शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

‘जायकवाडी’चे दोन दरवाजे उघडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 04:11 IST

दुष्काळी भागातील पाणीप्रश्नावर मात करण्यासाठी पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाचे दोन दरवाजे गुरुवारी उघडून गोदावरी नदीच्या पात्रात १०४८ क्युसेक पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली.

औरंगाबाद : दुष्काळी भागातील पाणीप्रश्नावर मात करण्यासाठी पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाचे दोन दरवाजे गुरुवारी उघडूनगोदावरी नदीच्या पात्रात १०४८ क्युसेक पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. या पाण्यातून गोदावरी नदीवरील बंधारे भरण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या आदेशानंतर नाथसागरातून पाणी सोडण्यात येत आहे.नगर आणि नाशिक जिल्ह्यांत गेल्या पंधरा दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा ९१ टक्क्यांपर्यंत पोचला आहे. परंतु, मराठवाड्यात अद्याप पुरेसा पाऊस पडलेला नसल्यामुळे खरिपाची पिके जगविण्याबरोबर पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झाले आहे.नाथसागर भरत आलेला असताना मध्य गोदावरी खोऱ्यात दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे नाथसागरातून पाणी सोडून गेदावरी नदीवरील बंधारे भरण्याची मागणी करण्यात आली होती.गुरुवारी प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा ९१.९९ टक्क्यांपर्यंत पोहोचला. त्यानंतर दुपारी नाथसागराच्या दोन दरवाजांमधून १०४८ क्युसेक पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. त्याशिवाय प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून १२०० क्युसेक, उजव्या कालव्यातून ९०० क्युसेक आणि जलविद्युत प्रकल्पासाठी १५८९ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरण