शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

औरंगाबादेत केवळ जालना रोडवरच वाहतूक पोलिसांचे ‘लक्ष’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 19:29 IST

शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आयुक्तालयात सध्या चार वाहतूक शाखा कार्यरत आहेत. परंतु पोलिसांचे लक्ष फक्त जालना रोडवरील काही वाहतूक सिग्नलकडेच  केंद्रित झाले आहे.

ठळक मुद्देअन्य वाहतूक सिग्नलची अवस्था ‘असून खोळंबा नसून अडचण’अशी झाली आहे.

- बापू सोळुंके  

औरंगाबाद : शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आयुक्तालयात सध्या चार वाहतूक शाखा कार्यरत आहेत. परंतु पोलिसांचे लक्ष फक्त जालना रोडवरील काही वाहतूक सिग्नलकडेच  केंद्रित झाले आहे. अन्य वाहतूक सिग्नलची अवस्था ‘असून खोळंबा नसून अडचण’अशी झाली आहे. तेथे ना वाहतूक पोलीस असतात, ना तेथे वाहतूक नियमन होते. परिणामी प्रामाणिक वाहनचालक वाहतूक सिग्नलचे नियम पाळतात तर बेशिस्त वाहनचालक बिनधास्त सिग्नल तोडताना नजरेस पडतात. 

सिडको, शहर, छावणी आणि वाळूज, असे चार वाहतूक विभाग आहेत. प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी आणि अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांचा फौजफाटा आहे.  पंधरा वर्षांपूर्वी पोलीस निरीक्षक दर्जाचा एक अधिकारी शहरातील वाहतूक व्यवस्था नियंत्रित करीत असे. आता वाहनांच्या वाढत्या संख्येसोबतच वाहतूक शाखेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या अनेक पटीने वाढली. मात्र प्रभावी पोलिसिंग हरवली. वाहतुकीची विस्कटलेली घडी नीट करण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सामान्यांसाठी खुले चर्चासत्र घेतले होते. या चर्चासत्रात लोकप्रतिनिधींसह सामान्य नागरिकांनी आपली मते मांडताना काही उपाययोजना सुचविल्या होत्या. यापैकी काही सूचनांची तातडीने अंमलबजावणी करण्याची ग्वाही पोलीस अधिकाऱ्यांनी दिली होती. त्या चर्चासत्रापासून आजपर्यंत शहरातील वाहतूक व्यवस्थेत काय बदल केले, याबाबतची माहिती प्रशासन देऊ शकले नाही. 

चंपा चौकातील सिग्नल ‘जैसे थे’लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणीही अद्याप झाली नसल्याचे दिसते. यात प्रामुख्याने चंपा चौकात वाहतूक पोलीस नियुक्त करून तेथील वाहतुकीला शिस्त लावावी, अशी सूचना करण्यात आली होती. मात्र अद्यापही चंपा चौकातील वाहतूक सिग्नलवर वाहतूक पोलीस नियुक्त झाला नाही. तेथील सिग्नल सुरू असते; परंतु त्याकडे कुणी वाहनचालक पाहतच नाही.

एवढेच नव्हे तर लाल दिवा लागल्यानंतर थांबलेल्या वाहनचालकाकडे लोक आश्चर्याने पाहतात. अन्य एका महत्त्वाच्या सूचनेमध्ये सिटीचौक ते जुनाबाजार दरम्यान रस्त्यावर दुतर्फा दुकानदारांनी अतिक्रमण केल्याने ते काढून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी करण्यात आली होती. ही मागणीही अद्याप पूर्ण झाली नाही. यासोबत काही मार्ग एकेरी करण्याची सूचनाही करण्यात आली होती. याकडे दुर्लक्ष करून आता शहर शाखेचे विभाजन करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस