शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गँगरेपमधील तीन संशयितांना २४ तासांत गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:09 IST

घरी सोडण्याच्या निमित्ताने २२ वर्षीय पीडितेचे अपहरण करून तिला मुकुंदवाडी परिसरातील विमानतळ भिंतीलगतच्या एका पडक्या घरात डांबून तिच्यावर सामूहिक अत्याचार करणा-या तीन संशयित नराधमांना गुन्हे शाखेने २४ तासांत बेड्या ठोकल्या

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : घरी सोडण्याच्या निमित्ताने २२ वर्षीय पीडितेचे अपहरण करून तिला मुकुंदवाडी परिसरातील विमानतळ भिंतीलगतच्या एका पडक्या घरात डांबून तिच्यावर सामूहिक अत्याचार करणा-या तीन संशयित नराधमांना गुन्हे शाखेने २४ तासांत बेड्या ठोकल्या. या आरोपींनी पीडितेला अमानुष मारहाण केल्याने ती गंभीर जखमी असून, तिच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत.सागर सुभाष बुट्टे (२०), उमेश उत्तम डुकळे (२२) आणि अनिल रामचंद्र गायकवाड (२६, सर्व रा.जयभवानीनगर) असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या खळबळजनक घटनेविषयी अधिक माहिती देताना गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात यांनी सांगितले की, गारखेडा परिसरातील भारतनगर येथील रहिवासी २२ वर्षीय विवाहिता ५ आॅक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास स्वराजनगर येथे राहणा-या चुलतीला भेटून मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनमार्गे घरी जात होती. यावेळी जयभवानीनगर चौकात आरोपी सागर रिक्षाचालक तिला भेटला. तेव्हा त्याच्या रिक्षात आरोपी उमेश आणि अनिल हे बसलेले होते. त्याने रेल्वेस्टेशनला सोडतो, चल असे म्हणून रिक्षात बसविले. यानंतर त्यांनी पीडितेला रेल्वेस्टेशनला न सोडता ते तिला विमानतळ भिंतीलगतच्या रेल्वेगेटकडील एका पडक्या वाड्यात घेऊन गेले. तुम्ही मला इकडे कोठे घेऊन आलात, असे विचारताच आरोपींनी तिला चाकूने भोसकून मारून टाकण्याची धमकी दिली. यावेळी प्रथम सागरने आणि नंतर उमेश व अनिल यांनी तिच्यावर अत्याचार केले. यावेळी तिने आरडाओरड करू नये, म्हणून नराधमांनी तिच्या तोंडाला पट्टी बांधली. घाणेरडे कृत्य केल्यानंतरही त्यांनी तिला सोडून दिले नाही. शुक्रवार आणि शनिवार सलग दोन दिवस डांबून ठेवल्यानंतर या घटनेची कोठेही वाच्यता केल्यास तुला मारून टाकीन अशी धमकी देत त्यांनी तिच्या पायाच्या नळगीवर लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. शनिवारी रात्री आरोपी तिकडे न फिरकल्याने पीडितेने स्वत:ची सुटका करून घेतली. यानंतर ती घरी गेली. घडलेली सर्व घटना तिने पतीला सांगितली.रविवारी दुपारी पीडितेने पतीसह मुकुंदवाडी ठाण्यात धाव घेतली.तेथे तिने नराधमांविरुद्ध फिर्याद नोंदविली.घटनेची माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात, पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे, सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे, पोहेकॉ संतोष सोनवणे, विजयानंद गवळी, सुधाकर राठोड, सिद्धार्थ थोरात, नंदलाल गवळी, धर्मराज गायकवाड, लालखॉ पठाण, योगेश गुप्ता, हिरा राजपूत यांनी आरोपींचा शोध सुरू केला.पीडितेने केवळ सागर रिक्षाचालक एवढेच नाव पोलिसांना सांगितले होते. पोलिसांनी खब-यांना कामाला लावून सागर रिक्षाचालकासोबत ५ आॅक्टोबर रोजी आणि नंतर कोण फिरत होते. याबाबतची माहिती मिळविली. तेव्हा सागरसोबत उमेश आणिअनिल हे दोन रिक्षाचालक होते, असे कळाले. तिन्ही रिक्षाचालकांना मद्याचे व्यसन असून त्यांनीच हे कृत्य केल्याची पक्की माहिती पोलिसांना समजली.आरोपींची नावे समजताच सागर हा बीड बायपास परिसरातील गुरू लॉन्सच्या मागे असल्याचे खब-याने पथकाला सांगितले. पथकाने सकाळीच प्रथम सागरला आणि नंतर अन्य दोन्ही आरोपींना उचलले. त्यांची ओळखपरेड केली जाणार असल्याचे सहायक आयुक्त थोरात यांनी सांगितले. तपास करणा-या पथकाला पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी २५ हजार रुपये बक्षीस जाहीर केले आहे.उस्मानपुरा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर गायकवाड हे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.