शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

किलीमांजरो शिखरावर फडकावला तिरंगा; औरंगाबादच्या अंबादासने प्रजासत्ताकदिनी रचला इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 12:36 IST

Kilimanjaro अंबादास गायकवाड व अतुल वसावे हे १९ जानेवारी रोजी किलीमांजरो शिखर मोहिमेसाठी रवाना झाले होते.

ठळक मुद्देकिलीमांजारो हे आफ्रिकेतील टान्झानिया देशातील शिखर आहेत्याची उंची समुद्रसपाटीपासून १९ हजार ३४१ फूट आहे.

औरंगाबाद : प्रतिकूल वातावरण, घोंगावत जाणारे वारे, खडतर चढ आणि पडणारा बर्फ.. या खडतर परिस्थितीवर यशस्वी मात करीत औरंगाबादच्या अंबादास गायकवाड आणि नंदुरबार येथील अतुल वसावे यांनी मंगळवारी प्रजासत्ताकदिनी इतिहास रचताना आफ्रिकेतील सर्वोच्च उंचीवरील शिखर किलीमांजरो सर करीत तेथे तिरंगा फडकावण्याचा विक्रम केला.

अंबादास गायकवाड व अतुल वसावे हे १९ जानेवारी रोजी किलीमांजरो शिखर मोहिमेसाठी रवाना झाले होते. या दोघांनी अतिशय खडतर परिस्थितीवर मात करीत २६ जानेवारी रोजी सकाळी सव्वाअकरा वाजता किलीमांजरो शिखर सर करून भारताचा तिरंगा फडकावला. त्यांच्या या जबरदस्त कामगिरीमुळे भारतीय घटनेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकात्मता या तत्त्वांचा प्रचार जगभर होणार आहे, असे त्याचे प्रशिक्षक एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी सांगितले. किलीमांजारो हे आफ्रिकेतील टान्झानिया देशातील शिखर असून, त्याची उंची समुद्रसपाटीपासून १९ हजार ३४१ फूट आहे. या मोहिमेसाठी अंबादास गायकवाडने अनेक वर्षे खडतर सराव केला. त्याने याआधी लेहमधील कांगरी शिखर मोहीमही फत्ते केली आहे. तसेच गिर्यारोहणाचे शास्रशुद्ध प्रशिक्षण घेतले आहे. आगामी काळात अंबादासचे युरोप आणि आस्ट्रेलिया खंडातील शिखर सर करण्याचे लक्ष्य आहे. अंबादास गायकवाड ३६० एक्सप्लोअर ग्रुपद्वारे आयोजित या माेहिमेत किलीमांजरो शिखर मोहिमेत सहभागी झाला होता.

अशी कामगिरी करणारा एमआयडीसीचा पहिला कर्मचारीअंबादास गायकवाड हा औरंगाबाद येथे एमआयडीसीत सेवेत असून, अवघ्या १६ वर्षांचे असताना वडिलांचे छत्र हरवल्यानंतर त्याने अतिशय संघर्षपूर्ण परिस्थितीवर मात करीत आपली गिर्यारोहणाची आवड जपली आहे. किलीमांजरो शिखर मोहीम फत्ते करणारा तो महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा पहिला कर्मचारी आहे. विशेष म्हणजे कर्ज काढून त्याने ही मोहीम फत्ते केली. याआधी औरंगाबादची एव्हरेस्ट शिखर मोहीम फत्ते करणारी मनीषा वाघमारे हिनेही किलीमांजरो शिखर सर केले आहे.

युरोप आणि ऑस्ट्रेलिया खंडातील शिखर सर करणार प्रजासत्ताकदिनी किलीमांजरो शिखरावर भारताचा तिरंगा फडकवण्यासाठी आम्ही आतुर होतो. अतिशय प्रतिकूल वातावरणात आम्ही ही मोहीम फत्ते केली याचा अभिमान वाटत आहे. आगामी काळात युरोप आणि ऑस्ट्रेलिया खंडातील शिखर सर करण्याचे लक्ष्य आहे.- अंबादास गायकवाड, गिर्यारोहक, औरंगाबाद

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिनAurangabadऔरंगाबाद