शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

आज सर्वसाधारण सभा; पाणी प्रश्न पेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 01:28 IST

प्रशासनाने पाणीपुरवठ्यात ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी सोमवारी सकाळी सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांकडून करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शहरातील अनेक वसाहतींमध्ये भर उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही. पाण्यासाठी दररोज नगरसेवकांना टाकीवर जाऊन बसावे लागते. एक दिवसही दुर्लक्ष केल्यास वॉर्डात पाण्याची ओरड होते. प्रशासनाने पाणीपुरवठ्यात ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी सोमवारी सकाळी सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांकडून करण्यात येणार आहे.दरवर्षी उन्हाळा सुरू झाल्यावर शहरात पाणीपुरवठ्याची प्रचंड ओरड सुरू होते. सध्या तापमान ३८ ते ४० अंशांपर्यंत आहे. तापमानात अधिक वाढ झाल्यानंतर पाण्याची मागणीही तेवढीच होणार आहे. मनपाकडे वाढीव पाणी देण्याची कोणतीच तरतूद नाही. एमआयडीसीकडून ५ एमएलडी पाणी घेण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्याप सुरू झालेली नाही. एमआयडीसीचे पाणी मिळाल्यावर सिडको-हडकोतील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. उन्हाळा संपल्यावर एमआयडीसीचे पाणी शहरात आणणार का? असा प्रश्नही नागरिक उपस्थित करीत आहेत. उन्हाळ्यापूर्वीच महापालिकेने याचे नियोजन का केले नाही? तहान लागल्यावरच विहीर खोदण्याची महापालिकेची जुनी सवय आहे.शहरातील विविध वसाहतींमध्ये गॅस्ट्रोसदृश आजारांनी हात-पाय पसरले आहेत. दूषित पाणीपुरवठा ठिकठिकाणी होत आहे. याकडे प्रशासन गांभीर्याने विचार करायला तयार नाही. सोमवारी सकाळी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक पाणी प्रश्नावर जोरदार ओरड करणार आहेत. सिडको-हडकोतील नगरसेवकांना मागील काही दिवसांपासून बराच त्रास सहन करावा लागत आहे. मागील आठवड्यात त्रस्त नगरसेवकांनी तर सिडको एन-५ येथील पाण्याच्या टाकीवर जोरदार आंदोलन केले. त्यानंतर आयुक्तांनी प्रत्येक वसाहतीला चौथ्या दिवशी पाणी द्या, असे आदेश दिले.

टॅग्स :water shortageपाणीकपातAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका