शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

औरंगाबादेतील तब्बल १८ रुग्णालये अग्निशमन यंत्रणेविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 16:55 IST

पन्नास खाटांपेक्षा मोठ्या रुग्णालयांना अग्निशमन यंत्रणा बसविणे नियमानुसार गरजेचे आहे. शहरातील १८ पेक्षा अधिक रुग्णालयांनी मागील काही वर्षांपासून ही यंत्रणाच बसविलेली नाही.

औैरंगाबाद : पन्नास खाटांपेक्षा मोठ्या रुग्णालयांना अग्निशमन यंत्रणा बसविणे नियमानुसार गरजेचे आहे. शहरातील १८ पेक्षा अधिक रुग्णालयांनी मागील काही वर्षांपासून ही यंत्रणाच बसविलेली नाही. अनधिकृतपणे ही रुग्णालये सुरू असतानाही महापालिका प्रशासन कारवाईचा बडगा उगारायला तयार नाही. नियमबाह्यपणे सुरू असलेल्या रुग्णालयांना महापालिका पाठीशी कशासाठी घालत आहे, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

माणिक हॉस्पिटलच्याआग प्रकरणानंतर शहरातील सर्वच रुग्णालयांचा मुद्दा आता चव्हाट्यावर आला आहे. पन्नास खाटांपेक्षा मोठा दवाखाना असल्यास अग्निशमन यंत्रणा बसविणे सक्तीचे करण्यात आले आहे. ४९ खाटांचा दवाखाना असल्यास त्याला अग्निशमन यंत्रणेतून सूट आहे. शहरात लहान-मोठे १ हजारहून अधिक रुग्णालये आहेत. अनेक ओपीडी दवाखाने आहेत. तेथे एक किंवा दोन बेड आहेत. दिवसभर पेशंट ठेवण्याची सोय त्यात आहे. अनेक रुग्णालये रात्री रुग्णांना ठेवत नाहीत. ५० खाटांपेक्षा मोठ्या दवाखान्यांची संख्या ४८ आहे. त्यातील ३० रुग्णालयांनी अग्निशमन यंत्रणा बसविली आहे. वेळोवेळी त्यांच्याकडून यंत्रणेचे नूतनीकरण करण्यात येते. 

अग्निशमन विभागाकडून त्यासंबंधीची एनओसीही मिळविण्यात येते. १८ रुग्णालयांनी मागील काही वर्षांमध्ये अग्निशमन यंत्रणाच बसविलेली नाही. काहींनी बसविली असली तरी मनपाकडून नूतनीकरण करून घेतलेले नाही. जुन्या कालबाह्य यंत्रणेवरच कामकाज सुरू आहे. महापालिकेने आजपर्यंत एकाही रुग्णालयावर कारवाई केलेली नाही. रुग्णालय बंद करण्याचीही तरतूद अग्निशमन कायद्यात आहे. १८ रुग्णालयांमध्ये किमान ८०० ते ९०० रुग्ण दाखल होत असतील असा अंदाज आहे. या रुग्णालयांना उद्या आग लागून मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण राहणार आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलfireआगAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद