शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

उपचार मिळतात;पण समुपदेशन नाही

By admin | Updated: September 13, 2014 23:13 IST

बीड : रुग्ण व डॉक्टर यांच्यातील विश्वासाच्या नात्याचे बंध वैभव महेंद्र गायकवाड (वय ८ रा. पूरग्रस्त कॉलनी, बीड) याच्या मृत्यूनंतर काहीसे सैल झाले.

बीड : रुग्ण व डॉक्टर यांच्यातील विश्वासाच्या नात्याचे बंध वैभव महेंद्र गायकवाड (वय ८ रा. पूरग्रस्त कॉलनी, बीड) याच्या मृत्यूनंतर काहीसे सैल झाले. मोठ्या आशेने गोरगरीब रुग्ण जिल्हा रुग्णालयाची पायरी ओलांडतात. तेथे उपचारही होतात; पण समुपदेशन केले जात नाही. त्यामुळे डॉक्टरांवरील विश्वासालाच तडा जातो. वाढती रुग्णसंख्या, अपुरा स्टाफ अशा स्थितीतही रुग्णांची विश्वासार्हता टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान डॉक्टरांपुढे आहे. डॉक्टरांनी उपचारासोबत समुपदेशन केले तर गैरसमज होणार नाहीत, असा सूर ‘लोकमत’ने शनिवारी आयोजित केलेल्या परिसंवादातून उमटला. या चर्चेत सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले, अशोक तांगडे, चाईल्ड लाईनचे जिल्हा समन्वयक तत्वशील कांबळे, जिल्हा रुग्णालयाच्या विधी सल्लागार अ‍ॅड. करुणा टाकसाळ, बालरोगज्ज्ञ डॉ. संजय जानवळे, जिल्हा रुग्णालयातील डॉ. आय. व्ही. शिंदे, डॉ. हनुमंत पारखे, परिचारिका संघटनेच्या तत्वशीला मुंडे, संगीता सिरसट, मयत वैभवचे आई- वडील रेखा महेंद्र गायकवाड यांनी सहभाग नोंदविला.‘रुग्ण व डॉक्टरांतील संबंध’ या विषयावर ‘लोकमत’ने हा परिसंवाद घडवून आणला. मयत वैभवचे वडील महेंद्र गायकवाड यांनी सांगितले की, आमचा मुलगा वैभव यास मंगळवारी ताप आला होता. जिल्हा रुग्णालयातील गोळीने ताप लवकर थांबतो म्हणून आम्ही त्याला जिल्हा रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी त्याला दाखल करुन घेण्याऐवजी अरेरावीची भाषा केली. ‘कधीही यायला, तुमच्या बापाचा दवाखाना आहे का?’ अशा शब्दांत त्यांनी सुनावले. त्यानंतर आम्ही शेजारच्या वार्डात गेलो. तेथे नर्सने सलाईन लावून उपचार सुरु केले. त्यानंतर वैभवला थंडी वाजण्यास सुरु झाली. तो थंडीने कु डकुडू लागल्याने आम्ही दुसऱ्या रुग्णाकडील ब्लँकेट त्याच्या अंगावर टाकले;पण त्याी थंडी काही कमी झाली नाही. त्यानंतर नर्सने दोन इंजेक्शन दिले. त्याचा थंडीताप कमी तर झालाच नाही उलट उलट्या सुरु झाल्या. आम्ही डॉक्टरांना बोलावलं;पण कोणीही फिरकले नाही. जवळच काही नर्स जेवण करत होत्या, त्या देखील आल्या नाहीत. एक डॉक्टर शेजारी रुग्ण तपासत होते. मी त्यांना म्हणालो, माझा मुलगा अत्यवस्थ आहे. त्याला पहा;पण ते म्हणाले, ती माझी केस नाही. इकडे अर्ध्या तासापासून ताप व उलट्यांनी फणफणणाऱ्या माझ्या वैभवने तडफडत प्राण सोडले. डॉक्टर व नर्सने वेळेच पाहिले असते तर कदाचित माझा मुलगा वाचला असता.असा प्रसंग दुसऱ्यावर येऊ नये!मयत वैभवच्या आई रेखा गायकवाड यांनी सांगितले की, बामचा वैभव गेला;पण असा वाईट प्रसंग इतरांवर येऊ नये. माझा मुलगा डॉक्टरांच्या हलगर्जीपणानेच गेला आहे. त्या डॉक्टरांवर कारवाई झालीच पाहिजे.आरोप तथ्यहिनडॉ. हनुमंत पारखे म्हणाले, मंगळवारी संध्याकाळी वैभव गायकवाडला अ‍ॅडमिट केले होते. नर्सने सलाईन लावले. त्यावेळी डॉ. वर्धमान कोटेचा ‘आॅनकॉल’ होते. रात्री पाऊणेबारा वाजता काय झाले? माहीत नाही. मला रात्री १२:४५ वाजता आरएमओंचा फोन आला. त्यांनी सांगितले, तुम्ही तात्काळ ८ क्रमांकाच्या वार्डात जा. तेथे काही तरी समस्या आहे. मी गेलो, तेंव्हा गेलो त्यापूर्वीच वैभवचा मृत्यू झालेला होता. तेथे त्याचे नातेवाईक व पोलीस होते. यावेळी नातेवाईकांनी मलाच दोषी धरले. खरे पाहता मी त्या दिवशी आॅनड्यूटी नव्हतोच. रुग्णाचा मृत्यू होणे ही बाब दु:खाची आहे. हे दु:ख कोणाच्याही वाट्याला येऊ नये. मात्र, माझ्यावरील आरोप तथ्यहिन आहेत. मी पदरमोड करुन अनेक रुग्णांना मदत केली आहे. सेवेत सुसूत्रता हवीतत्वशील कांबळे म्हणाले की, जिल्हा रुग्णालयात कामाचा ताण असतो हे खरेच आहे; परंतु आपतकालिन स्थितीत एनआरएचएम व आॅन कॉल डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे. काही डॉक्टर आठ तास काम करतात, काही जण चार तासच करतात. त्यामुळे सुसूत्रता हवी. रुग्णसेवेत हलगर्जीपणा नको.उपचाराची स्थिती कळालीच पाहिजेसामाजिक कार्यकर्ते अशोक तांगडे म्हणाले, वैभवच्या आई- वडिलांनी मोठ्या आशेने जिल्हा रुग्णालय गाठले. त्याच्या मृृत्यूला डॉक्टर जबाबदार आहेत का? नेमके काय झाले? हे तपासानंतर स्पष्ट होईलच;पण तो तडफडत असताना शेजारच्या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टराने त्याच्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. रुग्णसेवा अत्यावश्यक सेवेत मोडते. त्यामुळे डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांना उपचारस्थिती सांगायलाच हवी.वैभवच्या नातेवाईकांना न्याय मिळालाच पाहिजे. रुग्ण व डॉक्टर यांच्यातील विश्वासार्हता वाढायला हवी. सिस्टीम तर बदललीच पाहिजे शिवाय नातेवाईकांचे समाधान होईल, इतका स्पष्ट संवाद असला पाहिजे, या निष्कर्षावर परिसवंदाचा समारोप झाला. (प्रतिनिधी)