शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

गँगरेपमधील तीन संशयितांना २४ तासांत गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:09 IST

घरी सोडण्याच्या निमित्ताने २२ वर्षीय पीडितेचे अपहरण करून तिला मुकुंदवाडी परिसरातील विमानतळ भिंतीलगतच्या एका पडक्या घरात डांबून तिच्यावर सामूहिक अत्याचार करणा-या तीन संशयित नराधमांना गुन्हे शाखेने २४ तासांत बेड्या ठोकल्या

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : घरी सोडण्याच्या निमित्ताने २२ वर्षीय पीडितेचे अपहरण करून तिला मुकुंदवाडी परिसरातील विमानतळ भिंतीलगतच्या एका पडक्या घरात डांबून तिच्यावर सामूहिक अत्याचार करणा-या तीन संशयित नराधमांना गुन्हे शाखेने २४ तासांत बेड्या ठोकल्या. या आरोपींनी पीडितेला अमानुष मारहाण केल्याने ती गंभीर जखमी असून, तिच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत.सागर सुभाष बुट्टे (२०), उमेश उत्तम डुकळे (२२) आणि अनिल रामचंद्र गायकवाड (२६, सर्व रा.जयभवानीनगर) असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या खळबळजनक घटनेविषयी अधिक माहिती देताना गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात यांनी सांगितले की, गारखेडा परिसरातील भारतनगर येथील रहिवासी २२ वर्षीय विवाहिता ५ आॅक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास स्वराजनगर येथे राहणा-या चुलतीला भेटून मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनमार्गे घरी जात होती. यावेळी जयभवानीनगर चौकात आरोपी सागर रिक्षाचालक तिला भेटला. तेव्हा त्याच्या रिक्षात आरोपी उमेश आणि अनिल हे बसलेले होते. त्याने रेल्वेस्टेशनला सोडतो, चल असे म्हणून रिक्षात बसविले. यानंतर त्यांनी पीडितेला रेल्वेस्टेशनला न सोडता ते तिला विमानतळ भिंतीलगतच्या रेल्वेगेटकडील एका पडक्या वाड्यात घेऊन गेले. तुम्ही मला इकडे कोठे घेऊन आलात, असे विचारताच आरोपींनी तिला चाकूने भोसकून मारून टाकण्याची धमकी दिली. यावेळी प्रथम सागरने आणि नंतर उमेश व अनिल यांनी तिच्यावर अत्याचार केले. यावेळी तिने आरडाओरड करू नये, म्हणून नराधमांनी तिच्या तोंडाला पट्टी बांधली. घाणेरडे कृत्य केल्यानंतरही त्यांनी तिला सोडून दिले नाही. शुक्रवार आणि शनिवार सलग दोन दिवस डांबून ठेवल्यानंतर या घटनेची कोठेही वाच्यता केल्यास तुला मारून टाकीन अशी धमकी देत त्यांनी तिच्या पायाच्या नळगीवर लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. शनिवारी रात्री आरोपी तिकडे न फिरकल्याने पीडितेने स्वत:ची सुटका करून घेतली. यानंतर ती घरी गेली. घडलेली सर्व घटना तिने पतीला सांगितली.रविवारी दुपारी पीडितेने पतीसह मुकुंदवाडी ठाण्यात धाव घेतली.तेथे तिने नराधमांविरुद्ध फिर्याद नोंदविली.घटनेची माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात, पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे, सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे, पोहेकॉ संतोष सोनवणे, विजयानंद गवळी, सुधाकर राठोड, सिद्धार्थ थोरात, नंदलाल गवळी, धर्मराज गायकवाड, लालखॉ पठाण, योगेश गुप्ता, हिरा राजपूत यांनी आरोपींचा शोध सुरू केला.पीडितेने केवळ सागर रिक्षाचालक एवढेच नाव पोलिसांना सांगितले होते. पोलिसांनी खब-यांना कामाला लावून सागर रिक्षाचालकासोबत ५ आॅक्टोबर रोजी आणि नंतर कोण फिरत होते. याबाबतची माहिती मिळविली. तेव्हा सागरसोबत उमेश आणिअनिल हे दोन रिक्षाचालक होते, असे कळाले. तिन्ही रिक्षाचालकांना मद्याचे व्यसन असून त्यांनीच हे कृत्य केल्याची पक्की माहिती पोलिसांना समजली.आरोपींची नावे समजताच सागर हा बीड बायपास परिसरातील गुरू लॉन्सच्या मागे असल्याचे खब-याने पथकाला सांगितले. पथकाने सकाळीच प्रथम सागरला आणि नंतर अन्य दोन्ही आरोपींना उचलले. त्यांची ओळखपरेड केली जाणार असल्याचे सहायक आयुक्त थोरात यांनी सांगितले. तपास करणा-या पथकाला पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी २५ हजार रुपये बक्षीस जाहीर केले आहे.उस्मानपुरा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर गायकवाड हे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.