शहरं
Join us  
Trending Stories
1
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
2
बुरहान वानीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी दिल्ली बॉम्बस्फोट घडवला? डॉ. उमर बद्दल मोठा खुलासा...
3
T20 World Cup 2026 Schedule Announced : टी-२० वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर! भारत-पाक एकाच गटात
4
खडसे-महाजन वादात माझा सँडविच होतोय; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंचे मोठे विधान
5
सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर CM फडणवीसांचे भाष्य; म्हणाले, “निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया...”
6
Video: धक्कादायक! माजी आमदार निर्मला गावित यांना अज्ञात कारने उडवले, रुग्णालयात दाखल
7
कुटुंबियांचा लग्नास विरोध; पाकिस्तानी हिंदू प्रेमी युगुल सीमा ओलांडून भारतात, BSF ने घेतले ताब्यात
8
“जोपर्यंत CM आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही”; फडणवीसांनी दिला शब्द
9
बिहार फत्ते; आता 'या' दोन राज्यात NDA चे सरकार स्थापन होणार, अमित शाहांचा मोठा दावा...
10
आम्ही जाण्यापूर्वीच पोस्टमार्टेम, पंचनामा नाही, तिच्या डोक्यावर वळ...; गौरी गर्जे-पालवेच्या आईचे गंभीर आरोप 
11
TET Paper Leak: मराठवाड्यातून गोंदियातील शिक्षकांना कॉल, कुणाकडे दीड लाख, कुणाला मागितले तीन लाख रुपये
12
'सहकुटुंब सहपरिवार' फेम अभिनेत्री अडकली लग्नबेडीत, पुण्यात थाटामाटात पार पडला विवाहसोहळा
13
चीनने पुन्हा गरळ ओकली; अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा पुनरुच्चार...
14
Travel : परदेशात कशाला... भारतातच आहे 'मिनी थायलंड'; कपल्ससाठी 'स्वर्गीय' ठिकाण!
15
तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...
16
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
17
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
18
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
19
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
20
"जे होतं ते आम्ही फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या...", महायुतीतील नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पिकासोबत जमिन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १ लाख रुपये द्या; उद्धव ठाकरेंचे आवाहन

By बापू सोळुंके | Updated: October 11, 2025 18:30 IST

राज्यसरकारने शेतकऱ्यांना घोषित केलेले ३१ हजार ६२८ कोटींतील पैसे मिळाले का, याची पडताळणी करण्यासाठी शिवसैनिकांचे दक्षता पथक दिवाळीनंतर गावागावांत जातील, असे ठाकरे म्हणाले.

छत्रपती संभाजीनगर: अतिवृष्टी आणि पुरात उभ्या पिकासोबत शेतीही खरवडून गेलेल्या शेतकऱ्यांना३७ हजार रुपये पॅकेजमधून आणि तीन लाख रुपये महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. ही मदत शेतकऱ्यांना खरच करणार असाल तर दिवाळीपूर्वी एक लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात टाकून दाखवा, असे आवाहन शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी(दि. ११)येथे केले.

उद्धवसेनेच्यावतीने शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी शनिवारी क्रांतीचौक ते गुलमंडी असा हंबरडा मोर्चा काढला. या मोर्चाचा समारोप सभेला मार्गदर्शन करताना ठाकरे बोलत होते. यावेळी मंचावर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, उद्धवसेनेचे नेते खा. संजय राऊत, खा. ओमराजे निंबाळकर, खा.अरविंद सावंत, माजी खा.चंद्रकांत खैरे, विधान परिषदेतील माजी विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, आ. कैलास पाटील, यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ठाकरे म्हणाले की, राज्यसरकारने शेतकऱ्याने ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे. यात पीक विम्याचे ५ हजार कोटी आहे. हे पैसे पीक कापणी अहवालानुसार विमा कंपनी मंजूर करणार आहे. पीकच शिल्लक राहिले नाही, तर मग पीक कापणी अहवाल आणि कंपनीकडे दावा कसा करणार असा सवाल त्यांनी केला. 

राज्यसरकारचे हे पॅकेज फसवे आहे. अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे सर्वस्व वाहून गेले आहे. त्यांच्याशी बोलताना त्यांनी संकटातून पुढे जाण्यासाठी निदान हेक्टरी ५० हजाराची गरज असल्याचे सांगितले. यामुळे आम्ही ५० हजाराची मागणी केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर प्रत्येकी ५० हजार रुपये देण्यात येणार होतो. त्याचवेळी कोरोनामुळे आल्याने दिड वर्ष ही मदत देता आली नाही. नंतर मात्र ५० खोकेवाल्यांनी दगा दिल्याचे ठाकरे यांनी सांगितले. मुख्यंमत्री असताना जर मी कर्जमुक्ती करू शकतो तर तुम्ही का करीत नाही, असा सवाल ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला. नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांचे पालकत्व सरकारने घ्यायला हवे, ठाकरे म्हणाले. शेत जमिन खरवडून गेलेल्या शेतकऱ्यांना ३७ हजार रुपये आणि मनरेगातून ३ लाख देणार असल्याचे सरकार सांगत आहे. यात जर तथ्य असेल तर दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना १ लाख रुपये देऊन दाखवा, असे आवाहनच ठाकरे यांनी केले.

पंतप्रधानांनी देशातील सर्व महिलांना १० हजार द्यावेनरेंद्र मोदी हे भाजपचे पंतप्रधान नाही तर देशाचे आहेत असा टोला ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला. ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहार मधील महिलांना त्यांनी प्रत्येकी १० हजार रुपये दिले. पी.एम. केअर फंडातून मोंदींनी देशातील सर्व महिलांना प्रत्येकी १० हजार रुपये द्यावे, अशी आपली मागणी असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

दिवाळीनंतर शिवसैनिक गावांत जाऊन पॅकेजची पडताळणी करणारराज्यसरकारने शेतकऱ्यांना घोषित केलेले ३१ हजार ६२८ कोटींतील पैसे मिळाले का, याची पडताळणी करण्यासाठी शिवसैनिकांचे दक्षता पथक दिवाळीनंतर गावागावांत जातील, असे ठाकरे म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Give farmers ₹1 lakh before Diwali: Uddhav Thackeray urges government.

Web Summary : Uddhav Thackeray demands ₹1 lakh Diwali aid for flood-hit farmers, criticizing the state's package as deceptive. He questioned the effectiveness of crop insurance and promised Shiv Sena's audit of government aid distribution post-Diwali.
टॅग्स :MarathwadaमराठवाडाUddhav Thackerayउद्धव ठाकरे