शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये कचरा पेटला; वाहनांची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 00:26 IST

शहरात १४ दिवसांपासून सुरू असलेली कचराकोंडी फुटण्यास मार्ग नसून चारही दिशांकडील गावातील नागरिकांनी खुल्या जागेवर कचरा टाकण्यास विरोध केला. या कचराकोंडीवरून मनपा विरोधात शिमगा पेटला आहे. हर्सूल तलाव परिसर, नक्षत्रवाडी, करोडी, मिटमिटा परिसरासह शहरातील वॉर्डांमधील खुल्या जागेवर कचरा टाकण्यास नागरिकांनी कडाडून विरोध केला. मिटमिटा परिसरात गावक-यांनी कचºयाचा ट्रक पेटविण्याचा प्रयत्न केला तर कांचनवाडी-नक्षत्रवाडीतील महिला व नागरिकांनी कचरा टाकण्यास विरोध करीत आंदोलन केले.

ठळक मुद्देमिटमिट्याजवळ ट्रक पेटवला : मनपाने ५0 ट्रक कचरा जिरविला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरात १४ दिवसांपासून सुरू असलेली कचराकोंडी फुटण्यास मार्ग नसून चारही दिशांकडील गावातील नागरिकांनी खुल्या जागेवर कचरा टाकण्यास विरोध केला. या कचराकोंडीवरून मनपा विरोधात शिमगा पेटला आहे. हर्सूल तलाव परिसर, नक्षत्रवाडी, करोडी, मिटमिटा परिसरासह शहरातील वॉर्डांमधील खुल्या जागेवर कचरा टाकण्यास नागरिकांनी कडाडून विरोध केला. मिटमिटा परिसरात गावकºयांनी कचºयाचा ट्रक पेटविण्याचा प्रयत्न केला तर कांचनवाडी-नक्षत्रवाडीतील महिला व नागरिकांनी कचरा टाकण्यास विरोध करीत आंदोलन केले. कचºयाचे ढीग शहरात वाढू लागले असून, नारेगाव- मांडकी येथील कचरा डेपो हटावच्या विरोधात आंदोलन करणाºया नागरिकांनी कचºयाची होळी करूनन प्रशासकीय यंत्रणेविरोधात बोंबा मारल्या.नारेगाव-मांडकीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता शहराभोवतीच्या सर्व परिसरातून नागरिकांनी विनाप्रक्रियेचा कचरा टाकू देण्यास जोरदार विरोध केला. होळीच्या दिवशी कचरा प्रश्न पेटला. नागरिकांनी कांचनवाडीत कचºयाच्या गाड्या अडवून त्यावर दगडफेक केली. तेथे पोलिसांनी फौजफाट्यासह दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. पडेगाव परिसरात तर कचºयाचा एक ट्रक पेटवून दिल्याने तणाव निर्माण झाला. न्यायालयाच्या आदेशानंतर शहराभोवतीच्या पडेगाव-मिटमिटा, जांभूळवन, हर्सूल तलाव, हर्सूल-सावंगी टोलनाका, पर्यटनस्थळ बीबीका मकबरा, औरंगाबाद लेणी, हनुमान टेकडी येथे कचरा टाकण्याचा प्रयत्न केला. पण सर्व ठिकाणी विनाप्रक्रियेचा कचरा टाकण्यास नागरिकांनी तीव्र विरोध करून पालिकेच्या गाड्या परतवून लावल्या. सकाळी नऊ वाजताच जांभळा येथे जाणाºया कचºयाच्या गाड्यांना नागरिकांनी अडविले. त्यात एमएच-२० ए-३७७४ क्रमांकाच्या ट्रकमधील कचºयाला नागरिकांनी आग लावली. तत्पूर्वी सकाळी काही गाड्या जांभळा येथे खाली करण्यात आल्या. मात्र, तो कचरा पुन्हा सदरील गाडीमध्ये भरण्यास भाग पाडून नागरिकांनी त्या परतवून लावल्या.प्रशासनाने आतापर्यंत काय केलेगेल्या १५ दिवसांपासून शहरात कचराकोंडी निर्माण झाली आहे. रस्त्यांवर सर्वत्र कचºयाचे ढीग साचल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नारेगावच्या आंदोलकांनी चार महिन्यांची मुदत देऊनही प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही. महापौर आणि प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका नगरसेवकांनी घेतलेली आहे. परंतु उच्च न्यायालयाने नेमके काय आदेश दिले, प्रशासनाने आतापर्यंत काय केले, असा सवाल नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीत गुरुवारी उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी सक्षम अधिकारी नसल्यामुळे शहर अभियंता एस. डी. पानझडे यांना द्यावे लागले. महापौर नंदकुमार घोडेले आणि