शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

भाकरीसाठी चोरट्यांनी केले शेतकरी अपहरण

By admin | Updated: August 31, 2015 17:25 IST

शेतात शेतकरी जात असताना तीन चोरट्यांनी तोंडाला रुमाल लावून त्याला बेशुद्ध केले आणि दुसर्‍या शेतकर्‍यांना फोन करून 'भूक लगी हैं, खाना लाओ, तब इसे छोड देंगे' अशी धमकी दिली.

श्यामकुमार पुरे■ सिल्लोड (जि. औरंगाबाद)
रात्रीचा जेवणाचा डबा घेऊन शेतात जात असलेल्या शेतकर्‍याला तीन चोरट्यांनी तोंडाला रुमाल लावून बेशुद्ध केले आणि त्याच्या डब्यात तिघांचे पोट भरले नाही म्हणून दुसर्‍या शेतकर्‍यांना फोन करून 'भूक लगी हैं, खाना लाओ, तब इसे छोड देंगे' अशी धमकी दिली. सिल्लोड तालुक्यातील घटांब्री शिवारातील या घटनेने खळबळ उडाली आहे. 
घटांब्री येथील सुदाम रंगनाथ सुरडकर डबा घेऊन आपल्या शेतात जात असताना, तीन चोरट्यांनी आम्हाला भूक लागली आहे, तुझा डबा दे व तुझ्या मित्रांचे डबे मागव' आम्ही तुला काही करणार नाही, अशी धमकी दिली. मात्र घाबरलेला सुरडकर आरडाओरड करणार हे पाहून चोरट्यांनी त्याच्या तोंडाला रुमाल लावला. यामुळे तो बेशुद्ध झाला. शुद्ध आली तेव्हा शेतापासून दूर डोंगराच्या पलीकडे आमखेड्याच्या धरणाजवळ असल्याचे त्याच्या लक्षात आले. यावेळी तिघे चोरटे त्यांच्याजवळच होते. त्यांनी डबाही खाल्ला होता. एका डब्यात पोट भरले नाही म्हणून त्यांनी दुसर्‍या शेतकर्‍यांना डबा मागव म्हणून धमकावले. त्यावर सुदामने फोन केला. त्याने चोरट्यांनी मला पळविल्याचे सांगून त्यांना जेवणाचा डबा आणून दिला तर ते मला सोडतील, असे सांगितले. त्यावर एका चोरट्याने फोन घेऊन भूक लगी हैं, तुम्हारे डबे लेकर आओ, तब इसे छोड देंगे, हम इधर तालाब के पास थोडा पाणी हैं वहा हैं, असे सांगितले.
कोम्बिंग ऑपरेशन सुरू - पोलीस अधीक्षक
याबाबत औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितले, तपासासाठी पोलीस पथक घटांब्री परिसरात पाठविण्यात आले आहे. कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. ते कुणीही असो त्यांचा शोध लवकरच लावण्यात येईल.
शिकारी असतील - सहायक निरीक्षक
चोरटे ओळख लपवितात. यांनी मात्र तसे काही केल्याचे दिसून येत नाही. ते कदाचित शिकारीही असतील. त्यांना भूक लागली असेल म्हणून त्यांनी हे कृत्य केले असावे, असे अजिंठा ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांनी सांगितले. संधी साधून काढला पळ पाणी पिण्यासाठी चोरटे धरणाजवळ गेले असताना सुदाम यांनी तेथून धूम ठोकली. बेशुद्ध केल्यावर सुदामला आमखोरा धरणाजवळ कसे नेले हे मात्र समजू शकले नाही.
--------------
सिल्लोड तालुक्यात पंधरा दिवसांपूर्वी मध्यप्रदेशमधील दरोडेखोरांची एक टोळी घुसल्याची माहिती अजिंठा पोलिसांनी दवंडी देऊन गावागावात दिली होती. नागरिकांना दक्ष राहण्याच्या सूचना केल्या होत्या. भूक लागली म्हणून त्यांनी शेतकर्‍याला वेठीस धरले असेल, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे.