शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दोन पॅसेंजर रेल्वे मनमाडपर्यंत न जाता केवळ नगरसोल स्टेशनपर्यंतच धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 19:36 IST

राज्यराणी एक्स्प्रेसचा नांदेडपर्यंत विस्तारीकरणाखाली बदल

ठळक मुद्देप्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.  मनमाडला जाणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी या दोन्ही रेल्वे महत्त्वपूर्ण

औरंगाबाद : मुंबई-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस १० जानेवारीपासून नांदेडहून धावणार आहे. प्रवाशांची अनेक महिन्यांची मागणी पूर्ण करताना रेल्वे प्रशासनाने नांदेड-मनमाड पॅसेंजर आणि काचिगुडा-मनमाड पॅसेंजर यापुढे फक्त नगरसोलपर्यंत चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

रेल्वे बोर्डाने मुंबई-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेसच्या नांदेडपर्यंतच्या विस्तारीकरणाला हिरवा कंदिल दिला आहे. मुंबईसाठी प्रवाशांना नवीन रेल्वे मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांकडून समाधान व्यक्त होत असताना रेल्वेचा अजब निर्णय समोर आला आहे. नांदेड-मनमाड पॅसेंजर आणि काचिगुडा-मनमाड पॅसेंजर या दोन रेल्वे धावतात. मनमाडला जाणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी या दोन्ही रेल्वे महत्त्वपूर्ण ठरतात. राज्यराणी एक्स्प्रेसच्या विस्तारीकरणाच्या नावाखाली या दोन्ही रेल्वे आता केवळ नगरसोलपर्यंत चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

दक्षिण मध्य रेल्वेकडून मराठवाड्यावर कायम अन्याय केला जात असल्याची ओरड होते. एक रेल्वे देताना दोन रेल्वेच्या सध्याच्या कनेक्टिव्हिटीत घट केली जात आहे. त्यामुळे रेल्वेकडून होणारा अन्याय दिसून येत असल्याची भावना प्रवाशांमधून व्यक्त होत आहे. या दोन्ही रेल्वोंना मनमाडपासून दूर करण्यास विरोध केला जाणार असल्याचे रेल्वे संघटनांनी सांगितले. मनमाड येथे रेल्वेंची अधिक गर्दी असल्याच्या नावाखाली या रेल्वे नगरसोलपर्यंतच राहतील. यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न केला जात होता. राज्यराणी एक्स्प्रेसच्या विस्तारीकरणानिमित्त हा प्रयत्न पूर्णत्वास नेला जात असल्याचे रेल्वे संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

मनमाडपर्यंत कायम राहाव्या पॅसेंजरनांदेड-मनमाड पॅसेंजर आणि काचिगुडा-मनमाड पॅसेंजर या दोन्ही रेल्वे मनमाडपर्यंत धावल्या पाहिजेत. या रेल्वे केवळ नगरसोलपर्यंत चालविण्यास विरोध केला जाईल, असे रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी म्हणाले. 

टॅग्स :railwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासीNandedनांदेडAurangabadऔरंगाबाद