शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

पावसासाठी कवडगाव येथे मुस्लिम बांधवांची तीन दिवस नमाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 23:18 IST

औरंगाबाद तालुक्यातील कवडगाव (अंबड) व कवडगाव ( जालना) अशा दोन्ही गावांतील मुस्लीम बांधवांनी पाऊस पडावा म्हणून गावच्या शिवेवर शुक्रवारपासून नमाज अदा करण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

श्रीकांत पोफळे /शेंद्रा : औरंगाबाद तालुक्यातील कवडगाव (अंबड) व कवडगाव ( जालना) अशा दोन्ही गावांतील मुस्लीम बांधवांनी पाऊस पडावा म्हणून गावच्या शिवेवर शुक्रवारपासून नमाज अदा करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. रविवारी या उपक्रमाचा शेवटचा दिवस असून, हिंदू बांधवांच्या वतीने मुस्लिम बांधवांना अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात येणार आहे. शिवाय ग्रामस्थांच्या वतीने जनवरांना सुद्धा रविवारी नमाज अदा करण्यासाठी त्याठिकाणी हजर करणार आहेत.

पाऊस हा प्रत्येक सजिवासाठी, प्रत्येक जाती धर्मातील घटकासाठी सारखाच गरजेचा आहे. त्यात तीन वर्षांपासून औरंगाबाद जिल्हा सतत दुष्काळाच्या छायेत असल्याने पशुधनाला लागणारे पिण्याचे पाणी सुद्धा विकत घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. त्यामुळे सगळेच आता आपापल्या कुलदैवतांना आपल्या परीने प्रार्थना करताना दिसत आहे. त्याची प्रचीती शुक्रवारी आषाडी एकादशीनिमित्ताने आली. जिल्ह्यात सगळीकडेच विठुरायाला पावसासाठी साकडे घालण्यात आले.

अशाच पद्धतीने औरंगाबाद तालुक्यातील दोन्ही कवडगावातील मुस्लिम बांधवांनी गावाच्या शिवावर सामूहिक नमाज अदा करण्याचा निर्णय घेतला. परिसरात खरिपाची पेरणी ४० टक्केच झालेली आहे. जनावरांना पिण्यासाठी आजही शेतकऱ्यांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. याठिकाणी रविवारी शेवटची नमाज अदा केली जाणार आहे. सध्या पाण्यावाचून मुक्या जनावरांचे हाल होत असून, निदान या मुक्या जनावरांसाठी तरी पाऊस पडावा, अशी दुआ मुस्लिम बांधव करणार आहेत.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocialसामाजिक