शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान; जिल्हा परिषद अध्यक्षांचे पंचनामा करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 13:24 IST

Rain in Aurangabad : भांबर्डा, दुधड, जयपूर, कुबेर गेवराई परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे

ठळक मुद्देफळबाग, कपाशी, कांदा, जनावरांचा चाराही वाहून गेल्याची शेतकऱ्यांची कैफियत नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे व उद्यापर्यंत जिल्हा प्रशासनाला सादर करण्याचे आदेश

करमाड : औरंगाबाद तालुक्यातील भांबर्डा, दुधड, जयपूर, कुबेर गेवराई यासह अनेक गावांना बुधवारी ( दि.०९ ) झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूस नाली केलेली नसल्याने थेट शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसून पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आज जिल्हा परिषद अध्यक्षा मीनाताई शेळके, तहसीलदार ज्योती पवार, तालुका कृषी अधिकारी हर्षदा जगताप, मंडळ अधिकारी देवलाल  केदारे, कृषी सहाय्यक संजीव साठे, तलाठी वैशाली कांबळे, ग्रामसेवक अनिल केंद्रेकर, सभापती राजू घागरे यांच्या पथकाने नुकसानीची पाहणी केली. 

तालुक्यातील भांबर्डा, दुधड, जयपूर, कुबेर गेवराई परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे जागोजागी शेतातील बंधारे फुटल्याने शेतातील कसदार माती वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.अनेक फळ बागेतही पाणी साचून  त्या फळ बागेचेही मोठे नुकसान झाले असून ही अत्यंत भीषण परिस्थिती शेतकर्‍यांसमोर मोठे संकटच उभं राहिले आहे. काही ठिकाणी झालेल्या पावसाचे पाणी समृद्धी महामार्गाच्या व्यवस्थापकाच्या निष्काळजीपणामुळे चुकीच्या पद्धतीने तयार केलेल्या पुलामुळे शेतकऱ्यांच्या कांदा, जनावरांचे चारा, डाळींब पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 

फळबाग, कपाशी, कांदा, जनावरांचा चाराही वाहून गेल्याची कैफियत पाहणी दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्षा व अधिकार्‍यांच्या पथकासमोर शेतकऱ्यांनी मांडली. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे व उद्यापर्यंत जिल्हा प्रशासनाला सादर करावी अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्षा शेळके यांनी दिल्या. तसेच शेतकऱ्यांनी या नुकसानीची भरपाई देण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन जिल्हा परिषद अध्यक्षांच्या हस्ते तहसीलदार ज्योती पवार यांना दिले.  यावेळी भांबर्डा सरपंच भिमराव पठाडे, उपसरपंच सजन शिंदे, माजी उपसरपंच सुखदेव पठाडे, दौलत पठाडे, संताराम फुकटे, अंबादास पठाडे, सोमीनाथ जाधव, संतोष दिवटे, बळीराम काळे, मंडळाधिकारी देवलाल केदारे, तलाठी वैशाली कांबळे, कृषी सहाय्यक संजीव साठे, बनगाव सरपंच भास्करराव मुरुमे, सभापती राजू घागरे, संजय पठाडे, गजानन मते, परमेश्वर पठाडे,राजेंद्र पठाडे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबाद