शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

औरंगाबादमध्ये दीपावलीत तब्बल अडीच हजार वाहनांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 13:29 IST

मागील वर्षापर्यंत मंदीत असलेल्या वाहन बाजाराचा मागील सप्टेंबर महिन्यापासून विक्रीचा वेग वाढला आहे.

ठळक मुद्देनवीन  ४००  चारचाकी, २००० दुचाकी रस्त्यावर

- प्रशांत तेलवाडकर

औरंगाबाद :  यंदाचा दसरा-दिवाळी सण वाहन उद्योगासाठी संजीवनी ठरला. दिवाळीतील मुहूर्तावर नवीन ४०० कार व २००० दुचाकी विक्री झाल्याची माहिती चेंबर ऑफ ऑथोराईज ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनकडून प्राप्त झाली आहे. 

मागील वर्षापर्यंत मंदीत असलेल्या वाहन बाजाराचा मागील सप्टेंबर महिन्यापासून विक्रीचा वेग वाढला आहे. दिवाळी संपली तरी हा वेग कायम आहे. कारण, कार विक्रीत अजूनही महिना, दोन महिन्यांची वेटिंग सुरू आहे.  सर्व कंपन्याच्या मिळून ४०० कार व २००० दुचाकींची विक्री झाली.  कार उपलब्ध असत्या तर  या दिवाळीत ७०० कार विक्री झाल्या असत्या, असा दावा कार वितरकांनी केला आहे. नवरात्र ते दसऱ्यादरम्यान ४८०० दुचाकी व ७०० कार विक्री झाल्या होत्या. शहरात विविध कंपन्यांच्या सुमारे ४ ते ७५ लाख रुपयांपर्यंतच्या कार उपलब्ध आहेत. त्यातील ५ लाख ते १० लाखांदरम्यानच्या कार विक्रीचे प्रमाण ७० टक्के होते. ५० हजार ते १ लाख रुपयांदरम्यान दुचाकी मिळत आहेत. त्यातील ५० ते ७० हजारांदरम्यानच्या दुचाकी विक्रीचे प्रमाण ७० टक्के आहे.

सणामुळे वाहन बाजाराला गती कोरोनामुळे सार्वजनिक ठिकाणी वावरताना मर्यादा आल्या आहेत. सोशल डिस्टन्स पाळण्यासाठी स्वतःच्या वाहनतच प्रवास करण्याची मानसिकता तयार झाली. दसरा- दिवाळीनिमित्त वाहन विक्रीच्या आकडेवारीवरून प्रचीती आली. -राहुल पगरिया, अध्यक्ष, चेंबर ऑफ ऑथोराईज आटोमोबाईल 

ग्रामीण भागातून दुचाकीला मागणीगतवर्षी बाजारात आर्थिक मंदी होती. त्यामुळे बाजारात उलाढालदेखील समाधानकारक झाली नव्हती. त्यातच यंदा कोरोनाचे संकट आल्याने बाजारात तसा उत्साह नव्हता. याचा दुचाकी विक्रीवर मोठा परिणाम होईल, असे वाटले होते; पण शहराप्रमाणे ग्रामीण भागातून  मोठ्या प्रमाणात दुचाकी विक्री झाली आहे. सुरक्षिततेच्या कारणामुळे यंदा ग्रामीण भागातून दुचाकीला मागणी वाढली आहे.- दीपक झुणझुणवाला, दुचाकी वितरक

मी हॉस्पिटलमध्ये काम करते. माझे घर व हॉस्पिटलमध्ये ५ कि.मी.चे अंतर आहे. मी पूर्वी शेअरिंग रिक्षात प्रवास करत असे; पण कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळणे महत्त्वाचे झाले आहे. यासाठी मी स्वतःची दुचाकी खरेदी केली. -प्रियंका देशमुख, दुचाकी ग्राहक, उल्कानगरी

सार्वजनिक वाहनातून प्रवास करणे म्हणजे कोरोनाला आमंत्रणच. यामुळे मी स्वतःची कार खरेदी केली आहे. वाळूज परिसरात कंपनीत जाताना किंवा कामानिमित्त गावाकडे जाण्यासाठी कारद्वारे सुरक्षित प्रवास करता येत आहे.  -प्रसन्न दहीभाते, ग्राहक, ज्योतीनगर 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2022Aurangabadऔरंगाबादbikeबाईक