शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

‘आवडेल तिथे प्रवास’ महागला

By admin | Updated: June 9, 2014 01:12 IST

हिंगोली : राज्य परिवहन महामंडळाच्या विविध योजनांपैकी एक असलेल्या ‘आवडेल तिथे प्रवास’ योजनेच्या दरात जूनपासून वाढ झाली.

हिंगोली : राज्य परिवहन महामंडळाच्या विविध योजनांपैकी एक असलेल्या ‘आवडेल तिथे प्रवास’ योजनेच्या दरात जूनपासून वाढ झाली. मागील दरांपेक्षा आता जवळपास १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाल्याने आवडीच्या ठिकाणाचा प्रवास प्रवाशांच्या खिशाला कात्री लावत आहे. परिणामी पर्यटन किवा देवस्थानची परिक्रमादेखील आता महागात पडणार आहे. कायम तोट्यात असल्याचा शिक्का राज्य परिवहन महामंडळाला बसला आहे. याची तथ्यता कितपत आहे, याबद्दल साशकंता वाटते; परंतु तोट्याच्या नावाखाली परिवहन महामंडळाकडून सातत्याने दरांत वाढ केली जाते. अलीकडच्या तीन वर्षांत जवळपास दुप्पटीने सर्वच भाड्यांत वाढ झाली. नियमित अंतराने ही वाढ सुरूच असताना पुन्हा प्रवाशांच्या खिशाला कात्री लागली. आता ‘आवडेल तिथे प्रवास’ प्रत्येकाला चांगलाच महागात पडणार आहे. आगाराच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच एसटीचा वर्धापन दिन साजरा करताना हळूच राज्य परिवहन महामंडळाने दरात वाढ केली. परिणामी ४ दिवसांच्या प्रवासासाठी ६५० रूपयांवरून आता ८०० रूपये मोजावे लागतात; पण कमी गर्दीच्या कालावधीत ४ दिवसांसाठी प्रौढांसाठी ७४० तर मुलांसाठी ३७० रूपये मोजावे लागतात. प्रामुख्याने वर्षाची विभागणी दोन गटांत केली असून १५ आॅक्टोबरपासून ते १४ जूनपर्यंत गर्दीच्या कालावधीत तिकीटांचे वाढीव दर राहणार आहेत. उलट कमी गर्दीच्या १५ जूनपासून ते १४ आॅक्टोबरपर्यंत तिकीटांत थोडासा दिलासा मिळाला. दुसरीकडे ७ दिवसांच्या प्रवासासासाठी प्रौढांना साध्या बससाठी १ हजार ४०० तर मुलांसाठी ७०० रूपये भरून प्रवास करता येणार आहे. निमआराम बससाठी प्रौढांना १ हजार ६०५ तर मुलांसाठी ८०५ रूपये ७ दिवसांच्या प्रवासासाठी भरावे लागतात. सात दिवसांच्या आंतरराज्यीय प्रवासासाठी १ हजार ७३० तर मुलांसाठी ८६५ रूपये भरून प्रवास करता येणार आहे. गर्दीच्या कालावधीसाठी या तिकीटांच्या दरांपेक्षा कमी गर्दीच्या हंगामात आगाराने थोडासा दिलासा दिला. आगाराचे दर वाढत जात असल्याने प्रवासांच्या खिशाला चाट पडत आहे. इतर वाहतूकीच्या तुलनेत एसटीचे भाढे वाढत राहिल्याने प्रवाशांना बसचा प्रवास डोईजड होतना दिसतो. महामंडळाच्या वाढीव दराचा फायदा हिंगोली आगारास होण्याची शक्यता आहे. इतर वाहतूक नसल्यामुळे प्रवाशांना बसशिवाय पर्याय नसल्यामुळे उत्पन्न वाढीची आशा आहे. (प्रतिनिधी)कायम तोट्याच्या नावाखाली राज्य परिवहन महामंडळाकडून सातत्याने दरांत वाढ केली जाते असताना अलीकडच्या तीन वर्षांत जवळपास दुप्पटीने सर्वच भाड्यांत झाली वाढ. आगाराच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच एसटीचा वर्र्धापन दिन साजरा करताना हळूच परिवहन महांडळाने केली दरात वाढ. प्रामुख्याने वर्षाची विभागणी दोन गटात केली असून १५ आॅक्टोबरपासून ते १४ जूनपर्यंत गर्दीच्या कालावधीत तिकीटांचे वाढीव दर राहणार आहेत. उलट कमी गर्दीच्या १५ जुनपासून ते १४ आॅक्टोबरपर्यंत तिकीटांत थोडासा दिलासा मिळाला. आता चार दिवसांच्या प्रवासासाठी ६५० रूपयांवरून आता ८०० रूपये मोजावे लागतात; परंतु कमी गर्दीच्या कालावधीत ४ दिवसाच्या प्रवासासाठी प्रौढांना ७४० तर मुलांसाठी ३७० रूपये मोजावे लागतात. सात दिवसांच्या प्रवासासाठी प्रौढांना साध्या बससाठी १ हजार ४०० तर मुलांसाठी ७०० रूपये भरून करता येणार प्रवास.