शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने कमान सांभाळली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
5
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
6
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
7
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
8
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
9
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
10
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
11
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
12
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
13
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
14
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
15
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
16
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
17
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
18
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
19
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
20
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?

अवैध प्रवासी वाहतूक झाली ‘सैराट’!

By admin | Updated: July 22, 2016 00:39 IST

अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांची मनमानी आहे. नंबरला लावलेले वाहन पंधरा प्रवासी बसविल्याशिवाय पुढे सरकत नाही. वाटेत मिळाले,

अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांची मनमानी आहे. नंबरला लावलेले वाहन पंधरा प्रवासी बसविल्याशिवाय पुढे सरकत नाही. वाटेत मिळाले, तर आणखी प्रवासी पायऱ्यांवर उभे केले जातात. लातूर शहरात येणाऱ्या काळी-पिवळीमध्ये मेंढरे भरल्यागत माणसे कोंबलेली असतात. मात्र याकडे ना कोण्या वाहतूक शाखेच्या पोलिसांचे लक्ष जाते ना हद्दीतील ठाण्यांचे. व्यवस्थेचे अंकुश नसल्याने जिल्हाभरात अवैध प्रवासी वाहतूकदारांचा हैदोस सुरु असल्याचे गुरुवारी ‘लोकमत’ चमूने केलेल्या स्टींग आॅपरेशनमधून उघडकीस आले आहे.लातूर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील जिल्हा व राज्य मार्गावर भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमध्ये प्रवासी कोंबून वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या ७० टक्के आहे. तीही भंगार वाहने. त्याचा विचार न करता जास्तीचे उत्पन्न मिळावे, यासाठी मोडकळीस आलेल्या वाहनांतून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन वाहतूक होत असल्याचे शहरातील ५ नंबर चौक, दयानंद गेट, राजीव गांधी चौक, बाभळगाव नाका, गरुड चौक, विवेकानंद चौक, जुना रेणापूर नाका, नवीन रेणापूर नाका, अंबाजोगाई रोड आदी भागांत आढळून आले. शहरातील विवेकानंद चौक व बाभळगाव नाका या भागांत पोलिस चौकीच्या शेजारीच बिनधास्तपणे जास्तीचे प्रवासी घेऊन अवैध प्रवासी वाहतूक करीत असल्याचे दिसून आले. शहरातील औसा रोड भागात एमएच २४ बी ४६, राजीव गांधी चौकात एमएच २४ ई १९२६, बाभळगाव नाका एमएच २३ सी ०६०७, विवेकानंद चौक एमएच २४ एफ ९१४, शाहू चौकात एमएच २४ एफ ९५५, एमएच २४ एफ १४०५, रेणापूर नाका एमएच २४ एफ २३९५, एमएच २४ एबी ३५२५, नवीन रेणापूर नाका एमएच २४ एफ ८६७ या वाहनांतून अवैध प्रवासी वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले.औसा : शहरासह ग्रामीण भागात विविध वाहनांद्वारे होणाऱ्या वाहतुकीचे स्वरुप दिवसेंदिवस वाढत असल्याने त्यावर कोणाचे नियंत्रण नसल्याने वाहतुकीला ‘वैध’ वाहतुकीचे स्वरुप आणले आहे. बस एखाद्या वेळेला आपली वेळ चुकवेल, पण अवैध वाहतूक करणारी वाहने मात्र वेळेवर येत असल्याने जीवाला धोका असला तरी नागरिकही त्याच वाहनांतून जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. या वाहतुकीमुळे व इतर वाहनांच्या वाहतुकीमुळे अ‍ॅप्रोच रोडवर अपघाताची संख्या वाढली असल्याने हा रस्ता म्हणजे ‘मृत्यूचा सापळा’ बनला असल्याचे चित्र औसा तालुक्यातील स्टिंगमधून समोर आले आहे. तसेच पोलिस प्रशासन आणि अवैध वाहतूक करणाऱ्यांचे ‘अर्थ’पूर्ण व्यवहार होत असल्याचे आढळले.रेणापूर : रेणापूर तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक वाढली असून, रेणापूर-पानगाव-लातूर या मार्गांवर काळी-पिवळी, टमटम या वाहनांनी अवैध प्रवासी वाहतुकीचा कहर केला असल्याचे दिसून आले. काळी-पिवळी एमएच २४ एफ ८६६ या वाहनांमध्ये पुढच्या सीटवर ४, मध्यभागी ५ प्रवासी तर मागील सीटवर ८ प्रवासी४तर लोंबकळत ३ प्रवासी असे २ प्रवासी जीपमधून अवैधरित्या प्रवास करीत असल्याचे आढळून आले. या मार्गांवर तासाभराच्या निरीक्षणामध्ये ७ काळी-पिवळी, ९ टमटम अशी वाहने अवैध प्रवासी वाहतूक करीत असलेली आढळून आली. तर ही प्रवासी वाहतूक करणाऱ्या क्लिनर अल्पवयीन असल्याचे आढळून आले.जिल्ह्यातील उदगीर, निलंगा, देवणी, शिरूर अनंतपाळ, औसा, अहमदपूर, जळकोट, चाकूर, रेणापूर आदी तालुक्यांच्या ठिकाणी राजरोसपणे अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. त्यातच काही वाहनांवर अल्पवयीन मुले चालक असल्याचे आढळून आले अन् जीपमध्ये ११ प्रवाशांची मर्यादा असताना चक्क १५, १८ व २० या प्रमाणे लटकत प्रवासी नेत असल्याचे आढळून आले. परंतु, या वाहनाचा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी अवैध प्रवासी वाहने व वाहतूक शाखा घेणार का? असा प्रश्नही प्रवाशांतून चर्चिला जात आहे. परंतु, याकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अवैध वाहनधारक सुसाट वेगाने अवैध प्रवासी वाहतूक करीत असल्याचे आढळून आले.चाकूर तालुक्याच्या सीमेलगत कल्लूरनजिक अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका जीपचा अपघात होऊन नऊ जण मृत्युमुखी पडले. अनेकजण जखमी झाले. तरीही अवैध प्रवासी वाहतूक सुरूच आहे. एमएच २४ एन ४१६, एमएच २४ व्ही ४९२, एमएच २४ एफ १४२४, एमएच २४ - ४९३९ ही वाहने अवैध प्रवासी वाहतूक करताना आढळून आली. कल्लूरची घटना होऊन आठ दिवस झाले नाही तोवरच अवैध प्रवासी वाहतूक पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. यावर पोलिस प्रशासनाचा वचक नसल्याने अवैध प्रवासी वाहनधारक बिनधास्त असल्याचे दिसून आले. परिणामी, नागरिकांना पैसे देऊनही जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.