शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

हजारो क्विंटल धान्य उघड्यावर

By admin | Updated: June 6, 2014 01:07 IST

धर्माबाद : येथे नाफेड केंद्राअंतर्गत तूर व हरभरा या पिकाची पंधरा हजार क्विंटलपेक्षा जास्त मालाची खरेदी झाली़ दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटूनही

धर्माबाद : येथे नाफेड केंद्राअंतर्गत तूर व हरभरा या पिकाची पंधरा हजार क्विंटलपेक्षा जास्त मालाची खरेदी झाली़ दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटूनही शेतकर्‍यांना अद्याप मालाचे पैसे मिळाले नाहीत़ शिवाय हा माल उघड्यावरच असल्याने पावसाने भिजण्याची शक्यता आहे़तालुक्यातील २८१ शेतकर्‍यांनी या केंद्रावर ३८०२ क्विंटल तुरीची विक्री केली होती़ यापैकी २७९० क्विंटल तुरीचे ४ हजार ३०० रुपये दराने १ कोटी १९ लाख ९७ हजार रुपये वाटप करण्यात आले़ मात्र १०१३ क्विंटलचे ४३ लाख ५१ हजार रुपये अद्यापही थकले आहेत़ माल विक्री करुनही पैसे पदरी पडले नसल्याने शेतकर्‍यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे़ हरभरा खरेदी केंद्रावर २२७ शेतकर्‍यांनी ११ हजार दोनशे क्विंटल हरभर्‍याची विक्री केली़ याचे अडीच कोटी रुपये अद्याप वितरीत झाले नाहीत़ व्यापार्‍यांपेक्षा शासनाकडून मालाला चांगली किंमत येत असल्याने शेतकर्‍यांनी मोठ्या आशेने तूर, सोयाबीन नाफेडच्या केंद्रावर विक्रीसाठी आणले़ मात्र खरेदी-विक्री संघाच्या ढिसाळ नियोजनामुळे आलेल्या मालाचे मोजमाप मुदतीत केले नाही़ त्यामुळे माल खरेदी केला जातो की नाही? अशी शंका शेतकर्‍यांना आली़ त्यावर मार्केट कमिटीचे सभापती गणेशराव पाटील करखेलीकर व संचालकांनी सर्व शेतकर्‍यांचा माल नोंदणीप्रमाणे खरेदी करावा अन्यथा उपोषणाचा पवित्रा घेतला़ त्यामुळे माल खरेदीसाठी वाढीव मुदत मिळाली़ शेतकर्‍यांचा हरभरा तोल करुन रिपोर्ट, वखार पावती मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यास विलंब होत आहे़ त्यामुळे हजारो क्विंटल माल रस्त्यावर पडून आहे़ दोन दिवसात मृग नक्षत्र सुरु होत आहे़ अशावेळी पाऊस झाल्यास रस्त्यावरील हजारो क्विंटल माल भिजण्याची शक्यता नाकारता येत नाही़ पेरण्या अवघ्या काही दिवसांवर आहेत़ माल विक्रीचे पैसे अद्याप हाती पडले नसल्याने बी-बियाणे, खत अन्य साहित्य विकत घ्यायचे कसे? असा प्रश्न शेतकर्‍यांना पडत आहे़ नाफेडने खरेदी केलेल्या मालाचे पैसे तात्काळ उपलब्ध करुन द्यावेत, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा मार्केट कमिटीवर गेलेल्या शेतकरी मंडळाने दिला आहे़ (वार्ताहर)२४ तासात पैसे द्याशेतकर्‍यांचा माल खरेदी केल्यानंतर चोविस तासाच्या आत पैसे वितरीत करण्याची सूचना शासनाने दिली होती़ परंतु दोन महिने लोटले तरी तुर, हरभर्‍याचे पैसे मिळत नाहीत़ यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़