शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

नळावर पाणी भरण्याच्या वादातून खून; दोघांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 17:30 IST

two accused got life imprisonment in murder case over water supply dispute

औरंगाबाद : नळावर पाणी भरण्याच्या वादातून झालेल्या अण्णासाहेब बनसोडे यांच्या खुनाच्या आरोपाखाली सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी प्रकाश हरिश्चंद्र भुजंग आणि अमोल चाबूकस्वार या दोघांना जन्मठेप आणि प्रत्येकी २५ हजार रुपये दंड ठोठावला.

गावातील नळावर पाणी भरण्याच्या वादातून आणि शेतीच्या जुन्या वादावरून ३१ आॅगस्ट २०११ रोजी पैठण तालुक्यातील नांदलगाव येथील अण्णासाहेब बनसोडे यांचा सय्यद निसार सय्यद हबीब (३२), प्रकाश हरिश्चंद्र भुजंग (२९), अमोल रघुनाथ चाबूकस्वार (३५) आणि सय्यद हबीब सय्यद अहमद या चौघांसोबत वाद झाला होता. त्या चौघांनी शिवीगाळ करून लोखंडी फायटर आणि लाकडी दांड्याने मारहाण करून अण्णासाहेब यांना जखमी केल होते. त्यांना उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल केले असता उपचार सुरू असताना १ सप्टेंबर २०११ रोजी ते मरण पावले. यासंदर्भात त्यांची पत्नी राधाबाई यांनी बिडकीन पोलीस ठाण्यात तक्रारीत दिली होती. त्यावरून वरील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोकअभियोक्ता ज्ञानेश्वरी नागुला यांनी १४ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यामध्ये फिर्यादीसह दोघे जण फितूर झाले. न्यायालयाने प्रकाश भुजंग आणि अमोल चाबूकस्वार या दोघांना भादंवि कलम ३०२ अन्वये जन्मठेप आणि प्रत्येकी २५ हजार रुपये दंड ठोठावला, तसेच कलम ३२४ अन्वये एक वर्ष सश्रम कारावास आणि प्रत्येकी ५ हजार रुपये दंडा ठोठावला. सय्यद निसार आणि सय्यद हबीब या दोघांना न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले.