शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकांवर वर्चस्व राखण्याची खटपट; निवडणुकीला तीन महिने मुदतवाढ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 20:07 IST

महाआघाडी सरकारने तीन महिने निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. 

ठळक मुद्देथकबाकीदार शेतकऱ्यांमध्ये संचारला उत्साह

- विजय सरवदे  

औरंगाबाद : राज्यातील ३१ पैकी २२ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि २१ हजार २२५ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांपैकी ८ हजार १९४ सोसायट्यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या बँका व सोसायट्यांवर वर्चस्व राखण्यासाठी थकबाकीदार (मतदार) शेतकरी निवडणूक प्रक्रियेपासून वंचित राहू नये, हे लक्षात घेऊन महाआघाडी सरकारने तीन महिने निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. 

या निर्णयामुळे औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेसह जिल्ह्यातील ७२ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांच्या थकबाकीदार सभासद (मतदार) शेतकऱ्यांमध्ये चैतन्य पसरले आहे. यंदा अवकाळी पाऊस, परतीचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांची माती झाली. शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले. कर्जफेडीच्या विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने ‘महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती’ योजनेच्या माध्यमातून २ लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्याचा निर्णय घेतला.  सध्या राज्यभरात अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. काही ठिकाणी पोर्टलवर माहिती अपलोड करणे, बँकांना शेतकऱ्यांची यादी उपलब्ध करून देणे, कर्जदार शेतकऱ्यांचे आधार कार्डांचे नंबर प्रमाणित करणे आदी कामे सुरू आहेत. सहकार व महसूल विभागाचे अधिकारी-कर्मचारी थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या कामात व्यस्त आहेत. सहकार विभागाच्या अधिनियमानुसार जिल्हा बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांच्या थकबाकीदारांना निवडणुकीत मतदान करता येत नाही. जे चालू थकबाकीदार सभासद शेतकरी आहेत, ते मतदान करू शकतात. मात्र, त्यांना निवडणूक लढविता येत नाही. त्यामुळे मार्चअखेरपर्यंत जास्तीत जास्त  शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देऊन त्यांना कर्जमुक्त करणे व त्यांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी निवडणुकीला मुदतवाढ दिल्याचे वरिष्ठ सूत्रांचे म्हणणे आहे.

शासन आदेशात  काय म्हटले आहेसहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने २७ जानेवारी रोजी जारी केलेल्या अध्यादेशात म्हटले आहे की, जानेवारी ते जूनदरम्यान जिल्हा बँका व सोसायट्यांच्या निवडणुका होणार आहेत. सहकार विभागाचे बरेच अधिकारी व कर्मचारी या निवडणुकीच्या कामात व्यस्त राहतील. असे झाले तर, कर्जमुक्ती योजना रखडण्याची शक्यता आहे. परिणामी पुढील हंगामासाठी कर्ज घेण्यास थकबाकीदार शेतकरी पात्र राहणार नाहीत. अर्थात, या योजनेच्या मूळ हेतूलाच यामुळे बाधा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात येत आहेत. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादbankबँकElectionनिवडणूक