शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

दोन पॅसेंजर रेल्वे मनमाडपर्यंत न जाता केवळ नगरसोल स्टेशनपर्यंतच धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 19:36 IST

राज्यराणी एक्स्प्रेसचा नांदेडपर्यंत विस्तारीकरणाखाली बदल

ठळक मुद्देप्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.  मनमाडला जाणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी या दोन्ही रेल्वे महत्त्वपूर्ण

औरंगाबाद : मुंबई-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस १० जानेवारीपासून नांदेडहून धावणार आहे. प्रवाशांची अनेक महिन्यांची मागणी पूर्ण करताना रेल्वे प्रशासनाने नांदेड-मनमाड पॅसेंजर आणि काचिगुडा-मनमाड पॅसेंजर यापुढे फक्त नगरसोलपर्यंत चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

रेल्वे बोर्डाने मुंबई-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेसच्या नांदेडपर्यंतच्या विस्तारीकरणाला हिरवा कंदिल दिला आहे. मुंबईसाठी प्रवाशांना नवीन रेल्वे मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांकडून समाधान व्यक्त होत असताना रेल्वेचा अजब निर्णय समोर आला आहे. नांदेड-मनमाड पॅसेंजर आणि काचिगुडा-मनमाड पॅसेंजर या दोन रेल्वे धावतात. मनमाडला जाणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी या दोन्ही रेल्वे महत्त्वपूर्ण ठरतात. राज्यराणी एक्स्प्रेसच्या विस्तारीकरणाच्या नावाखाली या दोन्ही रेल्वे आता केवळ नगरसोलपर्यंत चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

दक्षिण मध्य रेल्वेकडून मराठवाड्यावर कायम अन्याय केला जात असल्याची ओरड होते. एक रेल्वे देताना दोन रेल्वेच्या सध्याच्या कनेक्टिव्हिटीत घट केली जात आहे. त्यामुळे रेल्वेकडून होणारा अन्याय दिसून येत असल्याची भावना प्रवाशांमधून व्यक्त होत आहे. या दोन्ही रेल्वोंना मनमाडपासून दूर करण्यास विरोध केला जाणार असल्याचे रेल्वे संघटनांनी सांगितले. मनमाड येथे रेल्वेंची अधिक गर्दी असल्याच्या नावाखाली या रेल्वे नगरसोलपर्यंतच राहतील. यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न केला जात होता. राज्यराणी एक्स्प्रेसच्या विस्तारीकरणानिमित्त हा प्रयत्न पूर्णत्वास नेला जात असल्याचे रेल्वे संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

मनमाडपर्यंत कायम राहाव्या पॅसेंजरनांदेड-मनमाड पॅसेंजर आणि काचिगुडा-मनमाड पॅसेंजर या दोन्ही रेल्वे मनमाडपर्यंत धावल्या पाहिजेत. या रेल्वे केवळ नगरसोलपर्यंत चालविण्यास विरोध केला जाईल, असे रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी म्हणाले. 

टॅग्स :railwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासीNandedनांदेडAurangabadऔरंगाबाद