शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

विहिरीत दोन मजुरांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 01:14 IST

घाटनांद्रा येथील घटना : आडवे बोअर घेताना घडली दुर्घटना

घाटनांद्रा (जि. औरंगाबाद) : विहिरीत आडवे बोअर घेताना विजेच्या धक्क्याने दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे शनिवारी दुपारी घडली. या दुर्घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.घाटनांद्रा-पेंडगाव रस्त्यावरील दिलीप पुंजाजी गोंधळे यांच्या शेतातील विहिरीला अधिक पाणी लागण्यासाठी त्यांनी आडवे बोअर घेण्याच्या कामाचा शुभारंभ शनिवारी केला. कामाचा पहिलाच दिवस असल्याने विहिरीत सोडलेल्या मशिनरीची पूजा करून काम सुरूकरण्यात आले. विहिरीत कामासाठी उतरत असतानाच वीजप्रवाह असलेल्या वायरचा रमेश सांडू काचोळे (२२) याला धक्का लागला. आपल्या सहकाऱ्याला काय झाले म्हणून पाहावयास गेलेल्या माधवराव हरी थोरात (२५) यालासुद्धा विजेचा धक्का लागून तोही विहिरीत पडला. विजेचा धक्का इतका जबरदस्त होता की, दोघेही जागेवरच गतप्राण झाले.या घटनेची माहिती सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्यावर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. दोन्ही तरुणांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिल्लोड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.गावावर शोककळामरण पावलेले दोघेही तरुण गरीब घराण्यातील असून, रमेश काचोळे यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, भाऊ, एक मुलगा असा परिवार आहे, तर माधवराव थोरात यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील असा परिवार आहे. दोन तरुणांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. दोन्ही घरातील कमावती व्यक्ती गेल्याने दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सदर घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, पोलीस उपनिरीक्षक संदीप तांबे, विकास नोहाटे, गुनावत सोनवणे, मोरे, चारनेरचे पोलीस पाटील, युसूफमिया देशमुख, घाटनांद्रा येथील पोलीस पाटील नासेर तडवी, पीरखॉ तडवी करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू