शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

औरंगाबादेतील तब्बल १८ रुग्णालये अग्निशमन यंत्रणेविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 16:55 IST

पन्नास खाटांपेक्षा मोठ्या रुग्णालयांना अग्निशमन यंत्रणा बसविणे नियमानुसार गरजेचे आहे. शहरातील १८ पेक्षा अधिक रुग्णालयांनी मागील काही वर्षांपासून ही यंत्रणाच बसविलेली नाही.

औैरंगाबाद : पन्नास खाटांपेक्षा मोठ्या रुग्णालयांना अग्निशमन यंत्रणा बसविणे नियमानुसार गरजेचे आहे. शहरातील १८ पेक्षा अधिक रुग्णालयांनी मागील काही वर्षांपासून ही यंत्रणाच बसविलेली नाही. अनधिकृतपणे ही रुग्णालये सुरू असतानाही महापालिका प्रशासन कारवाईचा बडगा उगारायला तयार नाही. नियमबाह्यपणे सुरू असलेल्या रुग्णालयांना महापालिका पाठीशी कशासाठी घालत आहे, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

माणिक हॉस्पिटलच्याआग प्रकरणानंतर शहरातील सर्वच रुग्णालयांचा मुद्दा आता चव्हाट्यावर आला आहे. पन्नास खाटांपेक्षा मोठा दवाखाना असल्यास अग्निशमन यंत्रणा बसविणे सक्तीचे करण्यात आले आहे. ४९ खाटांचा दवाखाना असल्यास त्याला अग्निशमन यंत्रणेतून सूट आहे. शहरात लहान-मोठे १ हजारहून अधिक रुग्णालये आहेत. अनेक ओपीडी दवाखाने आहेत. तेथे एक किंवा दोन बेड आहेत. दिवसभर पेशंट ठेवण्याची सोय त्यात आहे. अनेक रुग्णालये रात्री रुग्णांना ठेवत नाहीत. ५० खाटांपेक्षा मोठ्या दवाखान्यांची संख्या ४८ आहे. त्यातील ३० रुग्णालयांनी अग्निशमन यंत्रणा बसविली आहे. वेळोवेळी त्यांच्याकडून यंत्रणेचे नूतनीकरण करण्यात येते. 

अग्निशमन विभागाकडून त्यासंबंधीची एनओसीही मिळविण्यात येते. १८ रुग्णालयांनी मागील काही वर्षांमध्ये अग्निशमन यंत्रणाच बसविलेली नाही. काहींनी बसविली असली तरी मनपाकडून नूतनीकरण करून घेतलेले नाही. जुन्या कालबाह्य यंत्रणेवरच कामकाज सुरू आहे. महापालिकेने आजपर्यंत एकाही रुग्णालयावर कारवाई केलेली नाही. रुग्णालय बंद करण्याचीही तरतूद अग्निशमन कायद्यात आहे. १८ रुग्णालयांमध्ये किमान ८०० ते ९०० रुग्ण दाखल होत असतील असा अंदाज आहे. या रुग्णालयांना उद्या आग लागून मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण राहणार आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलfireआगAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद