शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

वसुली निम्म्याने घटल्याने राज्य जीएसटी विभागाच्या झाडाझडतीने व्यापारी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 16:26 IST

औरंगाबाद व जालना मिळून १२ दुकानात एक ते दीड कोटीची कर चुकवेगिरी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

ठळक मुद्देव्यापाऱ्यांना अधिकचा वेळ द्यावायापुढेही कारवाई सुरू राहील

औरंगाबाद : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जीएसटी वसुली निम्म्याने घटल्याने  कर चुकवेगिरीच्या संशयावरून  राज्य जीएसटी विभागाने व्यापाऱ्यांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. यामुळे व्यापारी वर्ग त्रस्त झाला आहे. 

आर्थिक वर्ष एप्रिल ते सप्टेंबर २०१९ या दरम्यान राज्य जीएसटी विभागात १०४० कोटी २४ लाख रुपये महसूल जमा झाला होता. यंदा एप्रिल ते सप्टेंबर २०२०  या कालावधीत ५२६ कोटी १२ लाख रुपये महसूल जमा झाला. म्हणजे मागील वर्षीपेक्षा यंदा सरकारी तिजोरीत ४९.४२ टक्के कमी  महसूल जमा झाला आहे. यामुळे उद्दिष्टपूर्ण करण्यासाठी जीएसटी विभागाने कारवाईला सुरुवात केली. दिवाळी आधी राज्य जीएसटी विभागाने कर चुकवेगिरीच्या संशयाने शहरातील व जालन्यातील ८ व दिवाळी नंतर शहरातील ४ अशा १२ दुकानाची तपासणी  केली. 

कोरोनामुळे २४ मार्च ते ४ जूनपर्यंत लॉकडाऊनमुळे दुकाने बंद होती. याचा मोठा फटका व्यापारी वर्गाला बसला. त्यातून सावरत आता व्यवहाराची गाडी रुळावर येत असताना जीएसटी विभागाने कारवाई सुरू केल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. बिल मिसमॅच होणे, उधारी वेळेवर वसूल न होणे आदी कारणामुळे अनेक व्यापारी जीएसटी भरण्याची इच्छा असतानाही तो वेळेवर भरू शकले नाही. असे अनेक कारण व्यापाऱ्यांनी सांगितले. जीएसटीच्या कारवाईमुळे प्रामाणिक व्यापारीही भरडले जात असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

दिवाळी आधी ४ किराणा दुकानदार, २ सुकामेवा व मसाला दुकानदार, मसाला १ व होजियारी १ दुकान व २ दिवसाआधी शहरतील ३ तंबाखू होलसेल दुकानात कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडील एकूण माल खरेदी, विक्री, उधारी खाते, बँक खाते आदींची तपासणी करण्यात आली व  बिल ताब्यात घेण्यात आले. औरंगाबाद व जालना मिळून १२ दुकानात एक ते दीड कोटीची कर चुकवेगिरी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अजून तपासणी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

व्यापाऱ्यांना अधिकचा वेळ द्यावाकर चुकवेगिरी करणाऱ्यांवर कारवाई करावी, यात कोणतेच दुमत नाही. मात्र, २४ मार्च ते ४ जूनदरम्यान लॉकडाऊनमुळे दुकाने बंद होती. नवरात्रानंतर व्यवहाराने गती आली व दिवाळीपर्यंत व्यवसाय चांगला झाला. कोणत्याही व्यापाऱ्यांची कर बुडविण्याची इच्छा नसते. मात्र, काही जणांकडून कर भरणे राहून गेले असेल. त्यांना चूक सुधारण्यासाठी मुदतवाढ द्यावी. कारण कोरोनामुळे सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत  ५१ टक्के जीएसटी भरला गेला आहे. - जगन्नाथ काळे, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ

यापुढेही कारवाई सुरू राहील

मागील वर्षी आर्थिक वर्षाच्या पहिल्या ६ महिन्यांच्या तुलनेत यंदा ५१४ कोटी १२ लाख रुपयांचा जीएसटी व व्हॅट कमी भरण्यात आला आहे. कर चुकवेगिरीच्या संशयावरून व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. यापुढेही कारवाई सुरू राहील. यासाठी ४ अधिकारी व  २० निरीक्षक यांचे पथक तयार करण्यात आले आहे. नियमित कर भरणारे, प्रामाणिक व्यापाऱ्यांना याचा काहीच त्रास नाही. व्यापाऱ्यांनी दिलेल्या मुदतीत, वेळेवर जीएसटी भरावा. - रवींद्र जोगदंड, उपआयुक्त, अन्वेषण विभाग, एसजीएसटी

टॅग्स :GSTजीएसटीAurangabadऔरंगाबादraidधाड