शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

‘आवडेल तिथे प्रवास’ महागला

By admin | Updated: June 9, 2014 01:12 IST

हिंगोली : राज्य परिवहन महामंडळाच्या विविध योजनांपैकी एक असलेल्या ‘आवडेल तिथे प्रवास’ योजनेच्या दरात जूनपासून वाढ झाली.

हिंगोली : राज्य परिवहन महामंडळाच्या विविध योजनांपैकी एक असलेल्या ‘आवडेल तिथे प्रवास’ योजनेच्या दरात जूनपासून वाढ झाली. मागील दरांपेक्षा आता जवळपास १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाल्याने आवडीच्या ठिकाणाचा प्रवास प्रवाशांच्या खिशाला कात्री लावत आहे. परिणामी पर्यटन किवा देवस्थानची परिक्रमादेखील आता महागात पडणार आहे. कायम तोट्यात असल्याचा शिक्का राज्य परिवहन महामंडळाला बसला आहे. याची तथ्यता कितपत आहे, याबद्दल साशकंता वाटते; परंतु तोट्याच्या नावाखाली परिवहन महामंडळाकडून सातत्याने दरांत वाढ केली जाते. अलीकडच्या तीन वर्षांत जवळपास दुप्पटीने सर्वच भाड्यांत वाढ झाली. नियमित अंतराने ही वाढ सुरूच असताना पुन्हा प्रवाशांच्या खिशाला कात्री लागली. आता ‘आवडेल तिथे प्रवास’ प्रत्येकाला चांगलाच महागात पडणार आहे. आगाराच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच एसटीचा वर्धापन दिन साजरा करताना हळूच राज्य परिवहन महामंडळाने दरात वाढ केली. परिणामी ४ दिवसांच्या प्रवासासाठी ६५० रूपयांवरून आता ८०० रूपये मोजावे लागतात; पण कमी गर्दीच्या कालावधीत ४ दिवसांसाठी प्रौढांसाठी ७४० तर मुलांसाठी ३७० रूपये मोजावे लागतात. प्रामुख्याने वर्षाची विभागणी दोन गटांत केली असून १५ आॅक्टोबरपासून ते १४ जूनपर्यंत गर्दीच्या कालावधीत तिकीटांचे वाढीव दर राहणार आहेत. उलट कमी गर्दीच्या १५ जूनपासून ते १४ आॅक्टोबरपर्यंत तिकीटांत थोडासा दिलासा मिळाला. दुसरीकडे ७ दिवसांच्या प्रवासासासाठी प्रौढांना साध्या बससाठी १ हजार ४०० तर मुलांसाठी ७०० रूपये भरून प्रवास करता येणार आहे. निमआराम बससाठी प्रौढांना १ हजार ६०५ तर मुलांसाठी ८०५ रूपये ७ दिवसांच्या प्रवासासाठी भरावे लागतात. सात दिवसांच्या आंतरराज्यीय प्रवासासाठी १ हजार ७३० तर मुलांसाठी ८६५ रूपये भरून प्रवास करता येणार आहे. गर्दीच्या कालावधीसाठी या तिकीटांच्या दरांपेक्षा कमी गर्दीच्या हंगामात आगाराने थोडासा दिलासा दिला. आगाराचे दर वाढत जात असल्याने प्रवासांच्या खिशाला चाट पडत आहे. इतर वाहतूकीच्या तुलनेत एसटीचे भाढे वाढत राहिल्याने प्रवाशांना बसचा प्रवास डोईजड होतना दिसतो. महामंडळाच्या वाढीव दराचा फायदा हिंगोली आगारास होण्याची शक्यता आहे. इतर वाहतूक नसल्यामुळे प्रवाशांना बसशिवाय पर्याय नसल्यामुळे उत्पन्न वाढीची आशा आहे. (प्रतिनिधी)कायम तोट्याच्या नावाखाली राज्य परिवहन महामंडळाकडून सातत्याने दरांत वाढ केली जाते असताना अलीकडच्या तीन वर्षांत जवळपास दुप्पटीने सर्वच भाड्यांत झाली वाढ. आगाराच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच एसटीचा वर्र्धापन दिन साजरा करताना हळूच परिवहन महांडळाने केली दरात वाढ. प्रामुख्याने वर्षाची विभागणी दोन गटात केली असून १५ आॅक्टोबरपासून ते १४ जूनपर्यंत गर्दीच्या कालावधीत तिकीटांचे वाढीव दर राहणार आहेत. उलट कमी गर्दीच्या १५ जुनपासून ते १४ आॅक्टोबरपर्यंत तिकीटांत थोडासा दिलासा मिळाला. आता चार दिवसांच्या प्रवासासाठी ६५० रूपयांवरून आता ८०० रूपये मोजावे लागतात; परंतु कमी गर्दीच्या कालावधीत ४ दिवसाच्या प्रवासासाठी प्रौढांना ७४० तर मुलांसाठी ३७० रूपये मोजावे लागतात. सात दिवसांच्या प्रवासासाठी प्रौढांना साध्या बससाठी १ हजार ४०० तर मुलांसाठी ७०० रूपये भरून करता येणार प्रवास.