शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यात टँकरच्या खर्चाची कोटींच्या कोटी उड्डाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 19:30 IST

पाच वर्षांत ८० ते १०० कोटींच्या आसपास टँकर लॉबीवर खर्च करण्यात आला आहे.

ठळक मुद्देशाश्वत उपाययोजना नसल्यामुळे नागरिकांची वणवणजिल्ह्यात पाच वर्षांपासून दुष्काळाच्या झळा 

- विकास राऊत 

औरंगाबाद : जिल्ह्यात मागील पाच वर्षांपासून पाणीपुरवठा उपाययोजनांबाबत काहीही गांभीर्याने चिंतन न झाल्यामुळे ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी वणवण काही थांबेना. ही परिस्थिती एकीकडे असताना दुसरीकडे पिण्याचे पाणी टँकरने पुरविण्यासाठी कोट्यवधींचा खर्च जिल्हा प्रशासन करीत आहे. 

पाच वर्षांत ८० ते १०० कोटींच्या आसपास टँकर लॉबीवर खर्च करण्यात आला आहे. सध्या मराठवाड्यात सर्वाधिक टँकर औरंगाबाद जिल्ह्यात सुरू असून, ७ लाख ४० हजार लोकसंख्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. डिसेंबर महिन्याअखेर ४६३ टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, जिल्ह्यातील ३६४ गावे आणि २४ वाड्यांना टँकरच्या पाण्याविना दुसरा पर्याय नाही. या गावांतील ग्रामपंचायतींच्या हद्दीतील पिण्याचे पाण्याचे स्रोत सरत्या वर्षातील पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरले नाहीत. परिणामी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले असून, त्याचा मोठा परिणाम स्थलांतर होण्याचे संकेत मिळत आहेत. गंगापूर आणि वैजापूर तालुक्यातील स्थलांतर होण्यास सुरुवात झाल्याचे कानावर येत आहे. गंगापूर तालुक्यातील १०३ गावे आणि वैजापूर तालुक्यातील ६७ गावे टंचाईग्रस्त आहेत. फुलंब्रीतील ७१ गावे टंचाईग्रस्त आहेत. 

७ लाख ४० हजार १०० लोकसंख्येला टँकरचे पाणीजिल्ह्यातील ७ लाख ४० हजार १०० लोकसंख्येला टँकरने पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. औरंगाबाद तालुक्यात ७७ हजार १००, फुलंब्रीत ४० हजार ७३१, पैठण १ लाख ४३ हजार ९६६, गंगापूर १ लाख ७७ हजार २१०, वैजापूर १ लाख ३ हजार ४८९, खुलताबाद २१ हजार ७८०, कन्नड २७ हजार ४४, सिल्लोड १ लाख ४९ हजार १४० नागरिकांना पिण्याचे पाणी टँकरने पुरवावे लागते आहे. 

औद्योगिक वसाहतीतील जलकुंभांवर ताणग्रामीण भागांना पाण्याचे भरून पाठविण्यात येणारे टँकर औद्योगिक वसाहतीतील जलकुंभांवर भरले जात आहे. त्यामुळे शेंद्रा, वाळूज परिसरातील उद्योगांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. परिणामी औद्योगिक क्षेत्रातील नवीन नळ कनेक्शन देण्यावरही बंधने आली आहेत. टँकर भरण्यासाठी नवीन पंपिंग स्टेशन उभारण्यात यावे, अशी मागणी होत आहे. 

सोयगाव वगळता कुठेही मिळत नाही रोज पाणी जिल्ह्यातील एकाही तालुक्यातील नळयोजनांना दररोज पाणीपुरवठा केला जात नाही. औरंगाबाद शहरात चार दिवसाआड, पैठण शहर १ दिवसाआड, सिल्लोड ३ दिवसाआड, सोयगाव दररोज, फुलंब्री १ दिवसाआड, कन्नड ३ दिवसाआड, वैजापूर ४ दिवसाआड, गंगापूर ३ दिवसाआड, खुलताबाद ५दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. असा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा अहवाल आहे.

या तालुक्यांत परिस्थिती होणार गंभीरपाच तालुक्यात उपलब्ध असलेल्या साठ्यातील पाणी ३० जून २०१९ पर्यंत पुरेल अशी परिस्थिती नाही. यामध्ये खुलताबाद, वैजापूर, कन्नड, फुलंब्री, आणि सिल्लोड या तालुक्यांत पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरविना पर्याय नाही. 

जलुयक्त शिवारचे पाणी कुठे मुरलेजिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेतून करण्यात आलेल्या कामांमुळे मोठ्या प्रमाणात सिंचन झाल्याचा दावा करण्यात येत आहे. असे असताना जलयुक्त शिवार योजनेतील पाणी कुठे मुरले, असा प्रश्न आहे. मागील तीन वर्षांत ५०० च्या आसपास गावांमध्ये योजनेतून कामे करण्यात आली. त्यावर कोट्यवधींचा खर्च झाला. परंतु त्यातून मोठ्या प्रमाणात लाभ झाला नसल्याचा आरोप विरोधक करीत आहेत. 

जलयुक्त शिवार योजनेत हात मारलाटँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येण्यामागे मूळ कारण म्हणजे जलयुक्त शिवार ही योजना आहे. जुन्या पाणीलोट कार्यक्रमाच्या तुलनेत ही योजना कार्यकर्ते पोसण्यासाठीच आणली. यावर्षी निसर्गाने त्या योजनेचा पंचनामा केला आहे. जर या योजनेमुळे भूजल पातळी वाढली असती तर नागरिकांना किमान पिण्याचे पाणी तरी मिळाले असते. पावसाने हुलकावणी दिलेली नाही, सरकारने नियोजन न केल्यामुळे दगाफटका बसला आहे. हा दुष्काळ शासननिर्मित आहे. निसर्गनिर्मित नाही. ही सगळी वावटळ आहे. ओढे, नद्या, नाल्यांचे खोलीकरण करून ते उद्ध्वस्त केले आहेत. ही चिंतेची बाब आहे. जलयुक्त शिवार योजनेवर सरकारने हात मारला, असा माझा आरोप आहे. -प्रा. एच.एम. देसरडा, अर्थतज्ज्ञ

जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची मागणी अशी

तालुक्याचे     रोज पिण्याच्या     उपलब्ध पाणीनाव        पाण्याची मागणी    किती दिवस पुरेल  

औरंगाबाद    १४६ एमएलडी    २०६ दिवस (जायकवाडी धरण)पैठण        ४.११ एमएलडी    २०६ दिवस (जायकवाडी धरण)सिल्लोड    ४.३६ एमएलडी    ११५ दिवस (खेळणा मध्यम प्रकल्प)सोयगाव    ०.६२ एमएलडी    २०६ दिवस (सोयगाव लघु प्रकल्प)फुलंब्री        १.५० एमएलडी    ७५ दिवस (फुलमस्ता नदी व विहिरी)कन्नड    ३.५७ एमएलडी    २०६ दिवस (अंबाडी मध्यम प्रकल्प)वैजापूर    ३.९४ एमएलडी    २०६ दिवस (गोदावरी डावा कालवा)गंगापूर    २.६३ एमएलडी    २०६ दिवस (जायकवाडी धरण खुलताबाद    १.७५ एमएलडी    ५६ दिवस (गिरजा मध्यम प्रकल्प )

 

टॅग्स :droughtदुष्काळAurangabadऔरंगाबादJayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद