शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

नळावर पाणी भरण्याच्या वादातून खून; दोघांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 17:30 IST

two accused got life imprisonment in murder case over water supply dispute

औरंगाबाद : नळावर पाणी भरण्याच्या वादातून झालेल्या अण्णासाहेब बनसोडे यांच्या खुनाच्या आरोपाखाली सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी प्रकाश हरिश्चंद्र भुजंग आणि अमोल चाबूकस्वार या दोघांना जन्मठेप आणि प्रत्येकी २५ हजार रुपये दंड ठोठावला.

गावातील नळावर पाणी भरण्याच्या वादातून आणि शेतीच्या जुन्या वादावरून ३१ आॅगस्ट २०११ रोजी पैठण तालुक्यातील नांदलगाव येथील अण्णासाहेब बनसोडे यांचा सय्यद निसार सय्यद हबीब (३२), प्रकाश हरिश्चंद्र भुजंग (२९), अमोल रघुनाथ चाबूकस्वार (३५) आणि सय्यद हबीब सय्यद अहमद या चौघांसोबत वाद झाला होता. त्या चौघांनी शिवीगाळ करून लोखंडी फायटर आणि लाकडी दांड्याने मारहाण करून अण्णासाहेब यांना जखमी केल होते. त्यांना उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल केले असता उपचार सुरू असताना १ सप्टेंबर २०११ रोजी ते मरण पावले. यासंदर्भात त्यांची पत्नी राधाबाई यांनी बिडकीन पोलीस ठाण्यात तक्रारीत दिली होती. त्यावरून वरील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोकअभियोक्ता ज्ञानेश्वरी नागुला यांनी १४ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यामध्ये फिर्यादीसह दोघे जण फितूर झाले. न्यायालयाने प्रकाश भुजंग आणि अमोल चाबूकस्वार या दोघांना भादंवि कलम ३०२ अन्वये जन्मठेप आणि प्रत्येकी २५ हजार रुपये दंड ठोठावला, तसेच कलम ३२४ अन्वये एक वर्ष सश्रम कारावास आणि प्रत्येकी ५ हजार रुपये दंडा ठोठावला. सय्यद निसार आणि सय्यद हबीब या दोघांना न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले.