शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

केबल टाकण्यासाठी सहा तास वीज बंद

By admin | Updated: June 13, 2017 01:05 IST

औरंगाबाद : महावितरण कंपनीने कुठलीही पूर्वसूचना न देता शहर विभाग-२ अंतर्गत येणाऱ्या परिसराचा वीजपुरवठा केबल बदलण्यासाठी सहा तास खंडित केला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महावितरण कंपनीने कुठलीही पूर्वसूचना न देता शहर विभाग-२ अंतर्गत येणाऱ्या परिसराचा वीजपुरवठा केबल बदलण्यासाठी सहा तास खंडित केला. परिणामी नागरिकांना दमट वातावरणामुळे उकाड्याने त्रस्त व्हावे लागले.फ्यूज कॉल सेंटरला याबाबत विचारणा केली असता रोज सहा तास वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. टप्प्या-टप्प्याने वायरिंग बदलण्यात येत असल्याचे कॉल सेंटरवरून सांगण्यात आले. ही कामे उन्हाळ्यात का केली नाहीत, असा सवाल वीज ग्राहकांनी केला असता पावसाळ्याच्या तोंडावर दुरस्तीची कामे केली जातात असे ग्राहकांना फ्यूज कॉल सेंटरवरून सांगण्यात आले. सकाळी पहिल्या टप्प्यात ९ वाजेपासूनच विजेचा लपंडाव सुरू झाल्याने पुंडलिकनगरमधील ग्राहकांनी कंपनी कार्यालयाशी संपर्क केल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत झाला. त्यानंतर १२ वा. वीजपुरवठा बंद करण्यात आला. दिवसभर नागरिकांना विजेअभावी उकाड्याचा सामना करावा लागला. ट्री कटिंगसाठी तीन तासांचे सक्तीचे लोडशेडिंग दर शुक्रवारी केले जाते; मात्र सोमवारी अचानक वीजपुरवठा सहा तासांसाठी बंद केल्याने नागरिकांचे हाल झाले. सायंकाळी ६ वा. वीजपुरवठा सुरळीत करण्यात आल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. पावसाळा सुरू झाला आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. कंपनी दीड महिन्यापासून मान्सूनपूर्व कामे करीत आहे; परंतु अजूनही ती कामे पूर्ण न झाल्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावरच विजेचा लपंडाव सुरू आहे.