शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी गावांमध्ये सामाजिक पोळा साजरा

By admin | Updated: August 26, 2014 23:56 IST

कळमनुरी : तालुक्यातील आदिवासी गावांमध्ये सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

कळमनुरी : तालुक्यातील आदिवासी बहुल असलेल्या खापरखेडा, तरोडा, बिबगव्हाण या गावांमध्ये पोळ्यानिमित्त गरीब शेतकऱ्यांना बैलजोड्यांसाठी साजश्रृंगाराचे वाटप करून दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. पोळ्याच्या सणाला कृषी संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांची मनोभावे पूजा करून त्याची सेवा करण्याचा हा दिवस असतो. परंतू यंदा दुष्काळी स्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. मागील वर्षी झालेल्या गारपिटीच्या तडाख्यातून सावरत असतानाच शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामात कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. दुबार-तिबार पेरणी करूनही पिके येण्याची आशा मावळल्याने आधीच कर्जाच्या कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना यंदा पोळा सण साजरा करता येईल की नाही अशी स्थिती होती. ही बाब ध्यानात घेऊन कळमनुरी तालुक्यातील खापरखेडा, तरोडा, बिबगव्हाण या गावांमधील आदिवासी शेतकऱ्यांना सणासाठी मदत करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळालेले घोळवा येथील अजित मगर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम घेण्यात आला. तरोडा येथे शेतकऱ्यांना बैलजोडी सजविण्यासाठी लागणाऱ्या झुली, बेगड व इतर श्रृंगाराचे साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास अजित मगर, बळीराम नाईक, भावराव सरकुंडे, संतोष वाळले, नारायण माहोरे, देवीदास खंदारे, नीळकंठ मस्के, भीकाराव चवरे, मधुकर खंदारे, दीपक ठाकरे, भिकाजी माहोरे, संभाजी खंदारे, शामराव ससाने, भीमराव मस्के, राहुल चवरे आदी उपस्थित होते. खापरखेडा येथेही हा उपक्रम घेण्यात आला. याप्रसंगी बालाजी चिभडे, हरिदास असोले, देवजी आसोले हजर होते. बिबगव्हाण येथील शिवाजी फोपसे, बालासाहेब नाईक, सदाशिव बोरकर,बालासाहेब पोले, किशन मापारे, गंगाधर वंजारे, रघुनाथ सोवितकर, अशोक जावळे, दामाजी फोपसे, बाबाराव सातपुते, केशवराव बोडखे, सरपंच दत्तराव बेले, साहेबराव पोटफाडे, रामजी गुहाडे, उत्तम खरवडे, उत्तम पोटे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)