शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

औरंगाबादमध्ये कचरा पेटला; वाहनांची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 00:26 IST

शहरात १४ दिवसांपासून सुरू असलेली कचराकोंडी फुटण्यास मार्ग नसून चारही दिशांकडील गावातील नागरिकांनी खुल्या जागेवर कचरा टाकण्यास विरोध केला. या कचराकोंडीवरून मनपा विरोधात शिमगा पेटला आहे. हर्सूल तलाव परिसर, नक्षत्रवाडी, करोडी, मिटमिटा परिसरासह शहरातील वॉर्डांमधील खुल्या जागेवर कचरा टाकण्यास नागरिकांनी कडाडून विरोध केला. मिटमिटा परिसरात गावक-यांनी कचºयाचा ट्रक पेटविण्याचा प्रयत्न केला तर कांचनवाडी-नक्षत्रवाडीतील महिला व नागरिकांनी कचरा टाकण्यास विरोध करीत आंदोलन केले.

ठळक मुद्देमिटमिट्याजवळ ट्रक पेटवला : मनपाने ५0 ट्रक कचरा जिरविला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरात १४ दिवसांपासून सुरू असलेली कचराकोंडी फुटण्यास मार्ग नसून चारही दिशांकडील गावातील नागरिकांनी खुल्या जागेवर कचरा टाकण्यास विरोध केला. या कचराकोंडीवरून मनपा विरोधात शिमगा पेटला आहे. हर्सूल तलाव परिसर, नक्षत्रवाडी, करोडी, मिटमिटा परिसरासह शहरातील वॉर्डांमधील खुल्या जागेवर कचरा टाकण्यास नागरिकांनी कडाडून विरोध केला. मिटमिटा परिसरात गावकºयांनी कचºयाचा ट्रक पेटविण्याचा प्रयत्न केला तर कांचनवाडी-नक्षत्रवाडीतील महिला व नागरिकांनी कचरा टाकण्यास विरोध करीत आंदोलन केले. कचºयाचे ढीग शहरात वाढू लागले असून, नारेगाव- मांडकी येथील कचरा डेपो हटावच्या विरोधात आंदोलन करणाºया नागरिकांनी कचºयाची होळी करूनन प्रशासकीय यंत्रणेविरोधात बोंबा मारल्या.नारेगाव-मांडकीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता शहराभोवतीच्या सर्व परिसरातून नागरिकांनी विनाप्रक्रियेचा कचरा टाकू देण्यास जोरदार विरोध केला. होळीच्या दिवशी कचरा प्रश्न पेटला. नागरिकांनी कांचनवाडीत कचºयाच्या गाड्या अडवून त्यावर दगडफेक केली. तेथे पोलिसांनी फौजफाट्यासह दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. पडेगाव परिसरात तर कचºयाचा एक ट्रक पेटवून दिल्याने तणाव निर्माण झाला. न्यायालयाच्या आदेशानंतर शहराभोवतीच्या पडेगाव-मिटमिटा, जांभूळवन, हर्सूल तलाव, हर्सूल-सावंगी टोलनाका, पर्यटनस्थळ बीबीका मकबरा, औरंगाबाद लेणी, हनुमान टेकडी येथे कचरा टाकण्याचा प्रयत्न केला. पण सर्व ठिकाणी विनाप्रक्रियेचा कचरा टाकण्यास नागरिकांनी तीव्र विरोध करून पालिकेच्या गाड्या परतवून लावल्या. सकाळी नऊ वाजताच जांभळा येथे जाणाºया कचºयाच्या गाड्यांना नागरिकांनी अडविले. त्यात एमएच-२० ए-३७७४ क्रमांकाच्या ट्रकमधील कचºयाला नागरिकांनी आग लावली. तत्पूर्वी सकाळी काही गाड्या जांभळा येथे खाली करण्यात आल्या. मात्र, तो कचरा पुन्हा सदरील गाडीमध्ये भरण्यास भाग पाडून नागरिकांनी त्या परतवून लावल्या.प्रशासनाने आतापर्यंत काय केलेगेल्या १५ दिवसांपासून शहरात कचराकोंडी निर्माण झाली आहे. रस्त्यांवर सर्वत्र कचºयाचे ढीग साचल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नारेगावच्या आंदोलकांनी चार महिन्यांची मुदत देऊनही प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही. महापौर आणि प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका नगरसेवकांनी घेतलेली आहे. परंतु उच्च न्यायालयाने नेमके काय आदेश दिले, प्रशासनाने आतापर्यंत काय केले, असा सवाल नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीत गुरुवारी उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी सक्षम अधिकारी नसल्यामुळे शहर अभियंता एस. डी. पानझडे यांना द्यावे लागले. महापौर नंदकुमार घोडेले