शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

विहिरीत दोन मजुरांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 01:14 IST

घाटनांद्रा येथील घटना : आडवे बोअर घेताना घडली दुर्घटना

घाटनांद्रा (जि. औरंगाबाद) : विहिरीत आडवे बोअर घेताना विजेच्या धक्क्याने दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे शनिवारी दुपारी घडली. या दुर्घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.घाटनांद्रा-पेंडगाव रस्त्यावरील दिलीप पुंजाजी गोंधळे यांच्या शेतातील विहिरीला अधिक पाणी लागण्यासाठी त्यांनी आडवे बोअर घेण्याच्या कामाचा शुभारंभ शनिवारी केला. कामाचा पहिलाच दिवस असल्याने विहिरीत सोडलेल्या मशिनरीची पूजा करून काम सुरूकरण्यात आले. विहिरीत कामासाठी उतरत असतानाच वीजप्रवाह असलेल्या वायरचा रमेश सांडू काचोळे (२२) याला धक्का लागला. आपल्या सहकाऱ्याला काय झाले म्हणून पाहावयास गेलेल्या माधवराव हरी थोरात (२५) यालासुद्धा विजेचा धक्का लागून तोही विहिरीत पडला. विजेचा धक्का इतका जबरदस्त होता की, दोघेही जागेवरच गतप्राण झाले.या घटनेची माहिती सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्यावर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. दोन्ही तरुणांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिल्लोड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.गावावर शोककळामरण पावलेले दोघेही तरुण गरीब घराण्यातील असून, रमेश काचोळे यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, भाऊ, एक मुलगा असा परिवार आहे, तर माधवराव थोरात यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील असा परिवार आहे. दोन तरुणांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. दोन्ही घरातील कमावती व्यक्ती गेल्याने दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सदर घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, पोलीस उपनिरीक्षक संदीप तांबे, विकास नोहाटे, गुनावत सोनवणे, मोरे, चारनेरचे पोलीस पाटील, युसूफमिया देशमुख, घाटनांद्रा येथील पोलीस पाटील नासेर तडवी, पीरखॉ तडवी करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू