शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दोन दिवसांनंतर वाळूजचा पाणीपुरवठा पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 17:25 IST

वाळूज महानगर: मुख्य जलवाहिनी फुटल्याने वाळूज उद्योगनगरीसह नागरी वसाहती पाण्याचा ठणठणाट होता. त्यामुळे उद्योजकांसह नागरिकांची मोठी गैरसोय झाली. एमआयडीसीने जलवाहिनीची दुरुस्ती करुन रविवारी दुपारी या भागाचा पाणीपुरवठा सुरु केला. दोन दिवसांनंतर पाणीपुरवठा पूर्ववत झाल्याने उद्योजक व नागरिकांचा जिव भांड्यात पडला आहे.

वाळूज महानगर: मुख्य जलवाहिनी फुटल्याने वाळूज उद्योगनगरीसह नागरी वसाहती पाण्याचा ठणठणाट होता. त्यामुळे उद्योजकांसह नागरिकांची मोठी गैरसोय झाली. एमआयडीसीने जलवाहिनीची दुरुस्ती करुन रविवारी दुपारी या भागाचा पाणीपुरवठा सुरु केला. दोन दिवसांनंतर पाणीपुरवठा पूर्ववत झाल्याने उद्योजक व नागरिकांचा जिव भांड्यात पडला आहे.

वाळूज औद्योगिक क्षेत्रासह परिसरातील नागरी वसाहतींना एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. शुक्रवारी ब्रम्हगव्हाण येथील पाणी उपसा केंद्राजवळ मुख्य जवाहिनी फुटल्याने या भागाचा पाणीपुरवठा बंद झाला.

दोन दिवसांपासून उद्योगांसह नागरी वसाहतीत पाण्याची बोंब सुरु असल्याने उद्योजक व नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. बहुतांश उद्योगांनी जमा करुन ठेवलेल्या पाण्यावर एक दिवस धकविला. मात्र, दुसऱ्या दिवशी चांगलीच तारांबळ उडाली. उद्योजकांना टँकरने विकत पाणी घ्यावे लागल्याने आर्थिक झळ सोसावी लागली. तसेच अनेक गावांतील रहिवाशांचेही हाल झाले. अखेर दोन दिवसांनंतर एमआयडीसीने जलवाहिनीची दुरुस्ती करुन रविवारी दुपारनंतर पाणीपुरवठा सुरु केला.

एमआयडीसीचे सहाय्यक अभियंता दिलीप परळीकर म्हणाले की, फुटलेल्या जलवाहिनी दुुरुस्ती करण्यात आली आहे. वाळूज एमआयडीसीतील नागरी वसाहतीसह उद्योगांचा पाणीपुरवठा सुरु केला आहे. लेव्हल भरण्याचे काम सुरु आहे. सायंकाळपर्यंत चिकलठाणा व शेंद्रा एमआयडीसीचा पाणीपुरवठा सुरु होईल, असे ते म्हणाले.

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबादWaluj MIDCवाळूज एमआयडीसी