शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

मनपातील टीडीआर प्रकरणातील दोघे अखेर निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 15:26 IST

महापालिकेतील नगररचनाच्या शाखा अभियंत्याचा समावेश

औरंगाबाद : मनपाच्या नगररचना विभागातील शाखा अभियंता शिवदास राठोड आणि अनुरेखक मझहर अली यांच्यावर आज निलंबनाची कारवाई केली आहे. मंजूरपुरा येथील बोगस टीडीआर प्रकरणात पोलिसांनी डिसेंबर महिन्यात त्यांना अटक केली होती. त्यांना दोन दिवस न्यायालयीन कोठडी मिळाली होती. या घटनेच्या तब्बल चार महिन्यांनंतर आता पालिका आयुक्तांनी दोघांवर निलंबनाची कारवाई केली.

मनपाच्या विकास आराखड्यात मंजूरपुरा भागातील एका इमारतीचे १४४ चौ. मी. क्षेत्र १२ मीटर रुंद रस्त्यात बाधित झालेले आहे. त्यामुळे पालिकेने २ एप्रिल १९९७ रोजी संबंधित मालमत्ताधारकास ८ लाख २५ हजार रुपये मोबदला अदा केला. मात्र, त्यानंतर २०१६ साली याच मालमत्तेच्या मोबदल्यासाठी पुन्हा टीडीआरची मागणी करण्यात आली. नगररचना विभागातील अधिकाऱ्यांनीही ही संचिका पुढे चालविली. 

तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी पोलिसांत तक्रार देण्याचे आदेश दिले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविला. तपासात नगररचना विभागातील शाखा अभियंता शिवदास राठोड आणि अनुरेखक मझहर अली यांनी आरोपीस मदत व्हावी या उद्देशानेच काम केल्याचा आरोप करून अटक करण्यात आली होती. 

पोलिसांनी ५ डिसेंबर २०१८ रोजी या दोघांनाही अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. ७ डिसेंबर रोजी जामिनावर मुक्तता होऊन हे दोघे बाहेर आले. दुसऱ्या दिवशी पुन्हा ते पालिकेत रुजूही झाले. तब्बल चार महिन्यांनी मनपा आयुक्तांनी या दोघांच्या निलंबनाचे आदेश जारी केले आहेत. 

विलंबाचे गौडबंगाल काय?शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यास कोणत्याही प्रकरणात अटक झाली आणि तो ४८ तासांपेक्षा अधिक काळ पोलीस कोठडीत किंवा तुरुंगात राहिल्यास त्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येते. च्महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ च्या प्रकरण २ मधील नियम ४ मध्ये त्याबाबत स्पष्ट तरतूद आहे. राठोड आणि अली यांना डिसेंबरमध्ये अटक झाली. त्याच वेळी त्यांच्यावर ही कारवाई प्रशासनाने का केली नाही. आता  कारवाई करण्यामागे नेमके गौडबंगाल काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाsuspensionनिलंबनCorruptionभ्रष्टाचार