शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

बेशिस्त वाहनचालकांनो सावधान; दंडाच्या नोटिसा पोहोचणार पोस्टाद्वारे घरपोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 13:00 IST

सावधान... बेशिस्त वाहनचालकांनो, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसोबतच पोलीस आता त्यांच्या मोबाईल आणि हॅण्डी कॅमेऱ्यांद्वारे तुमचे छायाचित्र काढत आहेत.

ठळक मुद्दे तुमच्या घरच्या पत्त्यावर छायाचित्रासह घरपोच दंडाची नोटीस प्राप्त होणार आहे. पोलिसांनी नुकताच हा उपक्रम सुरू केला आहे.

औरंगाबाद : सावधान... बेशिस्त वाहनचालकांनो, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसोबतच पोलीस आता त्यांच्या मोबाईल आणि हॅण्डी कॅमेऱ्यांद्वारे तुमचे छायाचित्र काढत आहेत. एवढेच नव्हे, तर तुमच्या घरच्या पत्त्यावर छायाचित्रासह घरपोच दंडाची नोटीस प्राप्त होणार आहे. पोलिसांनी नुकताच हा उपक्रम सुरू केला आहे. एवढेच नव्हे, तर पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न कराल, तर त्याचेही छायाचित्रण पोलिसांच्या शरीरावरील कॅमेऱ्याद्वारे केले जात आहे. 

पंधरा लाखांची लोकसंख्या असलेल्या शहरातील वाहनांची संख्याही आता अकरा ते बारा लाखांपर्यंत पोहोचली आहे. वाढत्या वाहनसंख्येच्या तुलनेत वाहतूक पोलिसांचे मनुष्यबळ म्हणावे तसे वाढले नाही. शहरात सध्या सिडको, शहर विभाग क्रमांक १ आणि २, छावणी आणि वाळूज, अशा पाच वाहतूक शाखा कार्यरत आहेत. पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे, सहायक आयुक्त एच.एस. भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक शाखेसाठी स्वतंत्र पोलीस निरीक्षक आणि अन्य अधिकाऱ्यांसह सुमारे साडेतीनशे कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे. असे असले तरी केवळ ७५ टक्केच कर्मचारी कर्तव्यावर हजर असतात.

रजा, साप्ताहिक सुटीसह अन्य कार्यालयीन कामकाजामध्ये उर्वरित कर्मचारी असतात. प्रत्येक चौका-चौकातील वाहतूक सिग्नलवर वाहतूक नियमन करण्यासोबतच नियम मोडून वाहने चालविणाऱ्यांवर कारवाई पोलीस करीत असतात; मात्र एकाचवेळी अनेक वाहनचालकांनी नियम तोडला, तर एक हवालदार एकावेळी एका जणावरच कारवाई करू शकतो, अशावेळी अन्य बेशिस्त वाहनचालक संधी साधून तेथून पळून जातात. असा हा नित्याचाच अनुभव वाहतूक पोलिसांना येतो. ही बाब लक्षात घेऊन सिडको वाहतूक विभागाचे निरीक्षक हेमंत गिरमे यांनी वरिष्ठांच्या आदेशाने बेशिस्त वाहनचालकांचे मोबाईलवर छायाचित्र काढा, असे आदेश दिले. त्यानुसार आता कारवाई सुरू झाली आहे. गिरमे यांनी शनिवारी हर्सूल टी पॉर्इंटसह विविध ठिकाणी बेशिस्त वाहनचालकांचे त्यांच्या मोबाईलवर छायचित्रे काढली . 

बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई गरजेचीयाविषयी बोलताना पोलीस निरीक्षक गिरमे म्हणाले की, बेशिस्त वाहनचालक सिग्नलवर थांबत नाही, स्टॉप लाईन पाळत नाही, कार चालविताना सीट बेल्ट न लावणे, विना हेल्मेट दुचाकी चालवितात. हे पोलिसांना दिसते; मात्र एकाचवेळी त्यांच्यावर कारवाई करणे पोलिसांना शक्य होत नाही. म्हणून त्यांचे छायाचित्र काढून त्यांना आता पोस्टाद्वारे घरपोच नोटिसा पाठविण्यास सुरुवात झाली.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसtraffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडी