शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

चौंढीचा नाका होणार ‘टोलमुक्त’

By admin | Updated: June 12, 2014 00:28 IST

कुरूंदा : वसमत - औंढा महामार्गावरील चौंढी कल्याण टोलनाका २००३ पासून सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी ‘एमएसआरडी’च्या अंतर्गत येणारे ४४ टोलनाके बंद करण्याची घोषणा राज्य सरकारने विधिमंडळात केली आहे.

कुरूंदा : वसमत - औंढा महामार्गावरील चौंढी कल्याण टोलनाका २००३ पासून सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी ‘एमएसआरडी’च्या अंतर्गत येणारे ४४ टोलनाके बंद करण्याची घोषणा राज्य सरकारने विधिमंडळात केली आहे. त्यात चौंढी कल्याण टोलनाक्याचा समावेश असून सध्या हा टोलनाका बंद करण्याचे कोणतेच आदेश आलेले नाहीत; मात्र पुणे येथील एका पथकाकडून टोलसंदर्भात सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. येत्या आठ दिवसांत दिवसानंतर हा नाका टोलमुक्त होण्याची शक्यता आहे. वसमत फाटा ते वाघी फाटा दरम्यानच्या २० कि.मी अंतरासाठी आंबाचौंढी गावाजवळ ‘बांधा वापरा व हस्तांतरित करा’ या तत्वावर मध्य प्रदेशातील एका कंत्राटदाराला २००२ मध्ये टोलनाका देण्यात आला. या कंत्राटदाराने रस्त्याच्या कामासाठी ५५० लाख रूपये खर्च केले होते. २०१७ पर्यंत या रस्त्यावर टोलवसुली करण्यात येणार होती. दोन दिवसांपूर्वी राज्य शासनाने ४४ टोलनाके बंद करण्याचा निर्णय विधीमंडळात सोमवारी घेतला. त्यामुळे हा टोलनाका कायमचा बंद होणार असला तरी सध्या हा टोलनाका सुरू आहे. अद्याप कोणताच लेखी आदेश व पत्र टोलनाका बंद करण्यासाठी आले नसल्याचे व्यवस्थापक त्रिपाठी यांनी सांगितले. दरम्यान चौंढी कल्याण टोलनाक्याचे सर्वेक्षण पुणे येथील एका पथकाकडून सुरू करण्यात आले आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. नेमकी किती आवक या नाक्यावर होते, त्याचे सर्वेक्षण केले जात आहे. (वार्ताहर)