शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
3
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
5
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
6
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
7
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
8
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
9
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
10
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
11
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
12
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
13
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
14
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
15
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
16
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
17
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
18
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
19
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
20
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!

उपचार मिळतात;पण समुपदेशन नाही

By admin | Updated: September 13, 2014 23:13 IST

बीड : रुग्ण व डॉक्टर यांच्यातील विश्वासाच्या नात्याचे बंध वैभव महेंद्र गायकवाड (वय ८ रा. पूरग्रस्त कॉलनी, बीड) याच्या मृत्यूनंतर काहीसे सैल झाले.

बीड : रुग्ण व डॉक्टर यांच्यातील विश्वासाच्या नात्याचे बंध वैभव महेंद्र गायकवाड (वय ८ रा. पूरग्रस्त कॉलनी, बीड) याच्या मृत्यूनंतर काहीसे सैल झाले. मोठ्या आशेने गोरगरीब रुग्ण जिल्हा रुग्णालयाची पायरी ओलांडतात. तेथे उपचारही होतात; पण समुपदेशन केले जात नाही. त्यामुळे डॉक्टरांवरील विश्वासालाच तडा जातो. वाढती रुग्णसंख्या, अपुरा स्टाफ अशा स्थितीतही रुग्णांची विश्वासार्हता टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान डॉक्टरांपुढे आहे. डॉक्टरांनी उपचारासोबत समुपदेशन केले तर गैरसमज होणार नाहीत, असा सूर ‘लोकमत’ने शनिवारी आयोजित केलेल्या परिसंवादातून उमटला. या चर्चेत सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले, अशोक तांगडे, चाईल्ड लाईनचे जिल्हा समन्वयक तत्वशील कांबळे, जिल्हा रुग्णालयाच्या विधी सल्लागार अ‍ॅड. करुणा टाकसाळ, बालरोगज्ज्ञ डॉ. संजय जानवळे, जिल्हा रुग्णालयातील डॉ. आय. व्ही. शिंदे, डॉ. हनुमंत पारखे, परिचारिका संघटनेच्या तत्वशीला मुंडे, संगीता सिरसट, मयत वैभवचे आई- वडील रेखा महेंद्र गायकवाड यांनी सहभाग नोंदविला.‘रुग्ण व डॉक्टरांतील संबंध’ या विषयावर ‘लोकमत’ने हा परिसंवाद घडवून आणला. मयत वैभवचे वडील महेंद्र गायकवाड यांनी सांगितले की, आमचा मुलगा वैभव यास मंगळवारी ताप आला होता. जिल्हा रुग्णालयातील गोळीने ताप लवकर थांबतो म्हणून आम्ही त्याला जिल्हा रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी त्याला दाखल करुन घेण्याऐवजी अरेरावीची भाषा केली. ‘कधीही यायला, तुमच्या बापाचा दवाखाना आहे का?’ अशा शब्दांत त्यांनी सुनावले. त्यानंतर आम्ही शेजारच्या वार्डात गेलो. तेथे नर्सने सलाईन लावून उपचार सुरु केले. त्यानंतर वैभवला थंडी वाजण्यास सुरु झाली. तो थंडीने कु डकुडू लागल्याने आम्ही दुसऱ्या रुग्णाकडील ब्लँकेट त्याच्या अंगावर टाकले;पण त्याी थंडी काही कमी झाली नाही. त्यानंतर नर्सने दोन इंजेक्शन दिले. त्याचा थंडीताप कमी तर झालाच नाही उलट उलट्या सुरु झाल्या. आम्ही डॉक्टरांना बोलावलं;पण कोणीही फिरकले नाही. जवळच काही नर्स जेवण करत होत्या, त्या देखील आल्या नाहीत. एक डॉक्टर शेजारी रुग्ण तपासत होते. मी त्यांना म्हणालो, माझा मुलगा अत्यवस्थ आहे. त्याला पहा;पण ते म्हणाले, ती माझी केस नाही. इकडे अर्ध्या तासापासून ताप व उलट्यांनी फणफणणाऱ्या माझ्या वैभवने तडफडत प्राण सोडले. डॉक्टर व नर्सने वेळेच पाहिले असते तर कदाचित माझा मुलगा वाचला असता.असा प्रसंग दुसऱ्यावर येऊ नये!मयत वैभवच्या आई रेखा गायकवाड यांनी सांगितले की, बामचा वैभव गेला;पण असा वाईट प्रसंग इतरांवर येऊ नये. माझा मुलगा डॉक्टरांच्या हलगर्जीपणानेच गेला आहे. त्या डॉक्टरांवर कारवाई झालीच पाहिजे.आरोप तथ्यहिनडॉ. हनुमंत पारखे म्हणाले, मंगळवारी संध्याकाळी वैभव गायकवाडला अ‍ॅडमिट केले होते. नर्सने सलाईन लावले. त्यावेळी डॉ. वर्धमान कोटेचा ‘आॅनकॉल’ होते. रात्री पाऊणेबारा वाजता काय झाले? माहीत नाही. मला रात्री १२:४५ वाजता आरएमओंचा फोन आला. त्यांनी सांगितले, तुम्ही तात्काळ ८ क्रमांकाच्या वार्डात जा. तेथे काही तरी समस्या आहे. मी गेलो, तेंव्हा गेलो त्यापूर्वीच वैभवचा मृत्यू झालेला होता. तेथे त्याचे नातेवाईक व पोलीस होते. यावेळी नातेवाईकांनी मलाच दोषी धरले. खरे पाहता मी त्या दिवशी आॅनड्यूटी नव्हतोच. रुग्णाचा मृत्यू होणे ही बाब दु:खाची आहे. हे दु:ख कोणाच्याही वाट्याला येऊ नये. मात्र, माझ्यावरील आरोप तथ्यहिन आहेत. मी पदरमोड करुन अनेक रुग्णांना मदत केली आहे. सेवेत सुसूत्रता हवीतत्वशील कांबळे म्हणाले की, जिल्हा रुग्णालयात कामाचा ताण असतो हे खरेच आहे; परंतु आपतकालिन स्थितीत एनआरएचएम व आॅन कॉल डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे. काही डॉक्टर आठ तास काम करतात, काही जण चार तासच करतात. त्यामुळे सुसूत्रता हवी. रुग्णसेवेत हलगर्जीपणा नको.उपचाराची स्थिती कळालीच पाहिजेसामाजिक कार्यकर्ते अशोक तांगडे म्हणाले, वैभवच्या आई- वडिलांनी मोठ्या आशेने जिल्हा रुग्णालय गाठले. त्याच्या मृृत्यूला डॉक्टर जबाबदार आहेत का? नेमके काय झाले? हे तपासानंतर स्पष्ट होईलच;पण तो तडफडत असताना शेजारच्या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टराने त्याच्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. रुग्णसेवा अत्यावश्यक सेवेत मोडते. त्यामुळे डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांना उपचारस्थिती सांगायलाच हवी.वैभवच्या नातेवाईकांना न्याय मिळालाच पाहिजे. रुग्ण व डॉक्टर यांच्यातील विश्वासार्हता वाढायला हवी. सिस्टीम तर बदललीच पाहिजे शिवाय नातेवाईकांचे समाधान होईल, इतका स्पष्ट संवाद असला पाहिजे, या निष्कर्षावर परिसवंदाचा समारोप झाला. (प्रतिनिधी)