शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

वीस तासांचे भारनियमन बंद करा ; अन्यथा उद्योगांचा पाणीपुरवठा बंद करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 13:38 IST

गंगापूर आणि पैठण तालुक्यातील गोदाकाठच्या गावात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने वीस तासांचे भारनियमन सुरु आहे

कायगाव (औरंगाबाद ) : गंगापूर आणि पैठण तालुक्यातील गोदाकाठच्या गावात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सुरू केलेले वीस तासांचे भारनियमन रद्द करण्याच्या मागणीसाठी दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांनी बुधवारी (दि.२३ ) रात्री विभागीय आयुक्तांना निवेदन दिले. तात्काळ वीजपुरवठा सुरळीत केला नाही तर नाईलाजाने जायकवाडीतुन उद्योगाला होणारा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. 

गोदापात्रातून होणारा अधिकृत पाणीउपसा कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दररोज फक्त चार तास वीजपुरवठा करण्याचे आदेश दिल्याने  बॅकवॉटर परिसरात महावितरण कंपनीने गेल्या आठ दिवसांपासून दररोज वीस तासांचे भारनियमन सुरू केले आहे. त्यामुळे गोदावरी काठावरील दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांची शेती धोक्यात आली आहे. वीज पुरवठा कमी केल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे पीक पाण्याअभावी  वाया जाण्याची भीती आहे. 

याबाबत विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांची या भागातील शेतकऱ्यांनी भेट घेतली.  चार तास होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांनी पिकं कशी जतन करावी असा सवाल विभागीय आयुक्तांना विचारण्यात आला. गहू, ज्वारी, कांदा, आणि चारा पिके यांना जतन करण्यासाठी शेतकऱ्यांना किमान आठ तास वीज आवश्यक आहे. या भागातील  शेतकऱ्यांनी कर्ज काढुन पीके उभी केली असून पाण्याअभावी ही पिके हातून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे असे सांगितले.

प्रशासनाने तात्काळ आठ तासांचा सुरळीत वीजपुरवठा न केल्यास शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला. शेतीला उद्योगाच्या अगोदर प्राधान्याने पाणीपुरवठा करण्याचे शासनाचे धोरण आहे. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत उद्योगाला होणारा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तात्काळ महावितरण आणि संबंधित विभागाची संयुक्त बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावला जाईल असे आश्वासन आयुक्त भापकर यांनी दिले. 

या वेळी अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजी सूर्यवंशी, प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब शेळके, शेकापचे महेश गुजर, मिलिंद पाटील, शेतकरी नेते पी.आर.जाधव, संजय गायकवाड, शिवबा संघटनेचे देविदास पाठे, पांडुरंग चव्हाण, राहुल पारखे, सर्फराज पठाण, बाबुराव केकते, संतोष एरंडे आदींसह गंगापूर आणि पैठणचे शेतकरी हजर होते.

टॅग्स :agitationआंदोलनFarmerशेतकरीagricultureशेती