आणि आयुक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असले तरी कचराकोंडी सोडविण्यात यश मिळत नाही. कचºयाचा प्रश्न नेमका आताच का चिघळला? प्रशासन काय करते, उच्च न्यायालयाचे आदेश काय, याचा सविस्तर खुलासा करावा, अशी मागणी सदस्य राजू वैद्य यांनी केली. राजगौरव वानखेडे म्हणाले शहराचे नाव देशात बदनाम झाले असून, नगरसेवकांचीही बदनामी होत आहे. शहर अभियंता पानझडे म्हणाले की, प्रशासन संवेदनशील असून, प्रयत्न केले जात आहेत. तीन ठिकाणी जागेची पाहणी करण्यासाठी गेलो असता नागरिकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. नारेगाव येथे कचरा टाकायला मान्यता मिळाल्यास डीपीआर तयार असून, त्यानुसार कार्यवाही केली जाईल.कांचनवाडीत बळाचा वापरशहराची कचराकोंडी फोडण्यासाठी कांचनवाडी येथील एसटीपी प्लांटच्या बाजूलाच असलेल्या १५ एकर खुल्या जागेवर कचरा टाकण्यासाठी गुरुवारी दुपारी तीन वाजता गाड्या वळविण्यात आल्या. कांचनवाडीतील नागरिकांनी त्या वाहनांवर दगडफेक केली. यात पालिकेच्या पाच-सहा गाड्यांचे नुकसान झाले.घटनेची माहिती मिळताच नागरिकांना समजवण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह पालिकेचे पदाधिकारी, आयुक्त डी. एम. मुगळीकर दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. यावेळी विरोध करणाºया नागरिकांना सातारा पोलिसांनी अटक केली. अखेर बळाचा वापर करून कांचनवाडीत कचºयाच्या काही गाड्या रिक्त करण्यात आल्या.कांचनवाडीत संताप; तुफान दगडफेकऔरंगाबाद : शहरातील कचºयाची वाहतूक करणारा ट्रक अडवून तीन ते चार जणांनी ट्रकमधील कचरा पेटवून दिला. ही घटना मिटमिटा रोडवरील एका ढाब्याजवळ घडली. कांचनवाडी येथे कचºयाची वाहने अडविणाºयांना पोलिसांनी ताब्यात घेताच आंदोलकांनी पैठण रोडवरील दोन एस. टी. बस आणि दोन खाजगी वाहनांवर दगडफेक केली.नारेगाव येथील कचरा डेपोविरोधात मांडकी, गोपाळपूर, वरूड आणि नारेगाव येथील ग्रामस्थांनी १४ दिवसांपासून आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे शहरातील सर्व कॉलन्यांमध्ये कचºयाचे ढीग साचले. त्यामुळे शहरात रोगराईला आमंत्रण मिळते आहे. या पार्श्वभूमीवर मनपाने आज पहाटेपासून शहराच्या चार दिशांना कचरा नेऊन टाकण्यास सुरुवात केली. सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास मिटमिटा रोडने मनपाचे कर्मचारी ट्रकमधून कचरा नेत असताना पाच ते सहा जणांनी त्यांचा ट्रक अडविला. यातील तीन जणांनी ट्रकच्या बोनेटवर लोखंडी टॉमी मारली. तर अन्य तीन ते चार जणांनी ट्रकवर चढून त्यातील कचरा पेटवून दिला. ट्रकच्या मागून पोलीस येत असल्याचे पाहून आग लावणारे आणि ट्रकचालकास धमकावणारे दुचाकीने तेथून पसार झाले. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन पेटलेला कचरा विझविला. या घटनेनंतर चालकाने ट्रक छावणी ठाण्यात नेऊन उभा केला.दुसरी घटना दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास कांचनवाडी येथे घडली. कांचनवाडी येथील विठ्ठल-रुखमाई मंदिरामागे मनपाची ५० एकर जागा आहे. पोलीस बंदोबस्तात मनपाकडून तेथे कचरा नेऊन टाकण्यात येत होता. ही बाब परिसरातील नागरिकांना कळताच सुमारे शंभर ते दीडशे नागरिकांनी कचरा वाहतूक करणारे ट्रक अडविले. ट्रक अडविणाºया ६९ महिला आणि २० पुरुष आंदोलकांना बंदोबस्तावरील पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी धरपकड सुरू करताच उर्वरित लोकांनी अचानक दगडफेक सुरू केली.या दगडफेकीत एस. टी. महामंडळाच्या दोन बसच्या काचा फुटल्या. तर एक मालवाहू ट्रक आणि कारवरही दगडफेक झाली. यात कोणीही जखमी झाले नाही. याप्रकरणी सातारा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.