शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

विहिरीत दोन मजुरांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 01:14 IST

घाटनांद्रा येथील घटना : आडवे बोअर घेताना घडली दुर्घटना

घाटनांद्रा (जि. औरंगाबाद) : विहिरीत आडवे बोअर घेताना विजेच्या धक्क्याने दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे शनिवारी दुपारी घडली. या दुर्घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.घाटनांद्रा-पेंडगाव रस्त्यावरील दिलीप पुंजाजी गोंधळे यांच्या शेतातील विहिरीला अधिक पाणी लागण्यासाठी त्यांनी आडवे बोअर घेण्याच्या कामाचा शुभारंभ शनिवारी केला. कामाचा पहिलाच दिवस असल्याने विहिरीत सोडलेल्या मशिनरीची पूजा करून काम सुरूकरण्यात आले. विहिरीत कामासाठी उतरत असतानाच वीजप्रवाह असलेल्या वायरचा रमेश सांडू काचोळे (२२) याला धक्का लागला. आपल्या सहकाऱ्याला काय झाले म्हणून पाहावयास गेलेल्या माधवराव हरी थोरात (२५) यालासुद्धा विजेचा धक्का लागून तोही विहिरीत पडला. विजेचा धक्का इतका जबरदस्त होता की, दोघेही जागेवरच गतप्राण झाले.या घटनेची माहिती सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्यावर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. दोन्ही तरुणांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिल्लोड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.गावावर शोककळामरण पावलेले दोघेही तरुण गरीब घराण्यातील असून, रमेश काचोळे यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, भाऊ, एक मुलगा असा परिवार आहे, तर माधवराव थोरात यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील असा परिवार आहे. दोन तरुणांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. दोन्ही घरातील कमावती व्यक्ती गेल्याने दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सदर घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, पोलीस उपनिरीक्षक संदीप तांबे, विकास नोहाटे, गुनावत सोनवणे, मोरे, चारनेरचे पोलीस पाटील, युसूफमिया देशमुख, घाटनांद्रा येथील पोलीस पाटील नासेर तडवी, पीरखॉ तडवी करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू