शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

वसुली निम्म्याने घटल्याने राज्य जीएसटी विभागाच्या झाडाझडतीने व्यापारी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 16:26 IST

औरंगाबाद व जालना मिळून १२ दुकानात एक ते दीड कोटीची कर चुकवेगिरी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

ठळक मुद्देव्यापाऱ्यांना अधिकचा वेळ द्यावायापुढेही कारवाई सुरू राहील

औरंगाबाद : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जीएसटी वसुली निम्म्याने घटल्याने  कर चुकवेगिरीच्या संशयावरून  राज्य जीएसटी विभागाने व्यापाऱ्यांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. यामुळे व्यापारी वर्ग त्रस्त झाला आहे. 

आर्थिक वर्ष एप्रिल ते सप्टेंबर २०१९ या दरम्यान राज्य जीएसटी विभागात १०४० कोटी २४ लाख रुपये महसूल जमा झाला होता. यंदा एप्रिल ते सप्टेंबर २०२०  या कालावधीत ५२६ कोटी १२ लाख रुपये महसूल जमा झाला. म्हणजे मागील वर्षीपेक्षा यंदा सरकारी तिजोरीत ४९.४२ टक्के कमी  महसूल जमा झाला आहे. यामुळे उद्दिष्टपूर्ण करण्यासाठी जीएसटी विभागाने कारवाईला सुरुवात केली. दिवाळी आधी राज्य जीएसटी विभागाने कर चुकवेगिरीच्या संशयाने शहरातील व जालन्यातील ८ व दिवाळी नंतर शहरातील ४ अशा १२ दुकानाची तपासणी  केली. 

कोरोनामुळे २४ मार्च ते ४ जूनपर्यंत लॉकडाऊनमुळे दुकाने बंद होती. याचा मोठा फटका व्यापारी वर्गाला बसला. त्यातून सावरत आता व्यवहाराची गाडी रुळावर येत असताना जीएसटी विभागाने कारवाई सुरू केल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. बिल मिसमॅच होणे, उधारी वेळेवर वसूल न होणे आदी कारणामुळे अनेक व्यापारी जीएसटी भरण्याची इच्छा असतानाही तो वेळेवर भरू शकले नाही. असे अनेक कारण व्यापाऱ्यांनी सांगितले. जीएसटीच्या कारवाईमुळे प्रामाणिक व्यापारीही भरडले जात असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

दिवाळी आधी ४ किराणा दुकानदार, २ सुकामेवा व मसाला दुकानदार, मसाला १ व होजियारी १ दुकान व २ दिवसाआधी शहरतील ३ तंबाखू होलसेल दुकानात कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडील एकूण माल खरेदी, विक्री, उधारी खाते, बँक खाते आदींची तपासणी करण्यात आली व  बिल ताब्यात घेण्यात आले. औरंगाबाद व जालना मिळून १२ दुकानात एक ते दीड कोटीची कर चुकवेगिरी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अजून तपासणी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

व्यापाऱ्यांना अधिकचा वेळ द्यावाकर चुकवेगिरी करणाऱ्यांवर कारवाई करावी, यात कोणतेच दुमत नाही. मात्र, २४ मार्च ते ४ जूनदरम्यान लॉकडाऊनमुळे दुकाने बंद होती. नवरात्रानंतर व्यवहाराने गती आली व दिवाळीपर्यंत व्यवसाय चांगला झाला. कोणत्याही व्यापाऱ्यांची कर बुडविण्याची इच्छा नसते. मात्र, काही जणांकडून कर भरणे राहून गेले असेल. त्यांना चूक सुधारण्यासाठी मुदतवाढ द्यावी. कारण कोरोनामुळे सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत  ५१ टक्के जीएसटी भरला गेला आहे. - जगन्नाथ काळे, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ

यापुढेही कारवाई सुरू राहील

मागील वर्षी आर्थिक वर्षाच्या पहिल्या ६ महिन्यांच्या तुलनेत यंदा ५१४ कोटी १२ लाख रुपयांचा जीएसटी व व्हॅट कमी भरण्यात आला आहे. कर चुकवेगिरीच्या संशयावरून व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. यापुढेही कारवाई सुरू राहील. यासाठी ४ अधिकारी व  २० निरीक्षक यांचे पथक तयार करण्यात आले आहे. नियमित कर भरणारे, प्रामाणिक व्यापाऱ्यांना याचा काहीच त्रास नाही. व्यापाऱ्यांनी दिलेल्या मुदतीत, वेळेवर जीएसटी भरावा. - रवींद्र जोगदंड, उपआयुक्त, अन्वेषण विभाग, एसजीएसटी

टॅग्स :GSTजीएसटीAurangabadऔरंगाबादraidधाड