शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांना मिळणार दिलासा,औरंगाबाद - जळगाव महामार्ग डिसेंबरअखेरपर्यंत सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 17:55 IST

औरंगाबाद ते सिल्लोड हा महामार्ग मार्चअखेरपर्यंत पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर कामे हाती घेण्यात आली आहेत

ठळक मुद्देकार्यकारी अभियंत्यांचा विश्वास मार्चअखेरपर्यंत एक लेन पूर्ण करण्याचा मानस

- विजय सरवदे

औरंगाबाद : मागील दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला औरंगाबाद- सिल्लोड- जळगाव चारपदरी राष्ट्रीय महामार्ग डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. तत्पूर्वी, औरंगाबाद ते सिल्लोड हा महामार्ग मार्चअखेरपर्यंत पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर कामे हाती घेण्यात आली आहेत, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता तथा औरंगाबाद -सिल्लोड या चारपदरी महामार्गाचे नियंत्रक जयंत चिव्हाणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

पर्यटन आणि दळणवळणासाठी महत्त्वाचा असलेल्या औरंगाबाद- सिल्लोड- अजिंठा- जळगाव या रस्त्याचे चौपदरी करण्याची दोन-अडीच वर्षांपूर्वी केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली होती. २९ जुलै २०१७ रोजी नितीन गडकरी यांच्या हस्ते या रस्त्याच्या कोनशिलेचे अनावरण झाले. त्यानंतर भूसंपादन व सपाटीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. मात्र, निधी थकल्यामुळे या रस्त्याच्या कामासाठी नेमलेल्या हैदराबाद येथील ऋत्विक या कंत्राटदार कंपनीने काम अर्धवट सोडून दिले. ही बाब सजग नागरिकांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना टिष्ट्वटरच्या माध्यमातून निदर्शनास आणून दिले. तेव्हा त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्याच वेळी औरंगाबाद खंडपीठानेही या रस्त्याच्या कामाची स्वत:हून दखल घेतली. त्यामुळे न्यायालयाला कामाच्या प्रगतीचा आढावा अधिकाऱ्यांमार्फत दिला जात आहे.पहिल्या कंत्राटदाराने अर्धवट काम सोडल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या कामासाठी तीन कंत्राटदार नेमले. यामध्ये औरंगाबाद ते सिल्लोडपर्यंतच्या रस्त्यासाठी आर. के. चव्हाण, सिल्लोड ते फर्दापूरपर्यंत आर. एस. कामटे, तर फर्दापूर ते जळगावपर्यंत स्पायरा इन्फ्रा भटनागर या कंत्राटदारांचा समावेश आहे. 

या महामार्गासाठी ४३१ कोटी रुपयांचा निधीसध्या औरंगाबाद- सिल्लोड रस्त्याच्या एका बाजूचे (लेन) काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. साधारणपणे ६० किलोमीटर लांबीच्या या रस्त्याचे काँक्रिटीकरणासाठी सध्या दोन पेव्हर मशीन कार्यरत आहेत. साधारणपणे मोठे पेव्हर मशीन दिवसाला ५०० मीटर, तर लहान पेव्हर मशीन ३०० मीटर एवढे काँक्रिटीकरणाचे काम करत आहे.४एक लवकर पूर्ण होईल व त्यावरून वाहतूक सुरू होईल. त्यामुळे दुसऱ्या लेनच्या कामासाठी फारसे अडथळे येणार नाहीत. मार्चअखेरपर्यंत दोन्ही लेनची कामे पूर्ण होतील. यासोबतच सिल्लोड-फर्दापूर व फर्दापूर-जळगाव या टप्प्याची कामे पूर्ण होतील. या रस्त्यावर चार मोठे पूल व लहान-मोठ्या कामांसाठी साधारणपणे डिसेंबरअखेरपर्यंतचा कालावधी लागेल. त्यानंतर हा रस्ता सर्वार्थाने वाहतुकीसाठी परिपूर्ण होईल. या रस्त्यासाठी सुरुवातीला ३२१ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. आता कामांमध्ये वाढ झाली असून, निधीमध्ये ११० कोटी रुपयांची भर पडली आहे, असे कार्यकारी अभियंता चिव्हाणे यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादroad safetyरस्ते सुरक्षाhighwayमहामार्गtourismपर्यटन