शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

अनेक शाळांत वाटप केले फाटके, डाग असलेले ध्वज; पुरवठाधारकाने गुंडाळली तिरंगा ध्वजसंहिता !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 12:53 IST

शिक्षकांनी ग्रामपंचायतीकडून त्यानुसार ध्वज विकत घेतले तेव्हा अनेक ध्वजांची किनार उसवलेली, दोरे निघालेले आहेत, काही ध्वजांवर अशोकचक्र मधोमध नसून एका बाजूला छापलेले आहेत

औरंगाबाद : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी शासनाने ‘हर घर तिरंगा’ हे अभियान हाती घेतले असून, दि. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान, घरोघरी, शाळा, ग्रामपंचायत तसेच सर्व शासकीय कार्यालयांवर तिरंगा ध्वज फडकावला जाणार आहे. दरम्यान, प्रशासनाने ध्वज पुरवठ्यासाठी एका संस्थेला कंत्राट दिले असून, या संस्थेने संहितेनुसार ध्वज आहेत का, याची तपासणी न करताच ग्रामीण भागात विक्रीसाठी ते वितरित केेले आहेत.

यासंदर्भात पैठण तालुक्यातील पालकांनी ‘लोकमत’कडे केलेल्या तक्रारीनुसार जि. प. शाळांसाठी ग्रामपंचायत कार्यालयात पुरवठादार संस्थेने तिरंगा ध्वज विक्रीसाठी ठेवले आहेत. मुख्याध्यापकांच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांनी ध्वजासाठी शिक्षकांकडे पैसे जमा केले. शिक्षकांनी ग्रामपंचायतीकडून त्यानुसार ध्वज विकत घेतले तेव्हा अनेक ध्वजांची किनार उसवलेली, दोरे निघालेले आहेत, काही ध्वजांवर अशोकचक्र मधोमध नसून एका बाजूला छापलेले आहेत, अनके ध्वज फिके, गडद, तर काहींवर डाग पडलेले, काही ध्वज वेड्यावाकड्या शिलाईचे निघाले. त्यामुळे ध्वजसंहितेचा अवमान होईल, या भीतीपोटी पाडळी, लाखेगाव, निलजगाव शाळांचे शिक्षक हवालदिल झाले असून, त्यांनी ते ध्वज ग्रामपंचायतीकडे परत केले आहेत.

१५-२० टक्के ध्वज खराबयासंदर्भात जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी सांगितले की, सूरत येथील उत्पादकांकडून प्राप्त झालेले १५ ते २० टक्के ध्वज खराब असल्याच्या तक्रारी आहेत. खराब ध्वज बदलून देण्याच्या सूचना पुरवठादाराला केल्या आहेत. देशभरातून ध्वजाला मागणी आहे आणि अतिशय कमी अवधीत ध्वजांचा पुरवठा होत असल्यामुळे, अशी परिस्थिती उद्भवली असावी.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादIndependence Dayस्वातंत्र्य दिन