शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचा प्रवास 22 तासांचा, टेस्टिंगसाठी दीड तास, सोशल डिस्टन्सचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 13:17 IST

सचखंड एक्स्प्रेसने आलेल्या प्रवाशांची तपासणी, अनेकांचे घेतले स्वॅब

ठळक मुद्देरेल्वेस्टेशनवर कोरोना टेस्टिंगची सुविधातपासणी करताना सोशल डिस्टन्सचे पालन होत नाही.

औरंगाबाद : दिल्लीत कोरोना रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर सचखंड एक्स्प्रेसने येणाऱ्या प्रवाशांची रेल्वेस्टेशनवर आरटीपीसीआर तपासणी केली जात आहे. तब्बल २२ तासांचा प्रवास करून येणाऱ्या प्रवाशांना दीड तास रांगेत ताटकळावे लागत आहे. सोशल डिस्टन्सचेही पालन होत नसल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे. शिवाय इतर रेल्वेंतून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी होत नसल्याने कोरोना वाढीचा धोका नाकारता येत नाही.

मार्च महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आल्याने रेल्वे सेवाही बंद करण्यात आली होती. रुग्ण संख्या कमी होत असल्याने अनलॉक प्रक्रिया सुरू करून काही मार्गांवर रेल्वे सेवा केंद्र शासनाने सुरू केली होती. काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याने चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आता दररोज अमृतसर-नांदेड सचखंड एक्स्प्रेसने येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात येत आहे. सचखंड एक्स्प्रेससह सध्या मुंबई आणि हैदराबादसाठी विशेष रेल्वे धावत आहे; परंतु केवळ सचखंड एक्स्प्रेसने येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. यातून कोरोनाबाधितांचा आकडा समोर येत आहे.

रेल्वेस्टेशनवर कोरोना टेस्टिंगची सुविधाऔरंगाबाद रेल्वेस्टेशनवर दिल्ली येथून सचखंड एक्स्प्रेसने येणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीसाठी महापालिकेकडून पथक नेमण्यात आले आहे. येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची माहिती नोंदविल्यानंतर रेल्वे स्टेशनवर तैनात केलेल्या पथकाकडून तपासणीसाठी नाकातील नमुना घेतला जातो. त्यानंतर प्रवासी रवाना होतात. अहवालाची माहिती प्रवाशांना नंतर कळविली जाते.

टेस्टिंगसाठी लागतो वेळटेस्टिंगसाठी प्रवाशांना जवळपास दीड तास रांगेत उभे राहावे लागत आहे. तपासणीसाठी केवळ एकच पथक राहिले तर हा वेळ आणखी वाढतो. शिवाय तपासणी करताना सोशल डिस्टन्सचे पालन होत नाही. प्रवासी रांगेत अगदी एकमेकांच्या जवळ उभे असतात. त्याकडे कोणाचे लक्ष जाताना दिसत नाही. त्यातूनही कोरोनाचे आमंत्रण मिळू शकते.

झांसीहून औरंगाबादला कामासाठी आलो आहे. रेल्वे आल्यानंतर इथे तपासणी होणार असल्याचे कळाले. त्यासाठी रांगेत उभा राहिलो. जवळपास अर्धा तास उलटल्यानंतर माझा नंबर आला आणि तपासणीसाठी नमुना घेण्यात आला.-अमनाथ गुप्ता, प्रवासी

मथुराहून आलो आहे. तपासणीसाठी एक तास रांगेत उभे राहावे लागले. एक तास रांगेत गेला; परंतु तपासणी होणे अधिक गरजेचे आहे. प्रशासन जे काम करीत आहे, ते योग्यच वाटते. -विशाल सिंह, प्रवासी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशनcorona virusकोरोना वायरस बातम्या