शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
2
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
3
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
4
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
5
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
6
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
7
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
8
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
9
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
10
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
11
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
12
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
13
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
14
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
15
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
16
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
17
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
18
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
19
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
20
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
Daily Top 2Weekly Top 5

हजारोंच्या पॉलिशवर उचलली लाखोंची बिले ?

By admin | Updated: November 10, 2014 01:17 IST

उन्मेष पाटील, कळंब तालुका कृषी कार्यालयाने महात्मा फुले जलभूमी अभियानांतर्गत केलेल्या तब्बल ७७ लाखांच्या कामांबाबत साशंकता निर्माण केली जावू लागली आहे.

उन्मेष पाटील, कळंबतालुका कृषी कार्यालयाने महात्मा फुले जलभूमी अभियानांतर्गत केलेल्या तब्बल ७७ लाखांच्या कामांबाबत साशंकता निर्माण केली जावू लागली आहे. या कामांवर केवळ काही हजारांचे पॉलिश करुन लाखो रुपयाची बिले उचलण्यात आल्याची चर्चा सध्या संबंधित गावांमध्ये रंगली आहे. यापैकी काही गावांतून तक्रारी होवूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने संशयाला आणखीच बळ मिळत आहे. त्यामुळे अशा कामांची त्रयस्त पथकामार्फत चौकशी करण्याची गरज व्यक्त होत आहे.कळंब तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने मागील वर्षी महात्मा फुले जलभूमी अभियानांतर्गत १७ गावांमध्ये ७७ लाख २२ हजार ९७८ रुपये खर्चाचे सिमेंट नाला बंधारे, मातीनाला बंधारे यांची तुट-फुट दुरुस्ती व गाळ काढणे ही कामे हाती घेण्यात आली होती. पावसाचे पाणी या नादुरुस्त बंधाऱ्यांतून वाया जावू नये, ते बंधाऱ्यात साठावे व त्याचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी शासनाने हे अभियान हाती घेतले होते. कळंब तालुका कृषी कार्यालयाने या अभियानाचाच बोजवारा उडविल्याची चर्चा जोरात सुरू आहे. याची खातरजमा करण्यासाठी कृषी कार्यालयाने केलेली दुरुस्ती व गाळ काढलेल्या काही बंधाऱ्यांची पाहणी केली असता चर्चेमध्ये बऱ्यापैकी सत्यता असल्याचे प्रथमदर्शनी दिसत येत आहे. तालुक्यातील हावरगाव शिवारामध्ये पाच सिमेंंट नाला बंधाऱ्याची फुट-तुट दुरुस्त करणे व गाळ काढणे या कामासाठी ६ लाख २६ हजार १०१ रुपये खर्चाची मंजुरी दिली होती. परंतु, या कामांवर प्रत्यक्ष खर्च मात्र काही हजारांमध्येच झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. तीन सिमेंट बंधाऱ्याची पाहणी केली असता, सिमेंटच्या एकाच पोत्यामध्ये या बंधाऱ्याची दुरुस्ती झालेली असू शकते, असे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीवर आलेला निधी नेमका कोणाच्या घशात गेला? हे प्रश्नचिन्हच आहे.हावरगावसारखाच प्रकार तालुक्यातील या अभियानांतर्गतकरण्यात आलेल्या १७ गावातील बंधारे दुरुस्तीच्या व गाळ काढण्याच्या कामातही झाल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत हावरगाव, दहिफळ येथील तक्रारी तालुका कृषी कार्यालयाकडे करण्यात आल्या होत्या, परंतु त्यावर कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही.दरम्यान, ही कामे खरोखरच निकषानुसार झाली की थातूरमातूर, याची चौकशी व्हावी, अशी मागणी आता खुद्द त्या-त्या गावांतील शेतकऱ्यांतून होवू लागली आहे. ही चौकशी जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या स्तरावरून विशेष पथकाचे गठण करून करावी, असेही अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यामध्ये लक्ष घालणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.