शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआयचा तुघलकी कारभार; ३ तासांची प्रश्नपत्रिका, सोडवून घेतली ५० मिनिटांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 12:59 IST

Tughlaq management of ITI आयटीआय प्रशासनाने जेनरेटरची सोय केली नव्हती ही चूक त्यांची असताना नाहक विद्यार्थ्यांचा बळी दिला जातोय, अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.

ठळक मुद्देविद्यार्थी वर्गाबाहेर आले आणि त्यांनी जाब विचारला असता आयटीआयच्या वतीने कुणीही उत्तर द्यायला तयार नव्हतेएवढेच नव्हे तर केंद्राबाहेर विद्यार्थ्यांना हाकलून दिले आणि गेटला सील करून टाकले.

औरंगाबाद : आयटीआय केंद्रात मेकॅनिकल विभागाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ३ तासांऐवजी अवघ्या ५० मिनिटांत गुंडाळण्याचा तुघलकी कारभार मंगळवारी समोर आला आहे.

मेकॅनिकल विभागाच्या प्रथम वर्षाची ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. संतापजनक प्रकार म्हणजे या ऑनलाइन परीक्षेचा अवधी ३ तासांचा होता. परीक्षा दुपारी २ ते ५ असा वेळ हॉल तिकिटावर देण्यात आला होता. आयटीआयच्या परीक्षा विभागाने दुपारी मुलांची ऑनलाइन परीक्षा सुरू केली. परीक्षा सुरू होताच २५ मिनिटांनी वीज गेली. वीज जाताच पर्यवेक्षकांनी विद्यार्थ्यांना सूचना केली की, वीज गेलेली असल्याने तुम्हाला केवळ २० मिनिटांमध्ये ऑनलाइन उत्तरपत्रिका सबमिट करावी लागेल. विद्यार्थ्यांना प्रश्न पडला होता ३ तासांची प्रश्नपरीक्षा अवघ्या ५० मिनिटांमध्ये कशी सोडवावी? कारण त्यांचे प्रश्नसुद्धा पाहून झाले नव्हते. मुलांनी विचारणा केली असता त्यांना सांगण्यात आले संगणकाचा बॅकअप फक्त २० मिनिटे चालू शकतो. बॅकअप २० मिनिटांत संपला तर ऑनलाइन परीक्षेची उत्तरपत्रिका सबमिट करता येणार नाही आणि पर्यवेक्षकांनी विद्यार्थ्यांना अवघ्या ५० मिनिटांत पेपर सोडवायला लावला. लगेच विद्यार्थ्यांचे संगणक बंद करून त्यांना बाहेर हुसकावून लावले.

विद्यार्थी वर्गाबाहेर आले आणि त्यांनी जाब विचारला असता आयटीआयच्या वतीने कुणीही उत्तर द्यायला तयार नव्हते, एवढेच नव्हे तर केंद्राबाहेर विद्यार्थ्यांना हाकलून दिले आणि गेटला सील करून टाकले. तीन तासांचा पेपर ५० मिनिटांमध्ये कसा सोडवता येईल. त्यामुळे आम्ही या परीक्षेत नापास होणार आहोत. त्यामुळे आजची घेतलेली परीक्षा रद्द करून पुन्हा तीन तासांचा अवधी देऊन परीक्षा घ्यावी, अशी विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे. आयटीआय विभागाला कळायला हवे होते ऑनलाइन परीक्षा आहे. वीज गेली तर जेनरेटरची पर्यायी सोय करायला हवी होती. मात्र, ही सोय नसल्याने अडचण निर्माण झाली. आयटीआय प्रशासनाने जेनरेटरची सोय केली नव्हती ही चूक त्यांची असताना नाहक विद्यार्थ्यांचा बळी दिला जातोय, अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थीexamपरीक्षा