शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

‘जलपरी’ घेणार उद्या लातूरकरांचा निरोप

By admin | Updated: August 8, 2016 00:41 IST

लातूर : लातूर शहरात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे राज्य व केंद्राच्या मदतीने जलपरी लातूरकरांच्या मदतीला धावून आली.

लातूर : लातूर शहरात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे राज्य व केंद्राच्या मदतीने जलपरी लातूरकरांच्या मदतीला धावून आली. १२ एप्रिलपासून या जलपरीने लातूरकरांची तहान भागविली. आतापर्यंत २५ कोटी ४५ लाख लिटर पाणी या जलपरीने लातूरकरांना दिले आहे. लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात पाणी नसले तरी साई व नागझरी बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. त्यामुळे लातूर मनपाने या प्रकल्पातून पाणीपुरवठा सुरू केला आहे. परिणामी, जलपरीची सेवा मंगळवारपासून बंद होत आहे.लातूर शहरामध्ये गेल्या साडेसहा महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई होती. पंधरा दिवसांपूर्वी लातूर शहरात मोठा पाऊस झाला आणि जिल्ह्यातील बंधारे व मध्यम प्रकल्पात बऱ्यापैकी पाणी साठले आहे. साई व नागझरी बंधारा पूर्ण क्षमतेने भरला आहे. या दोन्ही प्रकल्पांतून लातूर शहरात पाणीपुरवठा करण्यात येत आहे. काही भागात नळाद्वारेही पाणीपुरवठा करण्यात आला आहे. चांगल्या प्रमाणात पाणी साठवणूक झाल्यामुळे मनपाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत रेल्वे प्रशासनाला २ आॅगस्ट रोजी पत्र पाठवून जलपरीची सेवा बंद करण्यास काही हरकत नाही, असे कळविले आहे. त्यानुसार सोमवारी शेवटची ट्रीप जलपरी करणार आहे. आतापर्यंत या जलपरीने ११० फेऱ्या केल्या आहेत. १० वॅगनच्या नऊ आणि ५० वॅगनच्या १०० अशा एकूण ११० फेऱ्या झाल्या आहेत. सोमवारी होत असलेली १११ वी फेरी होणार आहे. १० वॅगनच्या नऊ फेऱ्यांद्वारे प्रत्येकी ५ लाख लिटर पाणी आणण्यात आले. तर ५० वॅगनच्या जलपरीने प्रत्येकी २५ लाख लिटर पाणी आणले आहे. २ कोटी ४५ लाख लिटर पाणी आणून या जलपरीने लातूरकरांची तहान भागविली आहे. सोमवारी होत असलेली १११ वी फेरी आहे. या १११ फेऱ्यांद्वारे २५ कोटी ७० लाख लिटर पाणी लातूरकरांना या जलपरीने दिले आहे. त्यामुळे सोमवारी जलपरीला मोठ्या उत्साहात निरोप दिला जाणार असल्याचे मनपातील सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)