आयुक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असले तरी कचराकोंडी सोडविण्यात यश मिळत नाही. कचºयाचा प्रश्न नेमका आताच का चिघळला? प्रशासन काय करते, उच्च न्यायालयाचे आदेश काय, याचा सविस्तर खुलासा करावा, अशी मागणी सदस्य राजू वैद्य यांनी केली. राजगौरव वानखेडे म्हणाले शहराचे नाव देशात बदनाम झाले असून, नगरसेवकांचीही बदनामी होत आहे. शहर अभियंता पानझडे म्हणाले की, प्रशासन संवेदनशील असून, प्रयत्न केले जात आहेत. तीन ठिकाणी जागेची पाहणी करण्यासाठी गेलो असता नागरिकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. नारेगाव येथे कचरा टाकायला मान्यता मिळाल्यास डीपीआर तयार असून, त्यानुसार कार्यवाही केली जाईल.कांचनवाडीत बळाचा वापरशहराची कचराकोंडी फोडण्यासाठी कांचनवाडी येथील एसटीपी प्लांटच्या बाजूलाच असलेल्या १५ एकर खुल्या जागेवर कचरा टाकण्यासाठी गुरुवारी दुपारी तीन वाजता गाड्या वळविण्यात आल्या. कांचनवाडीतील नागरिकांनी त्या वाहनांवर दगडफेक केली. यात पालिकेच्या पाच-सहा गाड्यांचे नुकसान झाले.घटनेची माहिती मिळताच नागरिकांना समजवण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह पालिकेचे पदाधिकारी, आयुक्त डी. एम. मुगळीकर दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. यावेळी विरोध करणाºया नागरिकांना सातारा पोलिसांनी अटक केली. अखेर बळाचा वापर करून कांचनवाडीत कचºयाच्या काही गाड्या रिक्त करण्यात आल्या.कांचनवाडीत संताप; तुफान दगडफेकऔरंगाबाद : शहरातील कचºयाची वाहतूक करणारा ट्रक अडवून तीन ते चार जणांनी ट्रकमधील कचरा पेटवून दिला. ही घटना मिटमिटा रोडवरील एका ढाब्याजवळ घडली. कांचनवाडी येथे कचºयाची वाहने अडविणाºयांना पोलिसांनी ताब्यात घेताच आंदोलकांनी पैठण रोडवरील दोन एस. टी. बस आणि दोन खाजगी वाहनांवर दगडफेक केली.नारेगाव येथील कचरा डेपोविरोधात मांडकी, गोपाळपूर, वरूड आणि नारेगाव येथील ग्रामस्थांनी १४ दिवसांपासून आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे शहरातील सर्व कॉलन्यांमध्ये कचºयाचे ढीग साचले. त्यामुळे शहरात रोगराईला आमंत्रण मिळते आहे. या पार्श्वभूमीवर मनपाने आज पहाटेपासून शहराच्या चार दिशांना कचरा नेऊन टाकण्यास सुरुवात केली. सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास मिटमिटा रोडने मनपाचे कर्मचारी ट्रकमधून कचरा नेत असताना पाच ते सहा जणांनी त्यांचा ट्रक अडविला. यातील तीन जणांनी ट्रकच्या बोनेटवर लोखंडी टॉमी मारली. तर अन्य तीन ते चार जणांनी ट्रकवर चढून त्यातील कचरा पेटवून दिला. ट्रकच्या मागून पोलीस येत असल्याचे पाहून आग लावणारे आणि ट्रकचालकास धमकावणारे दुचाकीने तेथून पसार झाले. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन पेटलेला कचरा विझविला. या घटनेनंतर चालकाने ट्रक छावणी ठाण्यात नेऊन उभा केला.दुसरी घटना दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास कांचनवाडी येथे घडली. कांचनवाडी येथील विठ्ठल-रुखमाई मंदिरामागे मनपाची ५० एकर जागा आहे. पोलीस बंदोबस्तात मनपाकडून तेथे कचरा नेऊन टाकण्यात येत होता. ही बाब परिसरातील नागरिकांना कळताच सुमारे शंभर ते दीडशे नागरिकांनी कचरा वाहतूक करणारे ट्रक अडविले. ट्रक अडविणाºया ६९ महिला आणि २० पुरुष आंदोलकांना बंदोबस्तावरील पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी धरपकड सुरू करताच उर्वरित लोकांनी अचानक दगडफेक सुरू केली.या दगडफेकीत एस. टी. महामंडळाच्या दोन बसच्या काचा फुटल्या. तर एक मालवाहू ट्रक आणि कारवरही दगडफेक झाली. यात कोणीही जखमी झाले नाही. याप्रकरणी सातारा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.