शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
4
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
5
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
6
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
9
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
10
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
12
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
13
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
14
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
15
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
16
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
17
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

घाटी रुग्णालयाच्या पायऱ्यावरील ‘त्या’ मृत्यू प्रकरणाची ३ सदस्यीय समितीकडून होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 15:24 IST

पायाला जखम झालेली आणि त्या जखमेला मुंग्या लागलेल्या, माशा घोंगावत होत्या, अशा अवस्थेत ती व्यक्ती घाटीतील अपघात विभागाच्या पायऱ्यांवर वेदनेने विव्हळत पडून होती.

ठळक मुद्देलोकमत इम्पॅक्ट : दोन दिवसांत देणार चौकशीचा अहवाल

औरंगाबाद : घाटीतील अपघात विभागासमोर पायऱ्यावर तासन्‌तास पडून असलेल्या एका जखमीचा वेळीच उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेविषयी बुधवारी सर्व स्तरातून एकच संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेची गांभीर्याने दखल घेत घाटी प्रशासनाने ३ सदस्यीय समिती नेमून चौकशी सुरू केली आहे.

पायाला जखम झालेली आणि त्या जखमेला मुंग्या लागलेल्या, माशा घोंगावत होत्या, अशा अवस्थेत ती व्यक्ती घाटीतील अपघात विभागाच्या पायऱ्यांवर वेदनेने विव्हळत पडून होती. काहींनी अपघात विभागातील डाॅक्टरांना माहिती दिली. मात्र, वेळीच कोणीही त्यांच्याकडे धावले नाही. शेवटी पडल्या जागेवरच त्याने अखेरचा श्वास घेतला. मृत्यू झाल्यानंतर त्याला अपघात विभागात दाखल करण्यासाठी यंत्रणेने धावपळ केली. या प्रकाराविषयी ‘लोकमत’ने १७ मार्च रोजी ‘जखमेला मुंग्या...त्याने घाटीच्या पायऱ्यावर सोडला श्वास’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले. सामाजिक संस्थांनी या घटनेविषयी तीव्र संताप व्यक्त केला.

याप्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली असून, दोन दिवसांत अहवाल प्राप्त होईल, असे प्रभारी अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे यांनी सांगितले. संबंधित व्यक्ती जेव्हा जखमी अवस्थेत पडून होती, त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येत आहे. याप्रकरणी आता कोणावर कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.

पोलीस आयुक्तांना निवेदनअनोळखी व्यक्तीच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या संबंधित जबाबदार अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (ए) नागराज गायकवाड यांनी एका निवेदनाद्वारे पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीAurangabadऔरंगाबाद