबा घेतला आहे.

टॅग्स :Waluj MIDCवाळूज एमआयडीसीAurangabadऔरंगाबाद