शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

प्रवास होणार वेगवान! ‘जनशताब्दी’ धावेल विजेवर, ‘वंदे भारत’ला थोडी प्रतीक्षा

By संतोष हिरेमठ | Updated: July 10, 2023 20:27 IST

नांदेड विभागातील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतरच धावेल देशातील वेगवान ट्रेन

छत्रपती संभाजीनगर : देशातील सर्वात वेगवान ट्रेन म्हणून नावाजलेली ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ जालना, छत्रपती संभाजीनगरमार्गे धावण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. नांदेड विभागातील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतरच ही रेल्वे धावण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तर महिनाभरात जालन्याहून इलेक्ट्रिक इंजिनसह जनशताब्दी एक्स्प्रेस धावणार आहे. त्यादृष्टीने जोरदार तयारी केली जात आहे.

मनमाड (अंकाई) ते परभणी रेल्वे मार्गादरम्यान मनमाड-छत्रपती संभाजीनगर-जालन्यापर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. जालना ते परभणीदरम्यानही विद्युतीकरणाचे काम वेगात सुरू आहे. मनमाड-छत्रपती संभाजीनगर या मार्गावर इलेक्ट्रिक इंजिनसह रेल्वे चालविण्याची चाचणीही यशस्वी झाली आहे. जालन्यापर्यंत इलेक्ट्रिक इंजिन चालविण्याची चाचणीही लवकरच होणार आहे. ही चाचणी होताच जनशताब्दी एक्स्प्रेस इलेक्ट्रिक इंजिनसह धावण्याचा मार्ग मोकळा होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या व्यवस्थापक (डीआरएम) नीती सरकार म्हणाल्या, ‘वंदे भारत’साठी बरीच तयारी करावी लागते. रेकपासून ते मार्गापर्यंतचे नियोजन करावे लागते. त्याचे नियोजन आणि लॉन्चमध्ये बरेच बारीकसारीक तपशीलचा समावेश असतो. रेल्वे बोर्डाच्या निर्देशानुसार काम केले जाईल.

कधी पूर्ण होणार विद्युतीकरण?नांदेड ते मुंबई रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस चालविण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. तर सिकंदराबादसाठी ही एक्स्प्रेस सुरू होऊ शकते. नांदेड विभागांतर्गत येणाऱ्या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरणाचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणार आहे, अशी माहिती रेल्वे विभागाकडून काही दिवसांपूर्वी देण्यात आली होती.

विद्युतीकरणानंतर धावेल वंदे भारतवंदे भारत एक्स्प्रेस ही इलेक्ट्रिकवर धावते. त्यामुळे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होईल. छोट्या अंतरावर ही रेल्वे चालविणे परवडत नाही. जनशताब्दी एक्स्प्रेस इलेक्ट्रिक इंजिनसह धावेल. त्यादृष्टीने ट्रायल सुरू आहे.- रावसाहेब दानवे, केंद्रीय रेल्वेराज्य मंत्री

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीAurangabadऔरंगाबादraosaheb danveरावसाहेब दानवे