शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

वाळूजवाडीत सुविधांसाठी तीन दशकांपासून संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 22:32 IST

वाळूज ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वाळूजवाडी येथील नागरिकांना नागरी सुविधा मिळविण्यासाठी गत तीन-चार दशकापासून संघर्ष करावा लागत आहेत. 

वाळूज महानगर: वाळूज ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वाळूजवाडी येथील नागरिकांना नागरी सुविधा मिळविण्यासाठी गत तीन-चार दशकापासून संघर्ष करावा लागत आहेत.  

वाळूजवाडी या वार्ड क्रमांक ६ मध्ये येणाऱ्या वसाहतीत विविध नागरी सुविधाचा अभाव आहे. या वसाहतीत जवळपास ४०० नागरिक वास्तव्यास असून पिण्याचे पाणी, स्वच्छता, अंतर्गत रस्ते आदी सुविधा मिळत नसल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून ग्रामपंचायतीकडे सतत पाठपुरावा करुन शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जात नाही. या भागातील विहिरी व बोअरचे पाणी क्षारयुक्त असल्यामुळे नागरिकांना वापर करता येत नाही. या वसाहतीत केवळ एक हातपंप असून, या पंपावर पाणी भरण्यासाठी गर्दी असते. या हातपंपाची दुरुस्ती व देखभाल केली जात नसल्याने पाणी हापसताना दमछाक होते. पाणी प्रश्नाकडे ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे विकतचे जारचे पाणी आणून तहान भागवावी लागत आहे. वसाहतीकडे जाणाºया मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.

पावसाळ्यात कच्या रस्त्यावरुन ये-जा करतांना नागरिकांना कसरत करावी लागत. गंभीर आजारी रुग्णांना पावसाळ्यात रुग्णालयात नेण्यासाठी नागरिकांचे हाल होतात.येथील जिल्हा परिषद शाळेचीही अत्यंत दुरावस्था झाली असून, पावसाळ्यात वर्गखोली गळत असल्यामुळे विद्यार्थ्यांना व्हरंड्यात बसून ज्ञानार्जन करावे लागते. या वसाहतीतील ड्रेनेजलाईनसाठी नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा केल्यामुळे ग्रामपंचायतीने ड्रेनेजलाईनचे काम हाती घेतले आहे. आजघडीला या ड्रेनेजलाईनचे काम पूर्णत्वाकडे असल्यामुळे ड्रेनेजचा प्रश्न निकाली निघाला आहे. या विषयी सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र, तो संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :Walujवाळूजwater scarcityपाणी टंचाई