शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

दोन महिन्यात ११ खून !

By admin | Updated: December 15, 2014 00:44 IST

लातूर:लातूर जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे़ गेल्या दोन महिन्यात ११ खुनाच्या घटना घडल्या आहेत़

लातूर:लातूर जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे़ गेल्या दोन महिन्यात ११ खुनाच्या घटना घडल्या आहेत़ आॅक्टोबर महिन्यात चार तर नोव्हेंबर महिन्यात ७ खून झाले असून, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातही आणखी दोन खून झाले असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे ११ पैकी ३ प्रकरणांत आरोपीही डिटेक्ट झाले नाहीत.लातूर जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढ होत आहे़ चोरी, घरफोडी, अवैध दारु विक्री या बरोबरच खुनाच्या घटनेतही वाढ होत आहे़ आॅक्टोबर महिन्यामध्ये घरगुती कारणावरुन औसा तालुक्यातील उंबडगा येथील पूनम विशाल थोरात या महिलेचा खून झाला़ अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे अनैतिक संबंधाच्या कारणावरुन शिवाजी अदिनाथ नाडागुडे याचा सोनखेड येथे खून झाला़ औसा तालुक्यातील किल्लारी जवळील कुमठा येथे शेतीच्या वादावरुन विनायक जगताप यांचा खून झाला़ रेणापूर येथील लखन चक्रे या व्यक्तीचा पैसे देणे-घेणेच्या कारणावरुन खून झाला़ आॅक्टोबर महिन्यात चार खुनाच्या घटना घडल्या आहेत. आरोपीचा तपास लागण्यास विलंब, परिणामी न्यायालयात खटला दाखल होण्यासही विलंब. त्यामुळे धाक कमी होतो आहे. परिणामी, अशा गंभीर घटना लातूर जिल्ह्यात घडत आहेत.नोव्हेंबर महिन्यामध्ये अहमदपूरमध्ये नवरा-बायकोच्या भांडणावरुन बापानेच नेहा लादेन ऊर्फ हुजू शेख हिचा खून केला़ लातूर शहरातही अनैतिक संबंधावरून अशोक राऊत यांचा खून झाला़ लातूर तालुक्यातील गातेगाव येथे पुजारी नावाच्या तरुणाचा खून झाला आहे. अद्याप त्याचे मारेकरी पोलिसांना सापडले नाहीत. अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील कांचन गणेशराव गच्चे या महिलेचा खून झाला़ शिरुर अनंतपाळ तालुक्यातील बिबराळ येथे जनक हजारे या व्यक्तीचा खून झाला़ देवणी तालुक्यातील रावणगाव येथील बस्वराज आडेप्पा वलूरे या व्यक्तीचा खून झाला आहे. चाकूर तालुक्यातील शिवणखेड येथे कल्पना कमलाकर शिरसाठ या महिलेचा खून झाला असून, महिनाभरात ७ खुनाच्या घटना घडल्या आहेत़ गेल्या २ महिन्यात हा आकडा ११ वर गेला आहे. चोऱ्या तसेच दुचाकीची चोरी आणि आता खुनाच्या घटना घडत असल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)४खुनांच्या संख्येत घट होण्याऐवजी वाढच होत आहे़ लातूर तालुक्यातील १२ नंबर पाटी येथे महेश माळी या व्यक्तीचा ३० हजारांच्या उधारीच्या कारणावरुन विकास गवळी या चिकुर्डा येथील मित्रानेच खून केल्याची घटना घडली. ही घटना ताजी असतानाच तसेच काटगाव परिसरात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला. दुसऱ्या दिवशी याबाबत खुनाचा गुन्हा गातेगाव पोलिसांत दाखल झाला. दोन महिन्यांत ११ खुनाच्या घटना घडल्या असल्या तरी याबाबत अद्याप एकाही प्रकरणात न्यायालयात चार्जशीट दाखल झाली नाही. चार्जशीट दाखल करण्यासाठी तीन महिन्यांचा तपास कालावधी असल्याने चार्जशीट दाखल करण्यास पोलिस प्रशासनाकडून विलंब होत आहे.