शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
4
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
5
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
6
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
7
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
8
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
9
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
10
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
11
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
12
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
13
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
14
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
15
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
16
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
17
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
18
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
19
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
20
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट

दीड तासाच्या विमान प्रवासासाठी तीन तास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 23:49 IST

मुसळधार पावसामुळे मंगळवारी मुंबईत हवाई वाहतूक विस्कळीत झाली. त्यात स्पाईस जेटचे विमान घसरल्याने मुंबई विमानतळाची मुख्य धावपट्टी बंद करण्यात आली. त्यामुळे विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला आहे. बुधवारीदेखील दीड तासाच्या प्रवासासाठी एअर इंडियाच्या मुंबई-औरंगाबाद विमानाच्या प्रवाशांना जवळपास तीन तास वाट पाहावी लागली.

ठळक मुद्देमुंबई-औरंगाबाद विमान : दुसऱ्या दिवशीही विलंब, मुंबईतील पावसाचा परिणाम

औरंगाबाद : मुसळधार पावसामुळे मंगळवारी मुंबईत हवाई वाहतूक विस्कळीत झाली. त्यात स्पाईस जेटचे विमान घसरल्याने मुंबई विमानतळाची मुख्य धावपट्टी बंद करण्यात आली. त्यामुळे विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला आहे. बुधवारीदेखील दीड तासाच्या प्रवासासाठी एअर इंडियाच्या मुंबई-औरंगाबाद विमानाच्या प्रवाशांना जवळपास तीन तास वाट पाहावी लागली.एअर इंडियाचे मुंबई-औरंगाबाद विमान दुपारी ३.२५ वा. उड्डाण करते. हे विमान औरंगाबादला सायंकाळी ४.४५ वाजेच्या सुमारास येते. या ठिकाणाहून हे विमान सायंकाळी ५.२० वाजेच्या सुमारास दिल्लीसाठी उड्डाण घेते. सायंकाळी ७.१० वाजता हे विमान दिल्लीत पोहोचत असते.मुंबईत स्पाईस जेटचे विमान घसरल्याच्या घटनेनंतर मुख्य धावपट्टी बंद करण्यात आली. पर्यायी धावपट्टीवर विमाने उतरविण्यात आली. काही आंतरराष्ट्रीय विमानांचा मार्ग बदलण्यात आला. या विमानांना बंगळुरू, अहमदाबादसह अन्य विमानतळांवर उतरविण्यात आले. हवाई वाहतूक विस्कळीत झाल्याने मुंबईहून औरंगाबादला येणाºया विमानाला सलग दुसºया दिवशीही विलंब झाला.विमान प्रवासासाठी प्रवाशांना उड्डाणाच्या एक तास आधी येऊन आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करावी लागते. दुपारी ३.२५ ऐवजी सायंकाळी ६ वाजता मुंबई-औरंगाबाद-दिल्ली विमान उड्डाण करणार असल्याची माहिती प्रवाशांना देण्यात आली होती. मुंबईतील पावसाच्या परिणामामुळे विमानाला विलंब झाल्याची माहिती एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिली.दोन रेल्वे रद्दमुंबईतील पावसामुळे बुधवारी मुंबईला जाणारी नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेस आणि सिकंदराबाद-मुंबई देवगिरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली होती. त्यामुळे मुंबईला जाण्याचे नियोजन केलेल्या प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळRainपाऊस