शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

प्रवाशांना मिळणार दिलासा,औरंगाबाद - जळगाव महामार्ग डिसेंबरअखेरपर्यंत सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 17:55 IST

औरंगाबाद ते सिल्लोड हा महामार्ग मार्चअखेरपर्यंत पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर कामे हाती घेण्यात आली आहेत

ठळक मुद्देकार्यकारी अभियंत्यांचा विश्वास मार्चअखेरपर्यंत एक लेन पूर्ण करण्याचा मानस

- विजय सरवदे

औरंगाबाद : मागील दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला औरंगाबाद- सिल्लोड- जळगाव चारपदरी राष्ट्रीय महामार्ग डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. तत्पूर्वी, औरंगाबाद ते सिल्लोड हा महामार्ग मार्चअखेरपर्यंत पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर कामे हाती घेण्यात आली आहेत, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता तथा औरंगाबाद -सिल्लोड या चारपदरी महामार्गाचे नियंत्रक जयंत चिव्हाणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

पर्यटन आणि दळणवळणासाठी महत्त्वाचा असलेल्या औरंगाबाद- सिल्लोड- अजिंठा- जळगाव या रस्त्याचे चौपदरी करण्याची दोन-अडीच वर्षांपूर्वी केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली होती. २९ जुलै २०१७ रोजी नितीन गडकरी यांच्या हस्ते या रस्त्याच्या कोनशिलेचे अनावरण झाले. त्यानंतर भूसंपादन व सपाटीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. मात्र, निधी थकल्यामुळे या रस्त्याच्या कामासाठी नेमलेल्या हैदराबाद येथील ऋत्विक या कंत्राटदार कंपनीने काम अर्धवट सोडून दिले. ही बाब सजग नागरिकांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना टिष्ट्वटरच्या माध्यमातून निदर्शनास आणून दिले. तेव्हा त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्याच वेळी औरंगाबाद खंडपीठानेही या रस्त्याच्या कामाची स्वत:हून दखल घेतली. त्यामुळे न्यायालयाला कामाच्या प्रगतीचा आढावा अधिकाऱ्यांमार्फत दिला जात आहे.पहिल्या कंत्राटदाराने अर्धवट काम सोडल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या कामासाठी तीन कंत्राटदार नेमले. यामध्ये औरंगाबाद ते सिल्लोडपर्यंतच्या रस्त्यासाठी आर. के. चव्हाण, सिल्लोड ते फर्दापूरपर्यंत आर. एस. कामटे, तर फर्दापूर ते जळगावपर्यंत स्पायरा इन्फ्रा भटनागर या कंत्राटदारांचा समावेश आहे. 

या महामार्गासाठी ४३१ कोटी रुपयांचा निधीसध्या औरंगाबाद- सिल्लोड रस्त्याच्या एका बाजूचे (लेन) काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. साधारणपणे ६० किलोमीटर लांबीच्या या रस्त्याचे काँक्रिटीकरणासाठी सध्या दोन पेव्हर मशीन कार्यरत आहेत. साधारणपणे मोठे पेव्हर मशीन दिवसाला ५०० मीटर, तर लहान पेव्हर मशीन ३०० मीटर एवढे काँक्रिटीकरणाचे काम करत आहे.४एक लवकर पूर्ण होईल व त्यावरून वाहतूक सुरू होईल. त्यामुळे दुसऱ्या लेनच्या कामासाठी फारसे अडथळे येणार नाहीत. मार्चअखेरपर्यंत दोन्ही लेनची कामे पूर्ण होतील. यासोबतच सिल्लोड-फर्दापूर व फर्दापूर-जळगाव या टप्प्याची कामे पूर्ण होतील. या रस्त्यावर चार मोठे पूल व लहान-मोठ्या कामांसाठी साधारणपणे डिसेंबरअखेरपर्यंतचा कालावधी लागेल. त्यानंतर हा रस्ता सर्वार्थाने वाहतुकीसाठी परिपूर्ण होईल. या रस्त्यासाठी सुरुवातीला ३२१ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. आता कामांमध्ये वाढ झाली असून, निधीमध्ये ११० कोटी रुपयांची भर पडली आहे, असे कार्यकारी अभियंता चिव्हाणे यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादroad safetyरस्ते सुरक्षाhighwayमहामार्गtourismपर्यटन