शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआयचा तुघलकी कारभार; ३ तासांची प्रश्नपत्रिका, सोडवून घेतली ५० मिनिटांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 12:59 IST

Tughlaq management of ITI आयटीआय प्रशासनाने जेनरेटरची सोय केली नव्हती ही चूक त्यांची असताना नाहक विद्यार्थ्यांचा बळी दिला जातोय, अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.

ठळक मुद्देविद्यार्थी वर्गाबाहेर आले आणि त्यांनी जाब विचारला असता आयटीआयच्या वतीने कुणीही उत्तर द्यायला तयार नव्हतेएवढेच नव्हे तर केंद्राबाहेर विद्यार्थ्यांना हाकलून दिले आणि गेटला सील करून टाकले.

औरंगाबाद : आयटीआय केंद्रात मेकॅनिकल विभागाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ३ तासांऐवजी अवघ्या ५० मिनिटांत गुंडाळण्याचा तुघलकी कारभार मंगळवारी समोर आला आहे.

मेकॅनिकल विभागाच्या प्रथम वर्षाची ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. संतापजनक प्रकार म्हणजे या ऑनलाइन परीक्षेचा अवधी ३ तासांचा होता. परीक्षा दुपारी २ ते ५ असा वेळ हॉल तिकिटावर देण्यात आला होता. आयटीआयच्या परीक्षा विभागाने दुपारी मुलांची ऑनलाइन परीक्षा सुरू केली. परीक्षा सुरू होताच २५ मिनिटांनी वीज गेली. वीज जाताच पर्यवेक्षकांनी विद्यार्थ्यांना सूचना केली की, वीज गेलेली असल्याने तुम्हाला केवळ २० मिनिटांमध्ये ऑनलाइन उत्तरपत्रिका सबमिट करावी लागेल. विद्यार्थ्यांना प्रश्न पडला होता ३ तासांची प्रश्नपरीक्षा अवघ्या ५० मिनिटांमध्ये कशी सोडवावी? कारण त्यांचे प्रश्नसुद्धा पाहून झाले नव्हते. मुलांनी विचारणा केली असता त्यांना सांगण्यात आले संगणकाचा बॅकअप फक्त २० मिनिटे चालू शकतो. बॅकअप २० मिनिटांत संपला तर ऑनलाइन परीक्षेची उत्तरपत्रिका सबमिट करता येणार नाही आणि पर्यवेक्षकांनी विद्यार्थ्यांना अवघ्या ५० मिनिटांत पेपर सोडवायला लावला. लगेच विद्यार्थ्यांचे संगणक बंद करून त्यांना बाहेर हुसकावून लावले.

विद्यार्थी वर्गाबाहेर आले आणि त्यांनी जाब विचारला असता आयटीआयच्या वतीने कुणीही उत्तर द्यायला तयार नव्हते, एवढेच नव्हे तर केंद्राबाहेर विद्यार्थ्यांना हाकलून दिले आणि गेटला सील करून टाकले. तीन तासांचा पेपर ५० मिनिटांमध्ये कसा सोडवता येईल. त्यामुळे आम्ही या परीक्षेत नापास होणार आहोत. त्यामुळे आजची घेतलेली परीक्षा रद्द करून पुन्हा तीन तासांचा अवधी देऊन परीक्षा घ्यावी, अशी विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे. आयटीआय विभागाला कळायला हवे होते ऑनलाइन परीक्षा आहे. वीज गेली तर जेनरेटरची पर्यायी सोय करायला हवी होती. मात्र, ही सोय नसल्याने अडचण निर्माण झाली. आयटीआय प्रशासनाने जेनरेटरची सोय केली नव्हती ही चूक त्यांची असताना नाहक विद्यार्थ्यांचा बळी दिला जातोय, अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थीexamपरीक्षा