शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारवर विश्वास; पण दगाफटका होऊ शकतो, म्हणून गाफील राहणार नाही- मनोज जरांगे पाटील

By बापू सोळुंके | Updated: November 5, 2023 19:00 IST

१ डिसेंबरपासून विदर्भ आणि कोकणात करणार संवाद दौरा

छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारने मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यासाठी दोन महिन्यांची मुदत वाढवून घेतली. या कालावधीत सरकार आम्हाला आरक्षण देईल असा, विश्वास आहे. पण दगाफटका होऊ शकतो, हे गृहीत धरून आम्ही गाफील न राहता प्रत्येक गावांत साखळी उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. नऊ दिवस उपोषण केल्यामुळे प्रकृती खालावल्याने जरांगे पाटील हे २ नोव्हेंबरच्या रात्रीपासून शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. रविवारी सायंकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याचे आश्वासन देणाऱ्या राज्यसरकारने सर्वोच्च न्यायालयात एसईबीसी आरक्षण मिळावे, यासाठी क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली आहे. आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची कार्यकक्षा राज्यव्यापी केली, राज्यसरकारच्या या भूमिकेकडे तुम्ही कसे पाहता, या प्रश्नाचे उत्तर देताना जरांगे पाटील म्हणाले की, सर्वाेच्च न्यायालयातील क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे केवळ वरवरची मलमपट्टी आहे, आम्हाला संपूर्ण ऑपरेशन करून या आजारावर कायमस्वरूपी उपाय हवा आहे, म्हणूनच आम्ही ५० टक्केच्या आत सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या आमची मागणी आहे.

राज्य सरकारनेही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमच्याकडे वेळ मागितला. आम्हीही दोन महिन्यांचा वेळ दिला. सरकारवर विश्वास आहे का, असे विचारले असता, हो, सरकार आम्हाला आरक्षण देईल, असा विश्वास आहे, म्हणूनच आम्ही त्यांना दोन महिन्यांची मुदत दिली आहे. असे असले तरी दगाफटका होण्याची शक्यता गृहीत धरून आम्ही गाफील राहणार नाही. राज्यातील प्रत्येक गावांत साखळी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जेथे बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचे रूपांतर साखळी उपोषणात करण्याच्या सूचना केल्या आहेत. शिवाय जेथे आंदोलन नाही, त्या गावांतही साखळी उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले.

१ डिसेंबरपासून मनोज जरांगे पाटील यांचा राज्यात संवाद दौरा

जरांगे यांच्या पहिल्या टप्प्यातील संवाद दौऱ्याला जनतेकडून मोठा प्रतिसाद मिळाला. विविध ठिकाणी लाखोंच्या सभा झाल्या. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जरांगे पाटील यांनी शासनाला २४ डिसेंबरपर्यंत मुदत दिलेली असल्याने १ डिसेंबरपासून ते आता संवाद दौरा करणार आहेत. जरांगे यांनी रविवारी सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबाद