शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

औरंगाबादेत केवळ जालना रोडवरच वाहतूक पोलिसांचे ‘लक्ष’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 19:29 IST

शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आयुक्तालयात सध्या चार वाहतूक शाखा कार्यरत आहेत. परंतु पोलिसांचे लक्ष फक्त जालना रोडवरील काही वाहतूक सिग्नलकडेच  केंद्रित झाले आहे.

ठळक मुद्देअन्य वाहतूक सिग्नलची अवस्था ‘असून खोळंबा नसून अडचण’अशी झाली आहे.

- बापू सोळुंके  

औरंगाबाद : शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आयुक्तालयात सध्या चार वाहतूक शाखा कार्यरत आहेत. परंतु पोलिसांचे लक्ष फक्त जालना रोडवरील काही वाहतूक सिग्नलकडेच  केंद्रित झाले आहे. अन्य वाहतूक सिग्नलची अवस्था ‘असून खोळंबा नसून अडचण’अशी झाली आहे. तेथे ना वाहतूक पोलीस असतात, ना तेथे वाहतूक नियमन होते. परिणामी प्रामाणिक वाहनचालक वाहतूक सिग्नलचे नियम पाळतात तर बेशिस्त वाहनचालक बिनधास्त सिग्नल तोडताना नजरेस पडतात. 

सिडको, शहर, छावणी आणि वाळूज, असे चार वाहतूक विभाग आहेत. प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी आणि अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांचा फौजफाटा आहे.  पंधरा वर्षांपूर्वी पोलीस निरीक्षक दर्जाचा एक अधिकारी शहरातील वाहतूक व्यवस्था नियंत्रित करीत असे. आता वाहनांच्या वाढत्या संख्येसोबतच वाहतूक शाखेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या अनेक पटीने वाढली. मात्र प्रभावी पोलिसिंग हरवली. वाहतुकीची विस्कटलेली घडी नीट करण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सामान्यांसाठी खुले चर्चासत्र घेतले होते. या चर्चासत्रात लोकप्रतिनिधींसह सामान्य नागरिकांनी आपली मते मांडताना काही उपाययोजना सुचविल्या होत्या. यापैकी काही सूचनांची तातडीने अंमलबजावणी करण्याची ग्वाही पोलीस अधिकाऱ्यांनी दिली होती. त्या चर्चासत्रापासून आजपर्यंत शहरातील वाहतूक व्यवस्थेत काय बदल केले, याबाबतची माहिती प्रशासन देऊ शकले नाही. 

चंपा चौकातील सिग्नल ‘जैसे थे’लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणीही अद्याप झाली नसल्याचे दिसते. यात प्रामुख्याने चंपा चौकात वाहतूक पोलीस नियुक्त करून तेथील वाहतुकीला शिस्त लावावी, अशी सूचना करण्यात आली होती. मात्र अद्यापही चंपा चौकातील वाहतूक सिग्नलवर वाहतूक पोलीस नियुक्त झाला नाही. तेथील सिग्नल सुरू असते; परंतु त्याकडे कुणी वाहनचालक पाहतच नाही.

एवढेच नव्हे तर लाल दिवा लागल्यानंतर थांबलेल्या वाहनचालकाकडे लोक आश्चर्याने पाहतात. अन्य एका महत्त्वाच्या सूचनेमध्ये सिटीचौक ते जुनाबाजार दरम्यान रस्त्यावर दुतर्फा दुकानदारांनी अतिक्रमण केल्याने ते काढून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी करण्यात आली होती. ही मागणीही अद्याप पूर्ण झाली नाही. यासोबत काही मार्ग एकेरी करण्याची सूचनाही करण्यात आली होती. याकडे दुर्लक्ष करून आता शहर शाखेचे विभाजन करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस