शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

गाळ, गवत काढण्यासाठी दोन पाणबुड्या दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 23:35 IST

जायकवाडी धरणातील पाणीपातळी खालावल्यानंतर महापालिका प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. धरणातील आपत्कालीन पंप सुरू करण्यात आले आहेत. महापालिका ज्या विहिरीतून पाण्याचा उपसा करते तेथे गाळ, गवत मोठ्या प्रमाणात येत असल्याने पाणी उपसण्यास बराच त्रास होत आहे. रविवारी पुणे येथून दोन पाणबुड्या पाचारण करण्यात आल्या. त्यांच्याकडून गाळ, गवत काढण्याचे काम सुरू करण्यात आले. शहरातील महत्त्वाच्या जलकुंभावर सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत.

ठळक मुद्देजलकुंभावर सुरक्षा : पाणी वाढविण्यासाठी प्रयत्न

औरंगाबाद : जायकवाडी धरणातील पाणीपातळी खालावल्यानंतर महापालिका प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. धरणातील आपत्कालीन पंप सुरू करण्यात आले आहेत. महापालिका ज्या विहिरीतून पाण्याचा उपसा करते तेथे गाळ, गवत मोठ्या प्रमाणात येत असल्याने पाणी उपसण्यास बराच त्रास होत आहे. रविवारी पुणे येथून दोन पाणबुड्या पाचारण करण्यात आल्या. त्यांच्याकडून गाळ, गवत काढण्याचे काम सुरू करण्यात आले. शहरातील महत्त्वाच्या जलकुंभावर सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत.जायकवाडी धरणाची पाणीपातळी मृतसाठ्यात पोहोचली आहे. तेथून मनपाच्या विहिरीपर्यंत पाणी आणण्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागत आहेत. शहराला सध्या १४० एमएलडी पाणी मिळत होते, त्यामध्ये २० एमएलडीची घट झाली आहे. त्यामुळे शहरातील पाणीटंचाई अधिक गंभीर बनली आहे. पाण्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. तीन दिवसांआड पाणीपुरवठा असताना पाच ते सहा दिवसांनी होत आहे. पाण्यासाठी मनपावर मोर्चे, धरणे, आंदोलने होत आहेत. शहराचा पाणीपुरवठा नियंत्रित ठेवण्यासाठी मनपा प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना हाती घेतल्या आहेत. जायकवाडी येथील आपत्कालीन पंपगृहाची दुरुस्ती करून दोन आपत्कालीन पंप सुरू करण्यात आले. तसेच धरणातील पाणी कमी झाल्यामुळे पाण्यात कचरा, गाळ, गवत, शेवाळ येत आहे. ते पंपात व विहिरीत येत असल्याने पाण्याचा दाब कमी होऊन पंप बंद पडत आहेत. अशा परिस्थितीत पंप बंद पडू नये, गवत, कचरा, शेवाळ अडकल्यास तातडीने काढले जावे याकरिता पुणे येथील पाणबुड्या बोलाविण्यात आल्या आहेत. दोन पाणबुड्या साहित्यासह रविवारी जायकवाडीत दाखल झाल्या आहेत. त्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्याचे उपअभियंता किरण धांडे यांनी सांगितले.शहरातील सिडको एन-५, एन-७, कोटला कॉलनी, क्रांतीचौक, शिवाजीनगर, ज्युबिली पार्क, पहाडसिंगपुरा, गारखेडा या प्रमुख जलकुंभांवर नागरिकांकडून आंदोलने, पाणीपुरवठा बंद करणे, टँकर थांबविणे, कर्मचाऱ्यांना मारहाणीच्या घटना घडू नये याकरिता सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.शहरात पाणी वाढविण्यासाठी जलतज्ज्ञ राजेंदत्त होलानी यांची नियुक्ती मनपाने केली आहे. शहरातील वितरण व्यवस्थेवर लक्ष ठेवून तातडीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने होलानी संस्थेच्या तज्ज्ञ कर्मचाऱ्यांना बोलावण्यात येणार आहे. हे कर्मचारी मनपाच्या कर्मचाऱ्यांसोबत शहरात फिरून पाईपलाईनची पाहणी करतील.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater shortageपाणीकपात