शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

हजारो क्विंटल धान्य उघड्यावर

By admin | Updated: June 6, 2014 01:07 IST

धर्माबाद : येथे नाफेड केंद्राअंतर्गत तूर व हरभरा या पिकाची पंधरा हजार क्विंटलपेक्षा जास्त मालाची खरेदी झाली़ दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटूनही

धर्माबाद : येथे नाफेड केंद्राअंतर्गत तूर व हरभरा या पिकाची पंधरा हजार क्विंटलपेक्षा जास्त मालाची खरेदी झाली़ दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटूनही शेतकर्‍यांना अद्याप मालाचे पैसे मिळाले नाहीत़ शिवाय हा माल उघड्यावरच असल्याने पावसाने भिजण्याची शक्यता आहे़तालुक्यातील २८१ शेतकर्‍यांनी या केंद्रावर ३८०२ क्विंटल तुरीची विक्री केली होती़ यापैकी २७९० क्विंटल तुरीचे ४ हजार ३०० रुपये दराने १ कोटी १९ लाख ९७ हजार रुपये वाटप करण्यात आले़ मात्र १०१३ क्विंटलचे ४३ लाख ५१ हजार रुपये अद्यापही थकले आहेत़ माल विक्री करुनही पैसे पदरी पडले नसल्याने शेतकर्‍यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे़ हरभरा खरेदी केंद्रावर २२७ शेतकर्‍यांनी ११ हजार दोनशे क्विंटल हरभर्‍याची विक्री केली़ याचे अडीच कोटी रुपये अद्याप वितरीत झाले नाहीत़ व्यापार्‍यांपेक्षा शासनाकडून मालाला चांगली किंमत येत असल्याने शेतकर्‍यांनी मोठ्या आशेने तूर, सोयाबीन नाफेडच्या केंद्रावर विक्रीसाठी आणले़ मात्र खरेदी-विक्री संघाच्या ढिसाळ नियोजनामुळे आलेल्या मालाचे मोजमाप मुदतीत केले नाही़ त्यामुळे माल खरेदी केला जातो की नाही? अशी शंका शेतकर्‍यांना आली़ त्यावर मार्केट कमिटीचे सभापती गणेशराव पाटील करखेलीकर व संचालकांनी सर्व शेतकर्‍यांचा माल नोंदणीप्रमाणे खरेदी करावा अन्यथा उपोषणाचा पवित्रा घेतला़ त्यामुळे माल खरेदीसाठी वाढीव मुदत मिळाली़ शेतकर्‍यांचा हरभरा तोल करुन रिपोर्ट, वखार पावती मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यास विलंब होत आहे़ त्यामुळे हजारो क्विंटल माल रस्त्यावर पडून आहे़ दोन दिवसात मृग नक्षत्र सुरु होत आहे़ अशावेळी पाऊस झाल्यास रस्त्यावरील हजारो क्विंटल माल भिजण्याची शक्यता नाकारता येत नाही़ पेरण्या अवघ्या काही दिवसांवर आहेत़ माल विक्रीचे पैसे अद्याप हाती पडले नसल्याने बी-बियाणे, खत अन्य साहित्य विकत घ्यायचे कसे? असा प्रश्न शेतकर्‍यांना पडत आहे़ नाफेडने खरेदी केलेल्या मालाचे पैसे तात्काळ उपलब्ध करुन द्यावेत, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा मार्केट कमिटीवर गेलेल्या शेतकरी मंडळाने दिला आहे़ (वार्ताहर)२४ तासात पैसे द्याशेतकर्‍यांचा माल खरेदी केल्यानंतर चोविस तासाच्या आत पैसे वितरीत करण्याची सूचना शासनाने दिली होती़ परंतु दोन महिने लोटले तरी तुर, हरभर्‍याचे पैसे मिळत नाहीत़ यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़