शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

गाळ, गवत काढण्यासाठी दोन पाणबुड्या दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 23:35 IST

जायकवाडी धरणातील पाणीपातळी खालावल्यानंतर महापालिका प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. धरणातील आपत्कालीन पंप सुरू करण्यात आले आहेत. महापालिका ज्या विहिरीतून पाण्याचा उपसा करते तेथे गाळ, गवत मोठ्या प्रमाणात येत असल्याने पाणी उपसण्यास बराच त्रास होत आहे. रविवारी पुणे येथून दोन पाणबुड्या पाचारण करण्यात आल्या. त्यांच्याकडून गाळ, गवत काढण्याचे काम सुरू करण्यात आले. शहरातील महत्त्वाच्या जलकुंभावर सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत.

ठळक मुद्देजलकुंभावर सुरक्षा : पाणी वाढविण्यासाठी प्रयत्न

औरंगाबाद : जायकवाडी धरणातील पाणीपातळी खालावल्यानंतर महापालिका प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. धरणातील आपत्कालीन पंप सुरू करण्यात आले आहेत. महापालिका ज्या विहिरीतून पाण्याचा उपसा करते तेथे गाळ, गवत मोठ्या प्रमाणात येत असल्याने पाणी उपसण्यास बराच त्रास होत आहे. रविवारी पुणे येथून दोन पाणबुड्या पाचारण करण्यात आल्या. त्यांच्याकडून गाळ, गवत काढण्याचे काम सुरू करण्यात आले. शहरातील महत्त्वाच्या जलकुंभावर सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत.जायकवाडी धरणाची पाणीपातळी मृतसाठ्यात पोहोचली आहे. तेथून मनपाच्या विहिरीपर्यंत पाणी आणण्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागत आहेत. शहराला सध्या १४० एमएलडी पाणी मिळत होते, त्यामध्ये २० एमएलडीची घट झाली आहे. त्यामुळे शहरातील पाणीटंचाई अधिक गंभीर बनली आहे. पाण्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. तीन दिवसांआड पाणीपुरवठा असताना पाच ते सहा दिवसांनी होत आहे. पाण्यासाठी मनपावर मोर्चे, धरणे, आंदोलने होत आहेत. शहराचा पाणीपुरवठा नियंत्रित ठेवण्यासाठी मनपा प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना हाती घेतल्या आहेत. जायकवाडी येथील आपत्कालीन पंपगृहाची दुरुस्ती करून दोन आपत्कालीन पंप सुरू करण्यात आले. तसेच धरणातील पाणी कमी झाल्यामुळे पाण्यात कचरा, गाळ, गवत, शेवाळ येत आहे. ते पंपात व विहिरीत येत असल्याने पाण्याचा दाब कमी होऊन पंप बंद पडत आहेत. अशा परिस्थितीत पंप बंद पडू नये, गवत, कचरा, शेवाळ अडकल्यास तातडीने काढले जावे याकरिता पुणे येथील पाणबुड्या बोलाविण्यात आल्या आहेत. दोन पाणबुड्या साहित्यासह रविवारी जायकवाडीत दाखल झाल्या आहेत. त्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्याचे उपअभियंता किरण धांडे यांनी सांगितले.शहरातील सिडको एन-५, एन-७, कोटला कॉलनी, क्रांतीचौक, शिवाजीनगर, ज्युबिली पार्क, पहाडसिंगपुरा, गारखेडा या प्रमुख जलकुंभांवर नागरिकांकडून आंदोलने, पाणीपुरवठा बंद करणे, टँकर थांबविणे, कर्मचाऱ्यांना मारहाणीच्या घटना घडू नये याकरिता सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.शहरात पाणी वाढविण्यासाठी जलतज्ज्ञ राजेंदत्त होलानी यांची नियुक्ती मनपाने केली आहे. शहरातील वितरण व्यवस्थेवर लक्ष ठेवून तातडीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने होलानी संस्थेच्या तज्ज्ञ कर्मचाऱ्यांना बोलावण्यात येणार आहे. हे कर्मचारी मनपाच्या कर्मचाऱ्यांसोबत शहरात फिरून पाईपलाईनची पाहणी करतील.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater shortageपाणीकपात