शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

हजारोंच्या पॉलिशवर उचलली लाखोंची बिले ?

By admin | Updated: November 10, 2014 01:17 IST

उन्मेष पाटील, कळंब तालुका कृषी कार्यालयाने महात्मा फुले जलभूमी अभियानांतर्गत केलेल्या तब्बल ७७ लाखांच्या कामांबाबत साशंकता निर्माण केली जावू लागली आहे.

उन्मेष पाटील, कळंबतालुका कृषी कार्यालयाने महात्मा फुले जलभूमी अभियानांतर्गत केलेल्या तब्बल ७७ लाखांच्या कामांबाबत साशंकता निर्माण केली जावू लागली आहे. या कामांवर केवळ काही हजारांचे पॉलिश करुन लाखो रुपयाची बिले उचलण्यात आल्याची चर्चा सध्या संबंधित गावांमध्ये रंगली आहे. यापैकी काही गावांतून तक्रारी होवूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने संशयाला आणखीच बळ मिळत आहे. त्यामुळे अशा कामांची त्रयस्त पथकामार्फत चौकशी करण्याची गरज व्यक्त होत आहे.कळंब तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने मागील वर्षी महात्मा फुले जलभूमी अभियानांतर्गत १७ गावांमध्ये ७७ लाख २२ हजार ९७८ रुपये खर्चाचे सिमेंट नाला बंधारे, मातीनाला बंधारे यांची तुट-फुट दुरुस्ती व गाळ काढणे ही कामे हाती घेण्यात आली होती. पावसाचे पाणी या नादुरुस्त बंधाऱ्यांतून वाया जावू नये, ते बंधाऱ्यात साठावे व त्याचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी शासनाने हे अभियान हाती घेतले होते. कळंब तालुका कृषी कार्यालयाने या अभियानाचाच बोजवारा उडविल्याची चर्चा जोरात सुरू आहे. याची खातरजमा करण्यासाठी कृषी कार्यालयाने केलेली दुरुस्ती व गाळ काढलेल्या काही बंधाऱ्यांची पाहणी केली असता चर्चेमध्ये बऱ्यापैकी सत्यता असल्याचे प्रथमदर्शनी दिसत येत आहे. तालुक्यातील हावरगाव शिवारामध्ये पाच सिमेंंट नाला बंधाऱ्याची फुट-तुट दुरुस्त करणे व गाळ काढणे या कामासाठी ६ लाख २६ हजार १०१ रुपये खर्चाची मंजुरी दिली होती. परंतु, या कामांवर प्रत्यक्ष खर्च मात्र काही हजारांमध्येच झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. तीन सिमेंट बंधाऱ्याची पाहणी केली असता, सिमेंटच्या एकाच पोत्यामध्ये या बंधाऱ्याची दुरुस्ती झालेली असू शकते, असे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीवर आलेला निधी नेमका कोणाच्या घशात गेला? हे प्रश्नचिन्हच आहे.हावरगावसारखाच प्रकार तालुक्यातील या अभियानांतर्गतकरण्यात आलेल्या १७ गावातील बंधारे दुरुस्तीच्या व गाळ काढण्याच्या कामातही झाल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत हावरगाव, दहिफळ येथील तक्रारी तालुका कृषी कार्यालयाकडे करण्यात आल्या होत्या, परंतु त्यावर कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही.दरम्यान, ही कामे खरोखरच निकषानुसार झाली की थातूरमातूर, याची चौकशी व्हावी, अशी मागणी आता खुद्द त्या-त्या गावांतील शेतकऱ्यांतून होवू लागली आहे. ही चौकशी जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या स्तरावरून विशेष पथकाचे गठण करून करावी, असेही अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यामध्ये लक्ष घालणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.