शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
4
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
5
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
6
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
7
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
8
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
9
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
10
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
11
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
12
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
13
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
14
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
15
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
16
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
17
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
18
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
19
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
20
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!

गाळ, गवत काढण्यासाठी दोन पाणबुड्या दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 23:35 IST

जायकवाडी धरणातील पाणीपातळी खालावल्यानंतर महापालिका प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. धरणातील आपत्कालीन पंप सुरू करण्यात आले आहेत. महापालिका ज्या विहिरीतून पाण्याचा उपसा करते तेथे गाळ, गवत मोठ्या प्रमाणात येत असल्याने पाणी उपसण्यास बराच त्रास होत आहे. रविवारी पुणे येथून दोन पाणबुड्या पाचारण करण्यात आल्या. त्यांच्याकडून गाळ, गवत काढण्याचे काम सुरू करण्यात आले. शहरातील महत्त्वाच्या जलकुंभावर सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत.

ठळक मुद्देजलकुंभावर सुरक्षा : पाणी वाढविण्यासाठी प्रयत्न

औरंगाबाद : जायकवाडी धरणातील पाणीपातळी खालावल्यानंतर महापालिका प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. धरणातील आपत्कालीन पंप सुरू करण्यात आले आहेत. महापालिका ज्या विहिरीतून पाण्याचा उपसा करते तेथे गाळ, गवत मोठ्या प्रमाणात येत असल्याने पाणी उपसण्यास बराच त्रास होत आहे. रविवारी पुणे येथून दोन पाणबुड्या पाचारण करण्यात आल्या. त्यांच्याकडून गाळ, गवत काढण्याचे काम सुरू करण्यात आले. शहरातील महत्त्वाच्या जलकुंभावर सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत.जायकवाडी धरणाची पाणीपातळी मृतसाठ्यात पोहोचली आहे. तेथून मनपाच्या विहिरीपर्यंत पाणी आणण्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागत आहेत. शहराला सध्या १४० एमएलडी पाणी मिळत होते, त्यामध्ये २० एमएलडीची घट झाली आहे. त्यामुळे शहरातील पाणीटंचाई अधिक गंभीर बनली आहे. पाण्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. तीन दिवसांआड पाणीपुरवठा असताना पाच ते सहा दिवसांनी होत आहे. पाण्यासाठी मनपावर मोर्चे, धरणे, आंदोलने होत आहेत. शहराचा पाणीपुरवठा नियंत्रित ठेवण्यासाठी मनपा प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना हाती घेतल्या आहेत. जायकवाडी येथील आपत्कालीन पंपगृहाची दुरुस्ती करून दोन आपत्कालीन पंप सुरू करण्यात आले. तसेच धरणातील पाणी कमी झाल्यामुळे पाण्यात कचरा, गाळ, गवत, शेवाळ येत आहे. ते पंपात व विहिरीत येत असल्याने पाण्याचा दाब कमी होऊन पंप बंद पडत आहेत. अशा परिस्थितीत पंप बंद पडू नये, गवत, कचरा, शेवाळ अडकल्यास तातडीने काढले जावे याकरिता पुणे येथील पाणबुड्या बोलाविण्यात आल्या आहेत. दोन पाणबुड्या साहित्यासह रविवारी जायकवाडीत दाखल झाल्या आहेत. त्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्याचे उपअभियंता किरण धांडे यांनी सांगितले.शहरातील सिडको एन-५, एन-७, कोटला कॉलनी, क्रांतीचौक, शिवाजीनगर, ज्युबिली पार्क, पहाडसिंगपुरा, गारखेडा या प्रमुख जलकुंभांवर नागरिकांकडून आंदोलने, पाणीपुरवठा बंद करणे, टँकर थांबविणे, कर्मचाऱ्यांना मारहाणीच्या घटना घडू नये याकरिता सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.शहरात पाणी वाढविण्यासाठी जलतज्ज्ञ राजेंदत्त होलानी यांची नियुक्ती मनपाने केली आहे. शहरातील वितरण व्यवस्थेवर लक्ष ठेवून तातडीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने होलानी संस्थेच्या तज्ज्ञ कर्मचाऱ्यांना बोलावण्यात येणार आहे. हे कर्मचारी मनपाच्या कर्मचाऱ्यांसोबत शहरात फिरून पाईपलाईनची पाहणी करतील.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater shortageपाणीकपात