शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

गँगरेपमधील तीन संशयितांना २४ तासांत गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:09 IST

घरी सोडण्याच्या निमित्ताने २२ वर्षीय पीडितेचे अपहरण करून तिला मुकुंदवाडी परिसरातील विमानतळ भिंतीलगतच्या एका पडक्या घरात डांबून तिच्यावर सामूहिक अत्याचार करणा-या तीन संशयित नराधमांना गुन्हे शाखेने २४ तासांत बेड्या ठोकल्या

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : घरी सोडण्याच्या निमित्ताने २२ वर्षीय पीडितेचे अपहरण करून तिला मुकुंदवाडी परिसरातील विमानतळ भिंतीलगतच्या एका पडक्या घरात डांबून तिच्यावर सामूहिक अत्याचार करणा-या तीन संशयित नराधमांना गुन्हे शाखेने २४ तासांत बेड्या ठोकल्या. या आरोपींनी पीडितेला अमानुष मारहाण केल्याने ती गंभीर जखमी असून, तिच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत.सागर सुभाष बुट्टे (२०), उमेश उत्तम डुकळे (२२) आणि अनिल रामचंद्र गायकवाड (२६, सर्व रा.जयभवानीनगर) असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या खळबळजनक घटनेविषयी अधिक माहिती देताना गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात यांनी सांगितले की, गारखेडा परिसरातील भारतनगर येथील रहिवासी २२ वर्षीय विवाहिता ५ आॅक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास स्वराजनगर येथे राहणा-या चुलतीला भेटून मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनमार्गे घरी जात होती. यावेळी जयभवानीनगर चौकात आरोपी सागर रिक्षाचालक तिला भेटला. तेव्हा त्याच्या रिक्षात आरोपी उमेश आणि अनिल हे बसलेले होते. त्याने रेल्वेस्टेशनला सोडतो, चल असे म्हणून रिक्षात बसविले. यानंतर त्यांनी पीडितेला रेल्वेस्टेशनला न सोडता ते तिला विमानतळ भिंतीलगतच्या रेल्वेगेटकडील एका पडक्या वाड्यात घेऊन गेले. तुम्ही मला इकडे कोठे घेऊन आलात, असे विचारताच आरोपींनी तिला चाकूने भोसकून मारून टाकण्याची धमकी दिली. यावेळी प्रथम सागरने आणि नंतर उमेश व अनिल यांनी तिच्यावर अत्याचार केले. यावेळी तिने आरडाओरड करू नये, म्हणून नराधमांनी तिच्या तोंडाला पट्टी बांधली. घाणेरडे कृत्य केल्यानंतरही त्यांनी तिला सोडून दिले नाही. शुक्रवार आणि शनिवार सलग दोन दिवस डांबून ठेवल्यानंतर या घटनेची कोठेही वाच्यता केल्यास तुला मारून टाकीन अशी धमकी देत त्यांनी तिच्या पायाच्या नळगीवर लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. शनिवारी रात्री आरोपी तिकडे न फिरकल्याने पीडितेने स्वत:ची सुटका करून घेतली. यानंतर ती घरी गेली. घडलेली सर्व घटना तिने पतीला सांगितली.रविवारी दुपारी पीडितेने पतीसह मुकुंदवाडी ठाण्यात धाव घेतली.तेथे तिने नराधमांविरुद्ध फिर्याद नोंदविली.घटनेची माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात, पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे, सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे, पोहेकॉ संतोष सोनवणे, विजयानंद गवळी, सुधाकर राठोड, सिद्धार्थ थोरात, नंदलाल गवळी, धर्मराज गायकवाड, लालखॉ पठाण, योगेश गुप्ता, हिरा राजपूत यांनी आरोपींचा शोध सुरू केला.पीडितेने केवळ सागर रिक्षाचालक एवढेच नाव पोलिसांना सांगितले होते. पोलिसांनी खब-यांना कामाला लावून सागर रिक्षाचालकासोबत ५ आॅक्टोबर रोजी आणि नंतर कोण फिरत होते. याबाबतची माहिती मिळविली. तेव्हा सागरसोबत उमेश आणिअनिल हे दोन रिक्षाचालक होते, असे कळाले. तिन्ही रिक्षाचालकांना मद्याचे व्यसन असून त्यांनीच हे कृत्य केल्याची पक्की माहिती पोलिसांना समजली.आरोपींची नावे समजताच सागर हा बीड बायपास परिसरातील गुरू लॉन्सच्या मागे असल्याचे खब-याने पथकाला सांगितले. पथकाने सकाळीच प्रथम सागरला आणि नंतर अन्य दोन्ही आरोपींना उचलले. त्यांची ओळखपरेड केली जाणार असल्याचे सहायक आयुक्त थोरात यांनी सांगितले. तपास करणा-या पथकाला पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी २५ हजार रुपये बक्षीस जाहीर केले आहे.उस्मानपुरा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर गायकवाड हे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.