शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष सुटल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...
2
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
3
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
4
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
5
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
6
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
7
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
8
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
9
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
10
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
11
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन
12
पाकिस्तानने चीनमधून रिमोट सॅटेलाईट प्रक्षेपित केला, CPEC वर लक्ष ठेवणार
13
Malegaon Blast Case Verdict: प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष सुटले, १७ वर्षांनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला निकाल
14
बदला घ्यायला आली...! नागाला चुकून मारलेले, नागीण नाग पंचमीच्याच दिवशी घरात आली...
15
कोण आहेत कर्नल पुरोहित? ज्यांना मालेगाव स्फोटाप्रकरणी निर्दोष सोडलं; ९ वर्ष जेलमध्ये टॉर्चर केले
16
खाजगी बँकेचा UPI ला धक्का? आता प्रत्येक व्यवहारावर लागणार शुल्क, 'या' तारखेपासून नवा नियम लागू!
17
आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार
18
KBC चा पहिला करोडपती आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा नवरा, 'कमळी' मालिकेत साकारतेय भूमिका
19
जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश 'या' ५ देशांकडून करतोय मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदी! कारण काय?
20
"काँग्रेसच्या विकृत राजकारणाला चपराक, हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान हाणून पाडलं"

रेल्वे रुळावर आत्महत्येपासून रोखले, पण शेवटी काळरात्रीने ‘त्याला’ गाठले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 18:32 IST

रेल्वे रुळावर आलेल्या अनेकांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचे काम रेल्वे सुरक्षा बलाने केले आहे.

ठळक मुद्देरेल्वे रुळावर चार महिन्यांत ३० आत्महत्या युवक, पुरुषांसह महिलांनीही रेल्वेसमोर जीव दिल्याची माहिती

औरंगाबाद : रेल्वे रुळासमोर आत्महत्येसाठी आलेल्या एका व्यक्तीला रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी समजावून परत पाठविले. परंतु या व्यक्तीचा नंतर दीर्घ आजारामुळे मृत्यू झाला. या आजारपणामुळेच तो आत्महत्येसाठी आला होता, ही बाब जेव्हा समोर आली, तेव्हा आत्महत्येपासून परावृत्त करणाऱ्या त्या जवानांनी ‘आम्ही त्याला वाचवले, पण शेवटी तो गेला’ असे म्हणत हळहळ व्यक्त केली.

रेल्वे रुळावर आलेल्या अनेकांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचे काम रेल्वे सुरक्षा बलाने केले आहे. औरंगाबाद रेल्वे मार्गावर २०२० मध्ये ७० जणांनी आत्महत्या केली होती. यंदा गेल्या चार महिन्यांतच रेल्वे रुळावर आत्महत्या करणाऱ्यांची संख्या गतवर्षीपेक्षा निम्मी झाली आहे. जानेवारीपासून आतापर्यंत ३० जणांनी रेल्वेसमोर आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वे रुळावर झालेल्या अपघाताची माहिती घेणे आणि रेल्वेची वाहतूक सुरळीत करण्याचे काम रेल्वे सुरक्षा बलाला करावे लागते. गेल्या काही दिवसांत रेल्वे रुळावर आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. वर्ष २०२० मध्ये लॉकडाऊन लावण्यात आले होते. यामुळे काही काळ रेल्वे सेवा बंद होती. यानंतरच्या काळात ही सेवा सुरळीत झाली. सध्या औरंगाबाद रेल्वे मार्गावर पॅसेंजर रेल्वे वगळता सर्व रेल्वे पूर्वीप्रमाणे धावत आहेत. या सगळ्यात गेल्या चारच महिन्यांत ३० जणांनी आत्महत्या केल्याची नोंद रेल्वे सुरक्षा बलाकडे झाली आहे.

युवक, पुरुषांसह महिलांचीही आत्महत्यायुवक, पुरुषांसह महिलांनीही रेल्वेसमोर जीव दिल्याची माहिती समोर आली आहे. गतवर्षी ७० आणि यावर्षी आतापर्यंत ३० जणांनी आत्महत्या केल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक अरविंदकुमार शर्मा यांनी दिली.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबाद