शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान; जिल्हा परिषद अध्यक्षांचे पंचनामा करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 13:24 IST

Rain in Aurangabad : भांबर्डा, दुधड, जयपूर, कुबेर गेवराई परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे

ठळक मुद्देफळबाग, कपाशी, कांदा, जनावरांचा चाराही वाहून गेल्याची शेतकऱ्यांची कैफियत नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे व उद्यापर्यंत जिल्हा प्रशासनाला सादर करण्याचे आदेश

करमाड : औरंगाबाद तालुक्यातील भांबर्डा, दुधड, जयपूर, कुबेर गेवराई यासह अनेक गावांना बुधवारी ( दि.०९ ) झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूस नाली केलेली नसल्याने थेट शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसून पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आज जिल्हा परिषद अध्यक्षा मीनाताई शेळके, तहसीलदार ज्योती पवार, तालुका कृषी अधिकारी हर्षदा जगताप, मंडळ अधिकारी देवलाल  केदारे, कृषी सहाय्यक संजीव साठे, तलाठी वैशाली कांबळे, ग्रामसेवक अनिल केंद्रेकर, सभापती राजू घागरे यांच्या पथकाने नुकसानीची पाहणी केली. 

तालुक्यातील भांबर्डा, दुधड, जयपूर, कुबेर गेवराई परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे जागोजागी शेतातील बंधारे फुटल्याने शेतातील कसदार माती वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.अनेक फळ बागेतही पाणी साचून  त्या फळ बागेचेही मोठे नुकसान झाले असून ही अत्यंत भीषण परिस्थिती शेतकर्‍यांसमोर मोठे संकटच उभं राहिले आहे. काही ठिकाणी झालेल्या पावसाचे पाणी समृद्धी महामार्गाच्या व्यवस्थापकाच्या निष्काळजीपणामुळे चुकीच्या पद्धतीने तयार केलेल्या पुलामुळे शेतकऱ्यांच्या कांदा, जनावरांचे चारा, डाळींब पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 

फळबाग, कपाशी, कांदा, जनावरांचा चाराही वाहून गेल्याची कैफियत पाहणी दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्षा व अधिकार्‍यांच्या पथकासमोर शेतकऱ्यांनी मांडली. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे व उद्यापर्यंत जिल्हा प्रशासनाला सादर करावी अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्षा शेळके यांनी दिल्या. तसेच शेतकऱ्यांनी या नुकसानीची भरपाई देण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन जिल्हा परिषद अध्यक्षांच्या हस्ते तहसीलदार ज्योती पवार यांना दिले.  यावेळी भांबर्डा सरपंच भिमराव पठाडे, उपसरपंच सजन शिंदे, माजी उपसरपंच सुखदेव पठाडे, दौलत पठाडे, संताराम फुकटे, अंबादास पठाडे, सोमीनाथ जाधव, संतोष दिवटे, बळीराम काळे, मंडळाधिकारी देवलाल केदारे, तलाठी वैशाली कांबळे, कृषी सहाय्यक संजीव साठे, बनगाव सरपंच भास्करराव मुरुमे, सभापती राजू घागरे, संजय पठाडे, गजानन मते, परमेश्वर पठाडे,राजेंद्र पठाडे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबाद