शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

वेळत निदान अन् काळजीने काचबिंदू होईल ठीक; दुर्लक्ष केल्याने येईल कायमचे अंधत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 14:20 IST

वेळेत निदान आणि योग्य काळजी घेतल्यास हा गंभीर आजार टाळता येऊ शकतो.

छत्रपती संभाजीनगर : सर्वांना मोतीबिंदू माहीत आहेच. त्याचप्रमाणे डोळ्यांना काचबिंदूही होत असतो. काचबिंदू हा असा आजार आहे, जो सुरुवातीला कोणतीही लक्षणे न देता हळूहळू दृष्टी कमी करतो आणि उपचार घेतले नाहीत तर कायमचे अंधत्व येऊ शकते. दुर्दैवाने, अनेकांना या आजाराची वेळेत जाणीव होत नाही. वेळेत निदान आणि योग्य काळजी घेतल्यास हा गंभीर आजार टाळता येऊ शकतो.

महिन्याला २,५०० रुग्णांची तपासणीजिल्हा सामान्य रुग्णालयातील ओपीडीत येणाऱ्या नेत्ररुग्णांची संख्या मोठी आहे. महिनाभरात जवळपास २ हजार ५०० रुग्णांची ओपीडीत तपासणी होते.

दोन जणांना काचबिंदूओपीडीत महिनाभरात येणाऱ्या रुग्णांमध्ये एक ते दोन रुग्णांना काचबिंदू आढळतो. काचबिंदूसाठी औषधी ड्राॅप, लेझर, काचबिंदू शस्त्रक्रिया महत्त्वाची ठरते.

डोळ्यांची तपासणी कधी करायला हवी ?वर्षे ४० पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनी दर दोन वर्षांनी डोळ्यांची तपासणी करावी, तर ६० वर्षांवरील ज्येष्ठांनी दरवर्षी डोळ्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. कुटुंबात काचबिंदूचा इतिहास असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित तपासणी करावी.

डोळ्यांची काळजी कशी घ्याल ?संतुलित आहार घ्यावा. व्हिटॅमिन ए, सी, आणि ई युक्त आहार घ्यावा. रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करावा. तीव्र प्रकाश किंवा स्क्रीनसमोर काम करताना संरक्षणात्मक चष्मा वापरावा. धूम्रपानामुळे डोळ्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे धूम्रपान टाळावे.

...तर येऊ शकते कायमचे अंधत्वकाचबिंदूची लक्षणे सुरुवातीला दिसून येत नाहीत. त्यामुळे नियमित तपासणी अत्यंत आवश्यक आहे. उपचार न केल्यास हा आजार दृष्टी कमी होणे किंवा पूर्ण अंधत्वास कारणीभूत ठरू शकतो.

चाळिशीनंतर तपासणी करावीचाळिशीनंतर प्रत्येकाने नेत्रतज्ज्ञांकडून डोळ्यांची तपासणी केली पाहिजे. मधुमेह, रक्तदाब व इतर आजार, ज्यात दाह होतो, अशा रुग्णांना नियमित तपासणी, वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक असते.- डॉ. संतोष काळे, वरिष्ठ नेत्रशल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय.

टॅग्स :eye care tipsडोळ्यांची निगाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर