शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

साजापूर-शरणापूर रस्त्यावर ४ कि.मी. साठी लागतात पाऊणतास...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 15:59 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे साजापूर-शरणापूर या रस्त्यावर साडेचार किलोमीटर रस्ता पार करताना पाऊणतासाची जीवघेणी कसरत करावी लागते.

- साहेबराव हिवराळे वाळूज महानगर (औरंगाबाद ) : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे साजापूर-शरणापूर या रस्त्यावर साडेचार किलोमीटर रस्ता पार करताना पाऊणतासाची जीवघेणी कसरत करावी लागते. यामुळे या मार्गाचा वापर करणारे कामगार आणि पर्यटक त्रस्त झाले आहेत.

गेल्या तीन वर्षांपासून अनेकदा निविदा काढून रस्त्याचे काम रखडलेले आहे. रस्त्यावर टाकलेले खडी व मुरमाचे ढीग वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. काही ठिकाणी काम चालू तर काही ठिकाणी काम बंद असल्याने एकाच वेळी एक वाहन जाऊ शकते; परंतु विरुद्ध बाजूने येणार्‍या वाहनामुळे वाहतूक जाम होते. त्याचा फटका कामगार व पर्यटकांना बसतो. औद्योगिक वसाहत असल्याने कारखान्यात कच्चा व पक्क्या मालाची ने-आण करण्यासाठी येणार्‍या वाहनांची मोठी वर्दळ असल्याने दुचाकीवर ये-जा करणार्‍या कामगारांना जीव मुठीत घालून जावे लागते. अनेकदा वाहने घसरून किरकोळ स्वरूपाचे अपघात होत आहेत. पर्यटक व भाविकांना गैरसोयींना सतत तोंड द्यावे लागत आहे.

दौलताबाद ते वाळूज औद्योगिक क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी जवळचा मार्ग असल्यामुळे साजापूर-शरणापूर या रस्त्यावर वाहनधारकांची सतत वर्दळ असते. मात्र, रस्ता कामात कासवगती असल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व शासनाकडे रस्त्याविषयी जोर लावल्याने रस्ता मंजूर झाला. त्यासाठी ५ कोटींची मंजुरी आली. निविदा पुन्हा टाकून काम पूर्ण करण्यासाठी वेळदेखील मागून घेण्यात आला आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग गंगापूरच्या हद्दीत येत असल्यामुळे या विभागाच्या वतीने दोन वर्षांपूर्वी निविदा काढण्यात आल्या होत्या. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर ३ वर्षे रस्ता दुरुस्तीची जबाबदारीही संबंधित ठेकेदाराकडे सोपविण्यात आली होती.

औद्योगिक क्षेत्राशी जोडणारा प्रमुख रस्तासार्वजनिक बांधकाम विभाग गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे तीन वर्षांपासून काम रेंगाळले असून, नागरिकांत असंतोष आहे. वाळूज औद्योगिक क्षेत्राशी जोडणारा प्रमुख आणि जवळचा मार्ग असल्याने २४ तास नागरिक व वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे कामाची गती वाढवून ते पावसाळ्यापूर्वी संपवावे, अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा पंचायत समिती सदस्य विजय जाधव, शेख इस्माईल, मुनीर पटेल, रज्जाक पठाण, शेख राजू आदींनी दिला आहे.

पर्यटकांना नगर नाक्यामार्गे वळसावाळूज महानगर परिसरातील नागरिकांना शरणापूर भांगशीमातागड, दौलताबाद, खुलताबाद, वेरूळ तसेच शहरात जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने सतत वर्दळ असते; परंतु रस्त्यावरील खडीचे ढिगारे, मुरूम मातीचा अडसर असल्याने अपघात टाळण्यासाठी पर्यटक व भाविक नगरनाकामार्गे वळसा घालून जात आहेत. औद्योगिक क्षेत्रात येणार्‍या  कामगारांना ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे वेळ आणि आर्थिक  नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. - राणूजी जाधव, माजी पंचायत समिती सदस्य

पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करारस्त्यावरील वर्दळ लक्षात घेता या रस्त्याच्या मजबुतीकर-णाच्या कामाचा उरक वाढविणे गरजेचे आहे. अनेकदा उद्घाटने होऊन काम संथगतीने सुरू आहे. ग्रामस्थांना घर गाठताना गंभीर प्रसंगाला सामोरे जावे लागते. वरिष्ठांनी ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करूनदेखील कामात फरक पडलेला नाही. पर्यटक व कामगार नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे.- सर्जेराव पाटील चव्हाण, माजी सभापती, पंचायत समिती

‘आरटीओ’कडे जाणारे त्रस्तशहरातील आरटीओ कार्यालयाचे कामकाज शरणापूर हद्दीत सुरू झाल्याने शहरातून दररोज येणार्‍या वाहनाला देखील आदळआपटीचा त्रास सहन करीत यावे लागते. काही डॅमेज असल्यास आरटीओकडूृन वाहनधारकांना पुन्हा अडचणीला तोंड द्यावे लागते. त्याकडेही अधिकारी यांच्या सोबत अनेकदा वादाचे प्रकार वाढले आहेत.- अनिल जाधव, ग्रा.पं. सदस्य 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAurangabadऔरंगाबाद