शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
2
धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
3
पाकिस्तानने पुन्हा गरळ ओकली; श्रीराम मंदिराच्या धार्मिक ध्वजावरुन संयुक्त राष्ट्रांना केलं आवाहन
4
Swiggy, Zomato आणि ओला-उबर महागणार? नवीन कायद्यामुळे ग्राहकांना सोसावा लागणार भुर्दंड!
5
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
6
Tata Sierra : २२ वर्षांनंतर 'लेजेंड इज बॅक'... Tata नं लाँच केली मोस्ट अवेटेड Sierra; कोणते मिळणार फीचर्स, किंमत किती?
7
"…तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या"; पंकजा मुंडेंनी गौरी पालवेंच्या आईवडिलांना काय सांगितलं?
8
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: मार्गशीर्षातले ४ गुरुवार 'अशी' करा स्वामी उपासना; दुप्पट लाभ होईल!
9
Sheikh Hasina: नऊ किलो सोनं, महागड्या आणि मौल्यवान वस्तू; शेख हसीना यांच्या लॉकरमध्ये सापडलं मोठं घबाड!
10
'नॅशनल क्रश' गिरीजा ओकला येतायेत विचित्र मेसेज; म्हणाली, "मला रेट विचारला जात आहे..."
11
IND vs SA : टीम इंडियानं घरच्या मैदानात गुडघे टेकल्यावर नेटकऱ्यांना आठवला विराट; गंभीर होतोय ट्रोल
12
"प्रभू श्रीराम सगळ्यांचे... मी दलित म्हणून मला बोलवलं नाही"; अयोध्या खासदाराचा नाराजीचा सूर
13
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
14
Ahilyanagar: मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून बेदम मारहाण!
15
Apple नंतर ही कम्प्युटर बनवणारी 'ही' दिग्गज कंपनी ६००० कर्मचाऱ्यांची कपात करणार, का घेतला हा मोठा निर्णय?
16
१० वर्षांत १ कोटींचा टप्पा गाठायचा आहे? SIP द्वारे कोणत्या फंडात आणि किती गुंतवणूक करणे फायदेशीर!
17
महालक्ष्मी व्रतकथा: महालक्ष्मी व्रत कथेशिवाय पूजा अपूर्ण; पती-पत्नीने मिळून वाचल्यास मिळते अधिक फळ!
18
घटस्फोट, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणानंतर सेलिना जेटलीची पहिली पोस्ट; म्हणाली, "माझी मुलं..."
19
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
20
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
Daily Top 2Weekly Top 5

वीस तासांचे भारनियमन बंद करा ; अन्यथा उद्योगांचा पाणीपुरवठा बंद करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 13:38 IST

गंगापूर आणि पैठण तालुक्यातील गोदाकाठच्या गावात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने वीस तासांचे भारनियमन सुरु आहे

कायगाव (औरंगाबाद ) : गंगापूर आणि पैठण तालुक्यातील गोदाकाठच्या गावात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सुरू केलेले वीस तासांचे भारनियमन रद्द करण्याच्या मागणीसाठी दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांनी बुधवारी (दि.२३ ) रात्री विभागीय आयुक्तांना निवेदन दिले. तात्काळ वीजपुरवठा सुरळीत केला नाही तर नाईलाजाने जायकवाडीतुन उद्योगाला होणारा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. 

गोदापात्रातून होणारा अधिकृत पाणीउपसा कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दररोज फक्त चार तास वीजपुरवठा करण्याचे आदेश दिल्याने  बॅकवॉटर परिसरात महावितरण कंपनीने गेल्या आठ दिवसांपासून दररोज वीस तासांचे भारनियमन सुरू केले आहे. त्यामुळे गोदावरी काठावरील दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांची शेती धोक्यात आली आहे. वीज पुरवठा कमी केल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे पीक पाण्याअभावी  वाया जाण्याची भीती आहे. 

याबाबत विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांची या भागातील शेतकऱ्यांनी भेट घेतली.  चार तास होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांनी पिकं कशी जतन करावी असा सवाल विभागीय आयुक्तांना विचारण्यात आला. गहू, ज्वारी, कांदा, आणि चारा पिके यांना जतन करण्यासाठी शेतकऱ्यांना किमान आठ तास वीज आवश्यक आहे. या भागातील  शेतकऱ्यांनी कर्ज काढुन पीके उभी केली असून पाण्याअभावी ही पिके हातून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे असे सांगितले.

प्रशासनाने तात्काळ आठ तासांचा सुरळीत वीजपुरवठा न केल्यास शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला. शेतीला उद्योगाच्या अगोदर प्राधान्याने पाणीपुरवठा करण्याचे शासनाचे धोरण आहे. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत उद्योगाला होणारा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तात्काळ महावितरण आणि संबंधित विभागाची संयुक्त बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावला जाईल असे आश्वासन आयुक्त भापकर यांनी दिले. 

या वेळी अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजी सूर्यवंशी, प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब शेळके, शेकापचे महेश गुजर, मिलिंद पाटील, शेतकरी नेते पी.आर.जाधव, संजय गायकवाड, शिवबा संघटनेचे देविदास पाठे, पांडुरंग चव्हाण, राहुल पारखे, सर्फराज पठाण, बाबुराव केकते, संतोष एरंडे आदींसह गंगापूर आणि पैठणचे शेतकरी हजर होते.

टॅग्स :agitationआंदोलनFarmerशेतकरीagricultureशेती