शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
5
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
6
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
7
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
8
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
9
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
10
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
11
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
12
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

‘जलपरी’ घेणार उद्या लातूरकरांचा निरोप

By admin | Updated: August 8, 2016 00:41 IST

लातूर : लातूर शहरात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे राज्य व केंद्राच्या मदतीने जलपरी लातूरकरांच्या मदतीला धावून आली.

लातूर : लातूर शहरात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे राज्य व केंद्राच्या मदतीने जलपरी लातूरकरांच्या मदतीला धावून आली. १२ एप्रिलपासून या जलपरीने लातूरकरांची तहान भागविली. आतापर्यंत २५ कोटी ४५ लाख लिटर पाणी या जलपरीने लातूरकरांना दिले आहे. लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात पाणी नसले तरी साई व नागझरी बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. त्यामुळे लातूर मनपाने या प्रकल्पातून पाणीपुरवठा सुरू केला आहे. परिणामी, जलपरीची सेवा मंगळवारपासून बंद होत आहे.लातूर शहरामध्ये गेल्या साडेसहा महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई होती. पंधरा दिवसांपूर्वी लातूर शहरात मोठा पाऊस झाला आणि जिल्ह्यातील बंधारे व मध्यम प्रकल्पात बऱ्यापैकी पाणी साठले आहे. साई व नागझरी बंधारा पूर्ण क्षमतेने भरला आहे. या दोन्ही प्रकल्पांतून लातूर शहरात पाणीपुरवठा करण्यात येत आहे. काही भागात नळाद्वारेही पाणीपुरवठा करण्यात आला आहे. चांगल्या प्रमाणात पाणी साठवणूक झाल्यामुळे मनपाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत रेल्वे प्रशासनाला २ आॅगस्ट रोजी पत्र पाठवून जलपरीची सेवा बंद करण्यास काही हरकत नाही, असे कळविले आहे. त्यानुसार सोमवारी शेवटची ट्रीप जलपरी करणार आहे. आतापर्यंत या जलपरीने ११० फेऱ्या केल्या आहेत. १० वॅगनच्या नऊ आणि ५० वॅगनच्या १०० अशा एकूण ११० फेऱ्या झाल्या आहेत. सोमवारी होत असलेली १११ वी फेरी होणार आहे. १० वॅगनच्या नऊ फेऱ्यांद्वारे प्रत्येकी ५ लाख लिटर पाणी आणण्यात आले. तर ५० वॅगनच्या जलपरीने प्रत्येकी २५ लाख लिटर पाणी आणले आहे. २ कोटी ४५ लाख लिटर पाणी आणून या जलपरीने लातूरकरांची तहान भागविली आहे. सोमवारी होत असलेली १११ वी फेरी आहे. या १११ फेऱ्यांद्वारे २५ कोटी ७० लाख लिटर पाणी लातूरकरांना या जलपरीने दिले आहे. त्यामुळे सोमवारी जलपरीला मोठ्या उत्साहात निरोप दिला जाणार असल्याचे मनपातील सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)