शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
2
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
3
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
4
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
5
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
6
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
7
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
8
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
9
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
10
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
11
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
12
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
13
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
14
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
15
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
16
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
17
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
18
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
19
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
20
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात तिघाडा; वॉर्डात बिघाडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:05 IST

औरंगाबाद : मुंबईवगळता राज्यातील सर्व महापालिकांमध्ये तीन सदस्यांची प्रभाग पद्धत ठेवण्याचा निर्णय बुधवारी (दि. २२) राज्य शासनाने घेतला. या ...

औरंगाबाद : मुंबईवगळता राज्यातील सर्व महापालिकांमध्ये तीन सदस्यांची प्रभाग पद्धत ठेवण्याचा निर्णय बुधवारी (दि. २२) राज्य शासनाने घेतला. या निर्णयामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांची झोप उडाली आहे. या निर्णयाचा शहराला किती फायदा होईल, यासंदर्भात काही निवृत्त अधिकारी, शहर विकासात मोठे योगदान देणारे वास्तुविशारद यांना ‘लोकमत’ने बोलते केले. काहींनी या निर्णयावर सडकून टीका केली. राज्यात ज्या पद्धतीने तीन पक्षांची ओढाताण सुरू आहे, तशीच गत वॉर्डांमध्ये पहायला मिळेल, अशी प्रतिक्रिया उमटली.

१९८८ पासून २०१५ पर्यंत महापालिकेच्या सहा सार्वत्रिक निवडणुका झाल्या. सर्व निवडणुका एक वॉर्ड पद्धतीने घेण्यात आल्या. १९८८ मध्ये महापालिकेचे फक्त ६० वॉर्ड होते. आता ११५ वॉर्ड आहेत. एप्रिल २०१९ मध्ये महापालिकेचा कार्यकाल संपला. दीड वर्षांपासून सर्वपक्षीय इच्छुक उमेदवार निवडणुकीकडे डोळे लावून बसले आहेत. निवडणूक कधी होईल, हे निश्चित नाही. त्यात बुधवारी राज्य शासनाने महत्त्वर्ण निर्णय घेतला. मुंबईवगळता राज्यातील सर्व महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धत राहील. ३ वॉर्डांचा एक प्रभाग असेल. या निर्णयाचा शहराला फायदा होईल का तोटा यावर वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत जाणून घेण्यात आले.

निधी उपलब्ध झाला तर ना...

महापालिकांमध्ये निधीचा प्रचंड तुटवडा असतो. दोन ते तीन मोठ्या मनपावगळता इतर आर्थिक डबघाईला आलेल्या आहेत. तीन वॉर्डांचा एक प्रभाग केला तर तीन नगरसेवक निवडून येतील. त्यांना निधी मिळाला तरच प्रभागाचा विकास होईल. निधी मिळूनही तिन्ही नगरसेवक एका मताचे, एका पक्षाचे हवेत. त्यांच्यातच आपसात ओढाताण असेल तर अजिबात विकास होणार नाही. पूर्वीची एक वॉर्ड पद्धतच योग्य होती. प्रशासनालाही काम करणे सोपे जात होते.

डॉ. पुरुषोत्तम भापकर, निवृत्त मनपा तथा विभागीय आयुक्त

एका मताने निर्णय घ्यावे लागतील

एका वॉर्डात एकच नगरसेवक असला तर खूप चांगले. कारण त्याच्यावर वॉर्डाच्या विकासाची जबाबदारी असते. जशी आमदारावर आपल्या मतदारसंघाची असते. आता तीन नगरसेवकांचा एक प्रभाग केला तर कामे कशी होतील? ते एकमेकांवर कामे ढकलतील. तिघेही सकारात्मक विचारांचे असायला हवेत. एका मताने निर्णय घ्यावे लागतील. असे झाले तरच प्रभागाचा विकास होईल.

सी.एस. सोनी, निवृत्त शहर अभियंता, मनपा

अगोदरच वाईट अवस्था त्यात

सध्या एका नगरसेवकाला पथदिवे बंद असल्याचे सांगितले तरी दिवे लवकर लागत नाहीत. प्रभाग पद्धतीत तीन नगरसेवक राहतील. तिघे मिळून दिवे लावणार का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. राज्यात तीन पक्षांची ओढाताण आम्ही बघतोय. हीच परिस्थिती नंतर वॉर्डात बघायला मिळू शकते. या निर्णयामुळे शहराचा सर्वांगीण विकास होणे शक्य नाही.

- प्रदीप देशपांडे, वास्तुविशारद