शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये दीपावलीत तब्बल अडीच हजार वाहनांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 13:29 IST

मागील वर्षापर्यंत मंदीत असलेल्या वाहन बाजाराचा मागील सप्टेंबर महिन्यापासून विक्रीचा वेग वाढला आहे.

ठळक मुद्देनवीन  ४००  चारचाकी, २००० दुचाकी रस्त्यावर

- प्रशांत तेलवाडकर

औरंगाबाद :  यंदाचा दसरा-दिवाळी सण वाहन उद्योगासाठी संजीवनी ठरला. दिवाळीतील मुहूर्तावर नवीन ४०० कार व २००० दुचाकी विक्री झाल्याची माहिती चेंबर ऑफ ऑथोराईज ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनकडून प्राप्त झाली आहे. 

मागील वर्षापर्यंत मंदीत असलेल्या वाहन बाजाराचा मागील सप्टेंबर महिन्यापासून विक्रीचा वेग वाढला आहे. दिवाळी संपली तरी हा वेग कायम आहे. कारण, कार विक्रीत अजूनही महिना, दोन महिन्यांची वेटिंग सुरू आहे.  सर्व कंपन्याच्या मिळून ४०० कार व २००० दुचाकींची विक्री झाली.  कार उपलब्ध असत्या तर  या दिवाळीत ७०० कार विक्री झाल्या असत्या, असा दावा कार वितरकांनी केला आहे. नवरात्र ते दसऱ्यादरम्यान ४८०० दुचाकी व ७०० कार विक्री झाल्या होत्या. शहरात विविध कंपन्यांच्या सुमारे ४ ते ७५ लाख रुपयांपर्यंतच्या कार उपलब्ध आहेत. त्यातील ५ लाख ते १० लाखांदरम्यानच्या कार विक्रीचे प्रमाण ७० टक्के होते. ५० हजार ते १ लाख रुपयांदरम्यान दुचाकी मिळत आहेत. त्यातील ५० ते ७० हजारांदरम्यानच्या दुचाकी विक्रीचे प्रमाण ७० टक्के आहे.

सणामुळे वाहन बाजाराला गती कोरोनामुळे सार्वजनिक ठिकाणी वावरताना मर्यादा आल्या आहेत. सोशल डिस्टन्स पाळण्यासाठी स्वतःच्या वाहनतच प्रवास करण्याची मानसिकता तयार झाली. दसरा- दिवाळीनिमित्त वाहन विक्रीच्या आकडेवारीवरून प्रचीती आली. -राहुल पगरिया, अध्यक्ष, चेंबर ऑफ ऑथोराईज आटोमोबाईल 

ग्रामीण भागातून दुचाकीला मागणीगतवर्षी बाजारात आर्थिक मंदी होती. त्यामुळे बाजारात उलाढालदेखील समाधानकारक झाली नव्हती. त्यातच यंदा कोरोनाचे संकट आल्याने बाजारात तसा उत्साह नव्हता. याचा दुचाकी विक्रीवर मोठा परिणाम होईल, असे वाटले होते; पण शहराप्रमाणे ग्रामीण भागातून  मोठ्या प्रमाणात दुचाकी विक्री झाली आहे. सुरक्षिततेच्या कारणामुळे यंदा ग्रामीण भागातून दुचाकीला मागणी वाढली आहे.- दीपक झुणझुणवाला, दुचाकी वितरक

मी हॉस्पिटलमध्ये काम करते. माझे घर व हॉस्पिटलमध्ये ५ कि.मी.चे अंतर आहे. मी पूर्वी शेअरिंग रिक्षात प्रवास करत असे; पण कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळणे महत्त्वाचे झाले आहे. यासाठी मी स्वतःची दुचाकी खरेदी केली. -प्रियंका देशमुख, दुचाकी ग्राहक, उल्कानगरी

सार्वजनिक वाहनातून प्रवास करणे म्हणजे कोरोनाला आमंत्रणच. यामुळे मी स्वतःची कार खरेदी केली आहे. वाळूज परिसरात कंपनीत जाताना किंवा कामानिमित्त गावाकडे जाण्यासाठी कारद्वारे सुरक्षित प्रवास करता येत आहे.  -प्रसन्न दहीभाते, ग्राहक, ज्योतीनगर 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2022Aurangabadऔरंगाबादbikeबाईक