शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

‘जलपरी’ घेणार उद्या लातूरकरांचा निरोप

By admin | Updated: August 8, 2016 00:41 IST

लातूर : लातूर शहरात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे राज्य व केंद्राच्या मदतीने जलपरी लातूरकरांच्या मदतीला धावून आली.

लातूर : लातूर शहरात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे राज्य व केंद्राच्या मदतीने जलपरी लातूरकरांच्या मदतीला धावून आली. १२ एप्रिलपासून या जलपरीने लातूरकरांची तहान भागविली. आतापर्यंत २५ कोटी ४५ लाख लिटर पाणी या जलपरीने लातूरकरांना दिले आहे. लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात पाणी नसले तरी साई व नागझरी बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. त्यामुळे लातूर मनपाने या प्रकल्पातून पाणीपुरवठा सुरू केला आहे. परिणामी, जलपरीची सेवा मंगळवारपासून बंद होत आहे.लातूर शहरामध्ये गेल्या साडेसहा महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई होती. पंधरा दिवसांपूर्वी लातूर शहरात मोठा पाऊस झाला आणि जिल्ह्यातील बंधारे व मध्यम प्रकल्पात बऱ्यापैकी पाणी साठले आहे. साई व नागझरी बंधारा पूर्ण क्षमतेने भरला आहे. या दोन्ही प्रकल्पांतून लातूर शहरात पाणीपुरवठा करण्यात येत आहे. काही भागात नळाद्वारेही पाणीपुरवठा करण्यात आला आहे. चांगल्या प्रमाणात पाणी साठवणूक झाल्यामुळे मनपाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत रेल्वे प्रशासनाला २ आॅगस्ट रोजी पत्र पाठवून जलपरीची सेवा बंद करण्यास काही हरकत नाही, असे कळविले आहे. त्यानुसार सोमवारी शेवटची ट्रीप जलपरी करणार आहे. आतापर्यंत या जलपरीने ११० फेऱ्या केल्या आहेत. १० वॅगनच्या नऊ आणि ५० वॅगनच्या १०० अशा एकूण ११० फेऱ्या झाल्या आहेत. सोमवारी होत असलेली १११ वी फेरी होणार आहे. १० वॅगनच्या नऊ फेऱ्यांद्वारे प्रत्येकी ५ लाख लिटर पाणी आणण्यात आले. तर ५० वॅगनच्या जलपरीने प्रत्येकी २५ लाख लिटर पाणी आणले आहे. २ कोटी ४५ लाख लिटर पाणी आणून या जलपरीने लातूरकरांची तहान भागविली आहे. सोमवारी होत असलेली १११ वी फेरी आहे. या १११ फेऱ्यांद्वारे २५ कोटी ७० लाख लिटर पाणी लातूरकरांना या जलपरीने दिले आहे. त्यामुळे सोमवारी जलपरीला मोठ्या उत्साहात निरोप दिला जाणार असल्याचे मनपातील सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)