शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

हजारोंच्या पॉलिशवर उचलली लाखोंची बिले ?

By admin | Updated: November 10, 2014 01:17 IST

उन्मेष पाटील, कळंब तालुका कृषी कार्यालयाने महात्मा फुले जलभूमी अभियानांतर्गत केलेल्या तब्बल ७७ लाखांच्या कामांबाबत साशंकता निर्माण केली जावू लागली आहे.

उन्मेष पाटील, कळंबतालुका कृषी कार्यालयाने महात्मा फुले जलभूमी अभियानांतर्गत केलेल्या तब्बल ७७ लाखांच्या कामांबाबत साशंकता निर्माण केली जावू लागली आहे. या कामांवर केवळ काही हजारांचे पॉलिश करुन लाखो रुपयाची बिले उचलण्यात आल्याची चर्चा सध्या संबंधित गावांमध्ये रंगली आहे. यापैकी काही गावांतून तक्रारी होवूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने संशयाला आणखीच बळ मिळत आहे. त्यामुळे अशा कामांची त्रयस्त पथकामार्फत चौकशी करण्याची गरज व्यक्त होत आहे.कळंब तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने मागील वर्षी महात्मा फुले जलभूमी अभियानांतर्गत १७ गावांमध्ये ७७ लाख २२ हजार ९७८ रुपये खर्चाचे सिमेंट नाला बंधारे, मातीनाला बंधारे यांची तुट-फुट दुरुस्ती व गाळ काढणे ही कामे हाती घेण्यात आली होती. पावसाचे पाणी या नादुरुस्त बंधाऱ्यांतून वाया जावू नये, ते बंधाऱ्यात साठावे व त्याचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी शासनाने हे अभियान हाती घेतले होते. कळंब तालुका कृषी कार्यालयाने या अभियानाचाच बोजवारा उडविल्याची चर्चा जोरात सुरू आहे. याची खातरजमा करण्यासाठी कृषी कार्यालयाने केलेली दुरुस्ती व गाळ काढलेल्या काही बंधाऱ्यांची पाहणी केली असता चर्चेमध्ये बऱ्यापैकी सत्यता असल्याचे प्रथमदर्शनी दिसत येत आहे. तालुक्यातील हावरगाव शिवारामध्ये पाच सिमेंंट नाला बंधाऱ्याची फुट-तुट दुरुस्त करणे व गाळ काढणे या कामासाठी ६ लाख २६ हजार १०१ रुपये खर्चाची मंजुरी दिली होती. परंतु, या कामांवर प्रत्यक्ष खर्च मात्र काही हजारांमध्येच झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. तीन सिमेंट बंधाऱ्याची पाहणी केली असता, सिमेंटच्या एकाच पोत्यामध्ये या बंधाऱ्याची दुरुस्ती झालेली असू शकते, असे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीवर आलेला निधी नेमका कोणाच्या घशात गेला? हे प्रश्नचिन्हच आहे.हावरगावसारखाच प्रकार तालुक्यातील या अभियानांतर्गतकरण्यात आलेल्या १७ गावातील बंधारे दुरुस्तीच्या व गाळ काढण्याच्या कामातही झाल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत हावरगाव, दहिफळ येथील तक्रारी तालुका कृषी कार्यालयाकडे करण्यात आल्या होत्या, परंतु त्यावर कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही.दरम्यान, ही कामे खरोखरच निकषानुसार झाली की थातूरमातूर, याची चौकशी व्हावी, अशी मागणी आता खुद्द त्या-त्या गावांतील शेतकऱ्यांतून होवू लागली आहे. ही चौकशी जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या स्तरावरून विशेष पथकाचे गठण करून करावी, असेही अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यामध्ये लक्ष घालणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.