शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अनेक शाळांत वाटप केले फाटके, डाग असलेले ध्वज; पुरवठाधारकाने गुंडाळली तिरंगा ध्वजसंहिता !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 12:53 IST

शिक्षकांनी ग्रामपंचायतीकडून त्यानुसार ध्वज विकत घेतले तेव्हा अनेक ध्वजांची किनार उसवलेली, दोरे निघालेले आहेत, काही ध्वजांवर अशोकचक्र मधोमध नसून एका बाजूला छापलेले आहेत

औरंगाबाद : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी शासनाने ‘हर घर तिरंगा’ हे अभियान हाती घेतले असून, दि. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान, घरोघरी, शाळा, ग्रामपंचायत तसेच सर्व शासकीय कार्यालयांवर तिरंगा ध्वज फडकावला जाणार आहे. दरम्यान, प्रशासनाने ध्वज पुरवठ्यासाठी एका संस्थेला कंत्राट दिले असून, या संस्थेने संहितेनुसार ध्वज आहेत का, याची तपासणी न करताच ग्रामीण भागात विक्रीसाठी ते वितरित केेले आहेत.

यासंदर्भात पैठण तालुक्यातील पालकांनी ‘लोकमत’कडे केलेल्या तक्रारीनुसार जि. प. शाळांसाठी ग्रामपंचायत कार्यालयात पुरवठादार संस्थेने तिरंगा ध्वज विक्रीसाठी ठेवले आहेत. मुख्याध्यापकांच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांनी ध्वजासाठी शिक्षकांकडे पैसे जमा केले. शिक्षकांनी ग्रामपंचायतीकडून त्यानुसार ध्वज विकत घेतले तेव्हा अनेक ध्वजांची किनार उसवलेली, दोरे निघालेले आहेत, काही ध्वजांवर अशोकचक्र मधोमध नसून एका बाजूला छापलेले आहेत, अनके ध्वज फिके, गडद, तर काहींवर डाग पडलेले, काही ध्वज वेड्यावाकड्या शिलाईचे निघाले. त्यामुळे ध्वजसंहितेचा अवमान होईल, या भीतीपोटी पाडळी, लाखेगाव, निलजगाव शाळांचे शिक्षक हवालदिल झाले असून, त्यांनी ते ध्वज ग्रामपंचायतीकडे परत केले आहेत.

१५-२० टक्के ध्वज खराबयासंदर्भात जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी सांगितले की, सूरत येथील उत्पादकांकडून प्राप्त झालेले १५ ते २० टक्के ध्वज खराब असल्याच्या तक्रारी आहेत. खराब ध्वज बदलून देण्याच्या सूचना पुरवठादाराला केल्या आहेत. देशभरातून ध्वजाला मागणी आहे आणि अतिशय कमी अवधीत ध्वजांचा पुरवठा होत असल्यामुळे, अशी परिस्थिती उद्भवली असावी.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादIndependence Dayस्वातंत्र्य दिन