शहरं
Join us  
Trending Stories
1
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
2
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
3
स्मृती मंधानाचा ट्रॉफी सोबतचा फोटो, हातावर टॅटू..., होणारा नवरा पलाश मुच्छलची पोस्ट व्हायरल
4
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा
5
VIDEO: "दीदी, हा कप तुमच्यासाठी....", हरमनप्रीतचा माजी दिग्गजांसोबत मैदानात जल्लोष
6
व्होडाफोन आयडियाला पुन्हा अच्छे दिन येणार? अमेरिकेन कंपनी गुंतवणूक करण्याच्या तयारीत; पण एका अटीवर
7
एका पैशाचा खर्च नाही, संकटे-समस्या संपतील; २१ दिवस १ मंत्राचा जप करा, अशक्यही शक्य होईल!
8
३० कोटींच्या उधळपट्टीचा घोटाळा सिद्ध, मुख्यमंत्र्यांचीही परवानगी नाही; रोहित पवार म्हणाले, 'हिवाळी अधिवेशनात सरकारची धिंड काढणार'
9
पशुपतिनाथाचे अवतार आणि रक्षेतून प्रगट झाले असे गोरक्षनाथ यांची जयंती; वाचा त्यांचे कार्य!
10
'हेरा फेरी'मधील बाबूरावच्या भूमिकेला कंटाळले परेश रावल, म्हणाले - "५०० कोटींची..."
11
वैकुंठ चतुर्दशी २०२५: श्रीविष्णू-महादेवांचे वरदान, पुण्य लाभेल; ‘असे’ करा व्रत, शुभच घडेल!
12
नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
13
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
14
आणखी एक मोठा बस अपघात, भरधाव ट्रकने बसला समोरून दिली धडक, २० जणांचा मृत्यू
15
मोठा निष्काळजीपणा! सरकारी रुग्णवाहिकेचा टायर पंक्चर, १ तास मिळाली नाही स्टेपनी; रुग्णाचा तडफडून मृत्यू
16
मुंबईकर अमोल मुजुमदारची शांतीत क्रांती! भारतीय महिला संघाला असं बनवलं वर्ल्ड चॅम्पियन  
17
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
18
अखेर 'बिग बॉस'मधून प्रणित मोरेची Exit! सलमान खानलाही बसला धक्का, म्हणाला- "तू एलिमिनेट झाला नाहीस, पण..."
19
याच महिन्यात लाँच होणार ई-आधार ॲप; पाहा घरबसल्या काय-काय अपडेट करता येणार?
20
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?

आयटीआयचा तुघलकी कारभार; ३ तासांची प्रश्नपत्रिका, सोडवून घेतली ५० मिनिटांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 12:59 IST

Tughlaq management of ITI आयटीआय प्रशासनाने जेनरेटरची सोय केली नव्हती ही चूक त्यांची असताना नाहक विद्यार्थ्यांचा बळी दिला जातोय, अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.

ठळक मुद्देविद्यार्थी वर्गाबाहेर आले आणि त्यांनी जाब विचारला असता आयटीआयच्या वतीने कुणीही उत्तर द्यायला तयार नव्हतेएवढेच नव्हे तर केंद्राबाहेर विद्यार्थ्यांना हाकलून दिले आणि गेटला सील करून टाकले.

औरंगाबाद : आयटीआय केंद्रात मेकॅनिकल विभागाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ३ तासांऐवजी अवघ्या ५० मिनिटांत गुंडाळण्याचा तुघलकी कारभार मंगळवारी समोर आला आहे.

मेकॅनिकल विभागाच्या प्रथम वर्षाची ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. संतापजनक प्रकार म्हणजे या ऑनलाइन परीक्षेचा अवधी ३ तासांचा होता. परीक्षा दुपारी २ ते ५ असा वेळ हॉल तिकिटावर देण्यात आला होता. आयटीआयच्या परीक्षा विभागाने दुपारी मुलांची ऑनलाइन परीक्षा सुरू केली. परीक्षा सुरू होताच २५ मिनिटांनी वीज गेली. वीज जाताच पर्यवेक्षकांनी विद्यार्थ्यांना सूचना केली की, वीज गेलेली असल्याने तुम्हाला केवळ २० मिनिटांमध्ये ऑनलाइन उत्तरपत्रिका सबमिट करावी लागेल. विद्यार्थ्यांना प्रश्न पडला होता ३ तासांची प्रश्नपरीक्षा अवघ्या ५० मिनिटांमध्ये कशी सोडवावी? कारण त्यांचे प्रश्नसुद्धा पाहून झाले नव्हते. मुलांनी विचारणा केली असता त्यांना सांगण्यात आले संगणकाचा बॅकअप फक्त २० मिनिटे चालू शकतो. बॅकअप २० मिनिटांत संपला तर ऑनलाइन परीक्षेची उत्तरपत्रिका सबमिट करता येणार नाही आणि पर्यवेक्षकांनी विद्यार्थ्यांना अवघ्या ५० मिनिटांत पेपर सोडवायला लावला. लगेच विद्यार्थ्यांचे संगणक बंद करून त्यांना बाहेर हुसकावून लावले.

विद्यार्थी वर्गाबाहेर आले आणि त्यांनी जाब विचारला असता आयटीआयच्या वतीने कुणीही उत्तर द्यायला तयार नव्हते, एवढेच नव्हे तर केंद्राबाहेर विद्यार्थ्यांना हाकलून दिले आणि गेटला सील करून टाकले. तीन तासांचा पेपर ५० मिनिटांमध्ये कसा सोडवता येईल. त्यामुळे आम्ही या परीक्षेत नापास होणार आहोत. त्यामुळे आजची घेतलेली परीक्षा रद्द करून पुन्हा तीन तासांचा अवधी देऊन परीक्षा घ्यावी, अशी विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे. आयटीआय विभागाला कळायला हवे होते ऑनलाइन परीक्षा आहे. वीज गेली तर जेनरेटरची पर्यायी सोय करायला हवी होती. मात्र, ही सोय नसल्याने अडचण निर्माण झाली. आयटीआय प्रशासनाने जेनरेटरची सोय केली नव्हती ही चूक त्यांची असताना नाहक विद्यार्थ्यांचा बळी दिला जातोय, अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थीexamपरीक्षा