शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

दीड तासाच्या विमान प्रवासासाठी तीन तास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 23:49 IST

मुसळधार पावसामुळे मंगळवारी मुंबईत हवाई वाहतूक विस्कळीत झाली. त्यात स्पाईस जेटचे विमान घसरल्याने मुंबई विमानतळाची मुख्य धावपट्टी बंद करण्यात आली. त्यामुळे विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला आहे. बुधवारीदेखील दीड तासाच्या प्रवासासाठी एअर इंडियाच्या मुंबई-औरंगाबाद विमानाच्या प्रवाशांना जवळपास तीन तास वाट पाहावी लागली.

ठळक मुद्देमुंबई-औरंगाबाद विमान : दुसऱ्या दिवशीही विलंब, मुंबईतील पावसाचा परिणाम

औरंगाबाद : मुसळधार पावसामुळे मंगळवारी मुंबईत हवाई वाहतूक विस्कळीत झाली. त्यात स्पाईस जेटचे विमान घसरल्याने मुंबई विमानतळाची मुख्य धावपट्टी बंद करण्यात आली. त्यामुळे विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला आहे. बुधवारीदेखील दीड तासाच्या प्रवासासाठी एअर इंडियाच्या मुंबई-औरंगाबाद विमानाच्या प्रवाशांना जवळपास तीन तास वाट पाहावी लागली.एअर इंडियाचे मुंबई-औरंगाबाद विमान दुपारी ३.२५ वा. उड्डाण करते. हे विमान औरंगाबादला सायंकाळी ४.४५ वाजेच्या सुमारास येते. या ठिकाणाहून हे विमान सायंकाळी ५.२० वाजेच्या सुमारास दिल्लीसाठी उड्डाण घेते. सायंकाळी ७.१० वाजता हे विमान दिल्लीत पोहोचत असते.मुंबईत स्पाईस जेटचे विमान घसरल्याच्या घटनेनंतर मुख्य धावपट्टी बंद करण्यात आली. पर्यायी धावपट्टीवर विमाने उतरविण्यात आली. काही आंतरराष्ट्रीय विमानांचा मार्ग बदलण्यात आला. या विमानांना बंगळुरू, अहमदाबादसह अन्य विमानतळांवर उतरविण्यात आले. हवाई वाहतूक विस्कळीत झाल्याने मुंबईहून औरंगाबादला येणाºया विमानाला सलग दुसºया दिवशीही विलंब झाला.विमान प्रवासासाठी प्रवाशांना उड्डाणाच्या एक तास आधी येऊन आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करावी लागते. दुपारी ३.२५ ऐवजी सायंकाळी ६ वाजता मुंबई-औरंगाबाद-दिल्ली विमान उड्डाण करणार असल्याची माहिती प्रवाशांना देण्यात आली होती. मुंबईतील पावसाच्या परिणामामुळे विमानाला विलंब झाल्याची माहिती एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिली.दोन रेल्वे रद्दमुंबईतील पावसामुळे बुधवारी मुंबईला जाणारी नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेस आणि सिकंदराबाद-मुंबई देवगिरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली होती. त्यामुळे मुंबईला जाण्याचे नियोजन केलेल्या प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळRainपाऊस